शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

बारुल्यात हिवाळ्यातच उलंगवाडी; पिण्याचे पाणी नाही, पीक नाही 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 14:36 IST

अकोला: जिल्ह्यातील खारपाणपट्ट्यातील बारुला विभागात गावांमध्ये दुष्काळी परिस्थितीत १५ ते २० दिवस पिण्याचे पाणी मिळत नाही. कपाशी व तूर पिकाचे उत्पादन बुडाले असून, हरभऱ्याचे पीकही कोमेजू लागले आहे.

- संतोष येलकर

अकोला: जिल्ह्यातील खारपाणपट्ट्यातील बारुला विभागात गावांमध्ये दुष्काळी परिस्थितीत १५ ते २० दिवस पिण्याचे पाणी मिळत नाही. कपाशी व तूर पिकाचे उत्पादन बुडाले असून, हरभऱ्याचे पीकही कोमेजू लागले आहे. त्यामुळे हिवाळ्यातच बारुल्यात उलंगवाडी झाल्याने, शेतकरी चिंतेत सापडल्याचे वास्तव आहे.पावसातील खंड, जमिनीतील आर्द्रतेचे कमी प्रमाण आणि त्यामुळे खरीप पिकांच्या उत्पादनात घट झाल्याने, जिल्ह्यातील अकोला, बाळापूर, बार्शीटाकळी, तेल्हारा व मूर्तिजापूर या पाच तालुक्यात शासनामार्फत दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यातील खारपाणपट्ट्यातील बारुला विभागातील गावांमध्ये १५ ते २० दिवस ग्रामस्थांना पिण्याचे पाणी मिळत नाही. नळांना पाणी आले तर १५ दिवस पाणी साठवून ठेवावे लागत आहे; मात्र १५ दिवस उलटून गेल्यानंतर पाणी मिळाले नाही तर, ग्रामस्थांना विकत पाणी घेऊन तहान भागवावी लागत आहे. तसेच उगवा, कासली, दोनवाडा व इतर गावातील ग्रामस्थांना विहीर व नाल्यातील पाण्यावर तहान भागवावी लागत असून, बैलबंडी, आॅटो, मोटारसायकल व सायकलवरून पिण्याचे पाणी भरले जात आहे. त्यामुळे खारपाणपट्ट्यातील बारुल्यात हिवाळ्यातच पाणीटंचाईचे चटके ग्रामस्थांना सहन करावे लागत आहेत. दुष्काळी परिस्थितीत नापिकीचा सामना शेतकºयांना सहन करावा लागत आहे. दरवर्षी एप्रिल अखेरपर्यंत कपाशीचा हंगाम चालतो; मात्र यावर्षी जमिनीत ओलावा नसल्याने डिसेंबरमध्ये कपाशीचा हंगाम संपण्याच्या मार्गावर असून, शेतातील पूर्णत: वाळलेल्या कपाशीची वखरणी शेतकºयांनी सुरू केली आहे. तुरीच्या झाडांना चार-पाच शेंगा लागल्या असून, शेंगामधील दाणेही भरले नसल्याने, तूर पिकाचे उत्पादनही शेतकºयांच्या हातून गेले आहे. रब्बी हंगामात पेरलेला हरभरा जमिनीत ओलावा नसल्याने कोमेजू लागला असल्याचे हरभºयाचे उत्पादनही बुडणार आहे. त्यामुळे हिवाळ्यातच पिकांची उलंगवाडी झाल्याने, खरपाणपट्ट्यातील बारुला विभागातील शेतकरी चिंतेत सापडला आहे.कपाशी, तूर व हरभरा पिकाची आहे परिस्थिती!दुष्काळी परिस्थितीत जमिनीत ओलावा नसल्याने, एकारी दोन ते तीन क्विंटल कपाशीचे उत्पादन झाले असून, तुरीला केवळ पानेच असून, तुरीच्या झाडाला चार ते पाच शेंगा लागल्या आहेत. त्यामध्येही दाणे भरले नसल्याने, तुरीच्या पिकाचे उत्पादन हातून गेले आहे. तर जमिनीत ओलावा नसल्याने, हरभरा कोमेजू लागल्याने, हरभरा पिकाचे उत्पादन बुडाल्याची परिस्थिती आहे, असे बारुला विभागातील शेतकºयांनी सांगितले.बारुल्यात हिवाळ्यातच उलंगवाडी !‘या’ गावांत  पाण्यासाठी पायपीटपिण्याचे पाणी १५ ते २० दिवस मिळत नाही, त्यामुळे हिवाळ्यात ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत असून, पिके हातून गेल्याने, नापिकीच्या स्थितीत शेतकरी संकटात सापडल्याची परिस्थिती आहे. असे वास्तव घुसरवाडी, म्हातोडी, कासली, दोनवाडा, उगवा, घुसर, आपातापा, आपोती, आखतवाडा, अनकवाडी इत्यादी गावांमध्ये सोमवारी आढळून आले.जलकुंभ ठरले बिनकामाचे!बारुला विभागातील गावांमध्ये खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणीपुरवठा करण्यात येतो. गावांमध्ये पाणी वितरणासाठी गावागावात जलकुंभ बांधण्यात आले आहेत; मात्र एकाही जलकुंभात पाणी पोहोचत नसल्याने, या भागातील जलकुंभ बिनकामाचे ठरल्याची बाब समोर आली आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाdroughtदुष्काळ