शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

२३ नोव्हेंबरपासून शाळा होणार सुरू; पण संभ्रम कायमच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2020 17:11 IST

Akola News नियोजन करताना वर्गशिक्षक व मुख्याध्यापकांची तारेवरची कसरत होत आहे.

ठळक मुद्देशाळांसमाेर उपाययाेजनांचे आव्हान क्लिष्टता दूर करण्याची मागणी

अकाेला : प्रदीर्घ लॉकडाऊननंतर २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे; मात्र याबाबत निर्णयाच्या अनेक बाबी स्पष्ट नसल्याने नियोजन करताना वर्गशिक्षक व मुख्याध्यापकांची तारेवरची कसरत होत आहे. यामुळे शासनाने अनेक मुद्दे स्पष्ट करावेत, अशी अपेक्षा मुख्याध्यापक व वर्गशिक्षक व्यक्त करीत आहेत.

शासन निर्णयात शाळा नेमके चार तास की चार तासिका, यात गोंधळ होत असल्याने मुख्याध्यापकांची नियोजन करताना गडबड होत आहे. याचबरोबर केवळ गणित, विज्ञान आणि इंग्रजी या विषयांचे शिक्षण ऑफलाइन देण्यात यावे, असे शासन निर्णयात सांगण्यात आले आहे. ५० टक्के शिक्षकांची उपस्थिती बंधनकारक असल्याने या विषयाच्या शिक्षकांना रोज हजर राहण्यास सांगावे का, असा प्रश्नही मुख्याध्यापक विचारत आहेत. याचबरोबर विद्यार्थ्यांची उपस्थितीही ५० टक्के असणार आहे. एका वर्गात १५ विद्यार्थी बसविण्याबाबत आदेशात सांगण्यात आले आहे. यामुळे ९० विद्यार्थ्यांच्या एका तुकडीचे सहा भाग होतील. यातील तीन वर्ग ऑफलाइन तर तीन वर्ग ऑनलाइन शिक्षण घेतील. एखाद्या पालकाने विद्यार्थ्याला शाळेत पाठविण्यास नकार दिल्यास, त्याची तुकडी ज्या दिवशी ऑफलाइन भरेल, त्या दिवसाच्या त्याच्या अध्यपानाचे काय करावे, असे एक ना अनेक प्रश्न उभे ठाकले आहेत.

टॅग्स :AkolaअकोलाSchoolशाळा