शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
3
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
4
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
5
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
6
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
7
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
8
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
9
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
10
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
11
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
12
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
13
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
14
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
15
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
16
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
17
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
18
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
19
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
20
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?

२३ नोव्हेंबरपासून शाळा होणार सुरू; पण संभ्रम कायमच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2020 17:11 IST

Akola News नियोजन करताना वर्गशिक्षक व मुख्याध्यापकांची तारेवरची कसरत होत आहे.

ठळक मुद्देशाळांसमाेर उपाययाेजनांचे आव्हान क्लिष्टता दूर करण्याची मागणी

अकाेला : प्रदीर्घ लॉकडाऊननंतर २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे; मात्र याबाबत निर्णयाच्या अनेक बाबी स्पष्ट नसल्याने नियोजन करताना वर्गशिक्षक व मुख्याध्यापकांची तारेवरची कसरत होत आहे. यामुळे शासनाने अनेक मुद्दे स्पष्ट करावेत, अशी अपेक्षा मुख्याध्यापक व वर्गशिक्षक व्यक्त करीत आहेत.

शासन निर्णयात शाळा नेमके चार तास की चार तासिका, यात गोंधळ होत असल्याने मुख्याध्यापकांची नियोजन करताना गडबड होत आहे. याचबरोबर केवळ गणित, विज्ञान आणि इंग्रजी या विषयांचे शिक्षण ऑफलाइन देण्यात यावे, असे शासन निर्णयात सांगण्यात आले आहे. ५० टक्के शिक्षकांची उपस्थिती बंधनकारक असल्याने या विषयाच्या शिक्षकांना रोज हजर राहण्यास सांगावे का, असा प्रश्नही मुख्याध्यापक विचारत आहेत. याचबरोबर विद्यार्थ्यांची उपस्थितीही ५० टक्के असणार आहे. एका वर्गात १५ विद्यार्थी बसविण्याबाबत आदेशात सांगण्यात आले आहे. यामुळे ९० विद्यार्थ्यांच्या एका तुकडीचे सहा भाग होतील. यातील तीन वर्ग ऑफलाइन तर तीन वर्ग ऑनलाइन शिक्षण घेतील. एखाद्या पालकाने विद्यार्थ्याला शाळेत पाठविण्यास नकार दिल्यास, त्याची तुकडी ज्या दिवशी ऑफलाइन भरेल, त्या दिवसाच्या त्याच्या अध्यपानाचे काय करावे, असे एक ना अनेक प्रश्न उभे ठाकले आहेत.

टॅग्स :AkolaअकोलाSchoolशाळा