शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

उद्यापासून होणार शाळा सुरू; २६१ शिक्षकांच्या आरोग्य चाचण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 11:19 IST

Murtijapur School News मूर्तिजापूर तालुक्यातील २६१ शिक्षकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे.

- संजय उमक

मूर्तिजापूर : जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या संसर्गाने थैमान घातले असताना अशा परिस्थितीत जिल्ह्यात शाळा सुरू करणे योग्य नसल्याचे मत शिक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे तर शाळा सुरू करून आमचे पाल्य कोरोनाबाधित होणार नाही याची हमी कोण घेणार असा सवाल पालकांनी केला आहे. यासंदर्भात विविध प्रश्न पालकांकडून उपस्थित आहेत.

२३ नोव्हेंबरपासून राज्यातील ९ वी ते १२ पर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा राज्य शासनाने घाट घातला आहे. यासाठी तालुक्यातील २६१ शिक्षकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. सद्यस्थितीत दिल्लीत कोरोना आजाराने लोक बेजार झाले आहेत तर राज्यातही काही केल्या प्रकोप थांबत नसून अशा परिस्थितीत शाळा सुरू झाल्या तर कोरोनासह अनेक साथरोगांना सामोरे जावे लागणार आहे. एका बाकावर एक विद्यार्थी असे नियोजन असले तरी शाळेत वावरणारे विद्यार्थी या ना त्या निमित्ताने एकमेकांच्या संपर्कात येतच असतात, लघुशंका, जेवणाच्या सुटीत, वर्गात आणि वर्गाबाहेर ते कितीतरी वेळा एकमेकांच्या संपर्कात येत असल्याने शासनाने घेतलेला निर्णय चुकीचा असून राज्य जोपर्यंत संपूर्ण कोरोनामुक्त होत नाही तोपर्यंत शाळा सुरू करणे शासनाच्या व विद्यार्थ्यांच्या हिताचे नसल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.

अनेक शाळेत हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. वर्ग खोल्या व विद्यार्थी संख्या लक्षात घेता एरवी एका बाकावर तीन-तीन बसणारे विद्यार्थी यापुढे एका बाकावर एक बसणार असल्याने विद्यार्थी संख्येच्या आधारावर हिशोब केला तर हे गणित चुकीचे असल्याचा दावा अनेकांनी केला असून, एक वर्ष वाया गेले तरी चालेल; पण आपले पाल्य शाळेत पाठविणार नसल्याच्या प्रतिक्रिया अनेक पालकांनी व्यक्त केल्या. शाळा सुरू करण्यापूर्वी शिक्षकांच्या आरोग्य चाचण्या करण्यात आल्या असल्या तरी एकमेच्या मोठ्या प्रमाणात संपर्कात येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याचे काय, त्याची हमी कोण घेणार, असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होत आहे. शाळा सुरू करून विद्यार्थी एकत्र आले तर कोरोना संसर्गाचा फैलाव अधिक गतीने होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अनेक शाळांकडे विद्यार्थी बसण्यासाठी सुविधा उपलब्ध नाहीत, शाळेत शिक्षकताना काहीही केले तरी विद्यार्थी एकत्र येणार, एकमेकांचे साहित्य हाताळणार, सहभोजन एकत्र येऊन करणार, प्रत्येक विद्यार्थ्यांच्या या सगळ्या गोष्टींकडे लक्ष ठेवणे शिक्षकांसाठी डोकेदुखी ठरणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याकडे आवर्जून लक्ष ठेवत राहणे ही बाब शिक्षकांना अशक्यप्राय आहे. राज्यातील परिस्थिती निवडल्यावर शाळा सुरू करायला हरकत नाही परंतु आता शाळा सुरू करून आपल्या पायावर धोंडा पाडून घेण्याचा प्रकार असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.

 

सद्यस्थितीत कोरोना परिस्थिती नियंत्रणात नसताना शाळ सुरू करणे ही अत्यंत चुकीची आणि दुर्दैवाची बाब आहे. फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला तर शाळेला आरोपी व्हावे लागेल, तूर्त मुलांना शाळेत बसविणे योग्य नाही, यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांचाही जीव टांगणीला लागला आहे.

- डॉ. श्रीकांत तिडके, शिक्षण तज्ज्ञ, मूर्तिजापूर

 

सद्यस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव संपला नसताना पाल्यांना शाळेत पाठविणे त्याच्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य होणार नाही. कोरोना प्रादुर्भावाचा प्रभाव असताना पाल्यांना शाळेत अथवा महाविद्यालयात पाठविणे ही बाब चिंताजनक आहे. पाल्याचे एक वर्ष वाया गेले तरी चालेल; पण जाणीवपूर्वक त्यांचा जीव धोक्यात घालणार नाही.

- विनायक थेटे, पालक, सिरसो

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरAkolaअकोलाSchoolशाळा