शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

जागा २४८२,  विद्यार्थ्यांची नोंदणी ४ हजार ३८0;  कोणाला लागणार २५ टक्के प्रवेशाची लॉटरी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 14:30 IST

२0८ शाळांमध्ये २४८२ जागांवर २५ टक्केप्रमाणे प्रवेश दिले जाणार आहेत. जागा कमी आणि विद्यार्थ्यांची नोंदणी जास्त. यामुळे कोणा-कोणाला २५ टक्के प्रवेशाची लॉटरी लागणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्दे२८ फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यात ४ हजार ३८0 विद्यार्थ्यांची आॅनलाइन नोंदणी झाली आहे. २0८ शाळांमध्ये २४८२ जागांवर २५ टक्केप्रमाणे प्रवेश दिले जाणार आहेत७ मार्चपर्यंत ही नोंदणी आठ हजारांवर जाण्याची शक्यता आहे.

- नितीन गव्हाळे

 अकोला : आरटीईनुसार इंग्रजी शाळांमध्ये २५ टक्के राखीव जागांवर प्रवेशासाठी आॅनलाइन नोंदणी सुरू आहे. पालकांच्या सोयीसाठी प्राथमिक शिक्षण विभागाने नोंदणीची मुदत ७ मार्च केली असल्याने, आता विद्यार्थ्यांची आणखी नोंदणी वाढणार आहे. २८ फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यात ४ हजार ३८0 विद्यार्थ्यांची आॅनलाइन नोंदणी झाली आहे. २0८ शाळांमध्ये २४८२ जागांवर २५ टक्केप्रमाणे प्रवेश दिले जाणार आहेत. जागा कमी आणि विद्यार्थ्यांची नोंदणी जास्त. यामुळे कोणा-कोणाला २५ टक्के प्रवेशाची लॉटरी लागणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.वास्तविकता, २५ टक्के प्रवेश प्रक्रिया ही वंचित घटकांतर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, सर्व जाती, धर्मातील दिव्यांग मुले, तसेच दुर्बल घटकांतर्गत कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपर्यंत असणारे, खुल्या प्रवर्गासह विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग, विशेष मागासवर्ग आणि अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी आहे. परंतु, प्रक्रियेमध्ये एक लाखापेक्षा अधिक उत्पन्न असलेले, पती-पत्नी दोघेही शासकीय नोकरीत असूनही ते सुद्धा २५ टक्के प्रवेश प्रक्रियेचा लाभ घेत असल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. यासाठी बोगस उत्पन्नाचे प्रमाणपत्रही हे लोक जोडतात. त्यामुळे एक लाखापर्यंत किंवा त्यापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहावे लागते. यासंदर्भात अनेक पालकांनी पुराव्यांसह शिक्षणाधिकाºयांकडे तक्रारी केल्या. परंतु, या तक्रारींवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना आरटीईच्या २५ टक्के प्रवेशापासून वंचित राहावे लागते. त्यामुळे प्राथमिक शिक्षण विभागाने यावर तोडगा काढण्याची मागणी पालकांनी केली आहे. २५ टक्के प्रवेश प्रक्रियेचा आर्थिकदृष्ट्या सक्षम विद्यार्थीही लाभ घेत असल्याने, यंदा २४८२ जागांसाठी चार हजारांच्यावर आॅनलाइन नोंदणी झाली आहे. ७ मार्चपर्यंत ही नोंदणी आठ हजारांवर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवेशाची लॉटरी कोणा-कोणाला लागणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

रहिवासी दाखलाही मिळवितात बोगसपालकांना पाल्याच्या निवासस्थानापासून एक किमी, तीन किमी किंवा त्यापेक्षा अधिक अंतरावरील शाळेचा समावेश आॅनलाइन अर्जात करावा लागतो. शाळेपासून एक किमी अंतराच्या परिसरात राहणाºया पालकाला प्रवेशासाठी प्राधान्य मिळत असल्याने, अनेक पालक एक किमी, तीन किमी शाळेच्या परिसरात राहत असल्याचे बोगस रहिवासी प्रमाणपत्र, पुरावा जोडत असल्याचे प्रकार घडत आहेत.खात्रीशीर प्रवेश मिळेलच असे नाही?शाळेच्या आरंभीच्या वर्गाच्या २५ टक्के प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास सोडत/लॉटरी पद्धतीने प्रवेश दिले जाणार आहेत. अशा परिस्थितीत प्रत्येक अर्जदाराच्या पाल्याला प्रवेश मिळेलच, याची शाश्वती नाही.नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आम्ही विशेष तपासणी करू. परंतु, आर्थिकदृष्ट्या पालक सक्षम आहेत, शासकीय नोकरीत आहेत, असे शाळांना आढळून आल्यास, त्यांचे प्रवेश नाकारणाºयाचे अधिकार मुख्याध्यापक, संस्थेला आहेत. सुखसंपन्न विद्यार्थ्यांमुळे गरीब, आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांना २५ टक्के प्रवेशापासून वंचित राहावे लागते, हे खरे आहे. यासंदर्भात वरिष्ठांसोबत चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न करू.- प्रशांत दिग्रसकर, शिक्षणाधिकारी

 

टॅग्स :Akolaअकोलाeducationशैक्षणिकSchoolशाळा