शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

‘शाळा सिद्धी’ :  १६०० पैकी ६९ शाळांनीच केले मूल्यमापन  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 15:40 IST

अकोला : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत नुकताच असर २०१८ अहवाल जाहीर झाला असून, त्यानुसार जिल्ह्यातील ५० टक्क्यांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना बेरीज, वजाबाकी येत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली.

-  प्रवीण खेतेअकोला : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत नुकताच असर २०१८ अहवाल जाहीर झाला असून, त्यानुसार जिल्ह्यातील ५० टक्क्यांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना बेरीज, वजाबाकी येत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली. अशातच शाळा सिद्धी उपक्रमांतर्गत शाळांची स्वयंमूल्यमापनाबाबत उदासीनता दिसून येत आहे.महाराष्ट्र शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या निर्देशानुसार शैक्षणिक सत्र २०१८ - १९ साठी राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांनी आपले मूल्यांकन व प्रमाणीकरण करणे तसेच शाळांची गुणवत्ता आश्वासित करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने देशभरात शाळा सिद्धी तर महाराष्ट्रात समृद्ध शाळा नावाने शाळांना स्वयंमूल्यमापन करणे अनिवार्य आहे; परंतु जिल्ह्यात यासंदर्भात शाळांची उदासीनता दिसून येत आहे. यंदा जिल्ह्यातील १६०० शाळांपैकी केवळ ६९ शाळांनीच स्वयंसिद्धी अंतर्गत स्वयंमूल्यमापन केल्याची बाब समोर आली आहे. शाळांची ही उदासीनता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासास बाधक ठरत आहे.३० जानेवारीपर्यंत मुदतशाळा सिद्धी उपक्रमांतर्गत शाळांना आपल्या शाळेतील स्वयंमूल्यमापनासाठी ३० जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. जिल्ह्यातील शाळांना स्वयंमूल्यमापनासाठी केवळ १२ दिवसांचा कालावधी शिल्लक आहे.अशी आहे सद्यस्थितीस्वयंमूल्यमापन झालेल्या शाळा - ६९प्रक्रिया सुरू असणाऱ्या शाळा - १६०मूल्यमापनच न झालेल्या शाळा - १६१२अशी आहे कार्यपद्धतीशाळेतील संपूर्ण विद्यार्थ्यांची माहिती.शाळेतील संपूर्ण शिक्षकांची माहिती.७ क्षेत्र म्हणजे ४६ गाभा माणकेप्रत्येक गाभा मानकानुसार त्या-त्या स्तरांमध्ये सुधारणेचे नियोजन.असे आहे स्वयंमूल्यमापनशाळेतील उपलब्ध साधन, त्याची उपयुक्तता आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ते पर्याप्त आहे का, याची पडताळणी करून त्यानुसार गुण द्यावे लागतात. (उदा. शाळांमधील ग्रंथालयात आवश्यक पुस्तकांची संख्या, विद्यार्थ्यांना त्याचा उपयोग होतो का. तसेच संगणक, शिक्षकांची संख्या, शिक्षकांच्या शिकवण्याची पद्धती आदींबाबतदेखील मूल्यमापन करून गुण द्यावे लागतात.)श्रेणीनुसार गुणश्रेणी - गुणअ - ११२ ते १३८ब - ६९ ते १११क - ६८ किंवा पेक्षा कमी गुणविद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचे गांभीर्य लक्षात घेऊन शाळांनी ३० जानेवारीच्या आत शाळा सिद्धी उपक्रमांतर्गत स्वयंमूल्यमापन करावे. या संदर्भात शाळांना सूचनादेखील दिली आहे.- प्रकाश मुकुंद, शिक्षणाधिकारी, माध्यमिक, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाSchoolशाळा