शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

उद्यापासून होणार शाळा सुरू; २६१ शिक्षकांच्या आरोग्य चाचण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 11:19 IST

Murtijapur School News मूर्तिजापूर तालुक्यातील २६१ शिक्षकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे.

- संजय उमक

मूर्तिजापूर : जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या संसर्गाने थैमान घातले असताना अशा परिस्थितीत जिल्ह्यात शाळा सुरू करणे योग्य नसल्याचे मत शिक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे तर शाळा सुरू करून आमचे पाल्य कोरोनाबाधित होणार नाही याची हमी कोण घेणार असा सवाल पालकांनी केला आहे. यासंदर्भात विविध प्रश्न पालकांकडून उपस्थित आहेत.

२३ नोव्हेंबरपासून राज्यातील ९ वी ते १२ पर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा राज्य शासनाने घाट घातला आहे. यासाठी तालुक्यातील २६१ शिक्षकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. सद्यस्थितीत दिल्लीत कोरोना आजाराने लोक बेजार झाले आहेत तर राज्यातही काही केल्या प्रकोप थांबत नसून अशा परिस्थितीत शाळा सुरू झाल्या तर कोरोनासह अनेक साथरोगांना सामोरे जावे लागणार आहे. एका बाकावर एक विद्यार्थी असे नियोजन असले तरी शाळेत वावरणारे विद्यार्थी या ना त्या निमित्ताने एकमेकांच्या संपर्कात येतच असतात, लघुशंका, जेवणाच्या सुटीत, वर्गात आणि वर्गाबाहेर ते कितीतरी वेळा एकमेकांच्या संपर्कात येत असल्याने शासनाने घेतलेला निर्णय चुकीचा असून राज्य जोपर्यंत संपूर्ण कोरोनामुक्त होत नाही तोपर्यंत शाळा सुरू करणे शासनाच्या व विद्यार्थ्यांच्या हिताचे नसल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.

अनेक शाळेत हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. वर्ग खोल्या व विद्यार्थी संख्या लक्षात घेता एरवी एका बाकावर तीन-तीन बसणारे विद्यार्थी यापुढे एका बाकावर एक बसणार असल्याने विद्यार्थी संख्येच्या आधारावर हिशोब केला तर हे गणित चुकीचे असल्याचा दावा अनेकांनी केला असून, एक वर्ष वाया गेले तरी चालेल; पण आपले पाल्य शाळेत पाठविणार नसल्याच्या प्रतिक्रिया अनेक पालकांनी व्यक्त केल्या. शाळा सुरू करण्यापूर्वी शिक्षकांच्या आरोग्य चाचण्या करण्यात आल्या असल्या तरी एकमेच्या मोठ्या प्रमाणात संपर्कात येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याचे काय, त्याची हमी कोण घेणार, असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होत आहे. शाळा सुरू करून विद्यार्थी एकत्र आले तर कोरोना संसर्गाचा फैलाव अधिक गतीने होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अनेक शाळांकडे विद्यार्थी बसण्यासाठी सुविधा उपलब्ध नाहीत, शाळेत शिक्षकताना काहीही केले तरी विद्यार्थी एकत्र येणार, एकमेकांचे साहित्य हाताळणार, सहभोजन एकत्र येऊन करणार, प्रत्येक विद्यार्थ्यांच्या या सगळ्या गोष्टींकडे लक्ष ठेवणे शिक्षकांसाठी डोकेदुखी ठरणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याकडे आवर्जून लक्ष ठेवत राहणे ही बाब शिक्षकांना अशक्यप्राय आहे. राज्यातील परिस्थिती निवडल्यावर शाळा सुरू करायला हरकत नाही परंतु आता शाळा सुरू करून आपल्या पायावर धोंडा पाडून घेण्याचा प्रकार असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.

 

सद्यस्थितीत कोरोना परिस्थिती नियंत्रणात नसताना शाळ सुरू करणे ही अत्यंत चुकीची आणि दुर्दैवाची बाब आहे. फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला तर शाळेला आरोपी व्हावे लागेल, तूर्त मुलांना शाळेत बसविणे योग्य नाही, यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांचाही जीव टांगणीला लागला आहे.

- डॉ. श्रीकांत तिडके, शिक्षण तज्ज्ञ, मूर्तिजापूर

 

सद्यस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव संपला नसताना पाल्यांना शाळेत पाठविणे त्याच्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य होणार नाही. कोरोना प्रादुर्भावाचा प्रभाव असताना पाल्यांना शाळेत अथवा महाविद्यालयात पाठविणे ही बाब चिंताजनक आहे. पाल्याचे एक वर्ष वाया गेले तरी चालेल; पण जाणीवपूर्वक त्यांचा जीव धोक्यात घालणार नाही.

- विनायक थेटे, पालक, सिरसो

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरAkolaअकोलाSchoolशाळा