शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

बारुल्यात हिवाळ्यातच उलंगवाडी; पिण्याचे पाणी नाही, पीक नाही 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 14:36 IST

अकोला: जिल्ह्यातील खारपाणपट्ट्यातील बारुला विभागात गावांमध्ये दुष्काळी परिस्थितीत १५ ते २० दिवस पिण्याचे पाणी मिळत नाही. कपाशी व तूर पिकाचे उत्पादन बुडाले असून, हरभऱ्याचे पीकही कोमेजू लागले आहे.

- संतोष येलकर

अकोला: जिल्ह्यातील खारपाणपट्ट्यातील बारुला विभागात गावांमध्ये दुष्काळी परिस्थितीत १५ ते २० दिवस पिण्याचे पाणी मिळत नाही. कपाशी व तूर पिकाचे उत्पादन बुडाले असून, हरभऱ्याचे पीकही कोमेजू लागले आहे. त्यामुळे हिवाळ्यातच बारुल्यात उलंगवाडी झाल्याने, शेतकरी चिंतेत सापडल्याचे वास्तव आहे.पावसातील खंड, जमिनीतील आर्द्रतेचे कमी प्रमाण आणि त्यामुळे खरीप पिकांच्या उत्पादनात घट झाल्याने, जिल्ह्यातील अकोला, बाळापूर, बार्शीटाकळी, तेल्हारा व मूर्तिजापूर या पाच तालुक्यात शासनामार्फत दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यातील खारपाणपट्ट्यातील बारुला विभागातील गावांमध्ये १५ ते २० दिवस ग्रामस्थांना पिण्याचे पाणी मिळत नाही. नळांना पाणी आले तर १५ दिवस पाणी साठवून ठेवावे लागत आहे; मात्र १५ दिवस उलटून गेल्यानंतर पाणी मिळाले नाही तर, ग्रामस्थांना विकत पाणी घेऊन तहान भागवावी लागत आहे. तसेच उगवा, कासली, दोनवाडा व इतर गावातील ग्रामस्थांना विहीर व नाल्यातील पाण्यावर तहान भागवावी लागत असून, बैलबंडी, आॅटो, मोटारसायकल व सायकलवरून पिण्याचे पाणी भरले जात आहे. त्यामुळे खारपाणपट्ट्यातील बारुल्यात हिवाळ्यातच पाणीटंचाईचे चटके ग्रामस्थांना सहन करावे लागत आहेत. दुष्काळी परिस्थितीत नापिकीचा सामना शेतकºयांना सहन करावा लागत आहे. दरवर्षी एप्रिल अखेरपर्यंत कपाशीचा हंगाम चालतो; मात्र यावर्षी जमिनीत ओलावा नसल्याने डिसेंबरमध्ये कपाशीचा हंगाम संपण्याच्या मार्गावर असून, शेतातील पूर्णत: वाळलेल्या कपाशीची वखरणी शेतकºयांनी सुरू केली आहे. तुरीच्या झाडांना चार-पाच शेंगा लागल्या असून, शेंगामधील दाणेही भरले नसल्याने, तूर पिकाचे उत्पादनही शेतकºयांच्या हातून गेले आहे. रब्बी हंगामात पेरलेला हरभरा जमिनीत ओलावा नसल्याने कोमेजू लागला असल्याचे हरभºयाचे उत्पादनही बुडणार आहे. त्यामुळे हिवाळ्यातच पिकांची उलंगवाडी झाल्याने, खरपाणपट्ट्यातील बारुला विभागातील शेतकरी चिंतेत सापडला आहे.कपाशी, तूर व हरभरा पिकाची आहे परिस्थिती!दुष्काळी परिस्थितीत जमिनीत ओलावा नसल्याने, एकारी दोन ते तीन क्विंटल कपाशीचे उत्पादन झाले असून, तुरीला केवळ पानेच असून, तुरीच्या झाडाला चार ते पाच शेंगा लागल्या आहेत. त्यामध्येही दाणे भरले नसल्याने, तुरीच्या पिकाचे उत्पादन हातून गेले आहे. तर जमिनीत ओलावा नसल्याने, हरभरा कोमेजू लागल्याने, हरभरा पिकाचे उत्पादन बुडाल्याची परिस्थिती आहे, असे बारुला विभागातील शेतकºयांनी सांगितले.बारुल्यात हिवाळ्यातच उलंगवाडी !‘या’ गावांत  पाण्यासाठी पायपीटपिण्याचे पाणी १५ ते २० दिवस मिळत नाही, त्यामुळे हिवाळ्यात ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत असून, पिके हातून गेल्याने, नापिकीच्या स्थितीत शेतकरी संकटात सापडल्याची परिस्थिती आहे. असे वास्तव घुसरवाडी, म्हातोडी, कासली, दोनवाडा, उगवा, घुसर, आपातापा, आपोती, आखतवाडा, अनकवाडी इत्यादी गावांमध्ये सोमवारी आढळून आले.जलकुंभ ठरले बिनकामाचे!बारुला विभागातील गावांमध्ये खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणीपुरवठा करण्यात येतो. गावांमध्ये पाणी वितरणासाठी गावागावात जलकुंभ बांधण्यात आले आहेत; मात्र एकाही जलकुंभात पाणी पोहोचत नसल्याने, या भागातील जलकुंभ बिनकामाचे ठरल्याची बाब समोर आली आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाdroughtदुष्काळ