शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

अकोला जिल्ह्यात संततधार; सलग चौथ्या दिवशी पावसाचा जोर कायम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 10:46 IST

आणखी चार दिवस सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

अकोला : जिल्ह्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाल्याने पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. विदर्भ व लगतच्या भागात चक्रवात तयार झाले आहे. मान्सूनच्या नोंदीने चढता आलेख गाठला आहे. गत तीन दिवसांपासून संततधार कोसळणारा पाऊस शुक्रवारीही ठाण मांडून बसून होता. या पावसामुळे काटेपुर्णा प्रकल्पातून विसर्ग सुरू झाला असून, आणखी चार दिवस सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मागील १५ - १८ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिके कोमेजली होती. कपाशी, सोयाबीन व इतर पिकांवर किडींनी हल्ला चढविला होता. मंगळवारपासून पावसाने पुन्हा हजेरी लावली. गत चार दिवसांपासून सलग पाऊस सुरू आहे. या पावसामुळे नदी, नाले वाहू लागले आहेत. या पावसामुळे शेतातील कपाशी, तूर, सोयाबीन पिकातही पाणी साचू लागले आहे. शुक्रवारीही पावसाचा जोर कायम असून, दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच होती. जिल्ह्यात मागील २४ तासांत ६.८ मिमी. पावसाची नोंद झाली आहे.

चार दिवसांत ७० मिमी. पाऊस

जिल्ह्यात मंगळवारपासून सतत पाऊस बरसत आहे. ऑगस्ट महिन्यात सोमवारपर्यंत २२.७ मिमी पाऊस झाला होता. तर शुक्रवारी सकाळपर्यंत ९३.३ मिमी पाऊस बरसला. जिल्ह्यात गत चार दिवसांमध्ये ७०.६ मिमी पावसाची नोंद झाली.

 

ऑगस्टमधील तालुकानिहाय पाऊस

तालुका पाऊस (मिमी)

अकोट             ७७.१

तेल्हारा             ७७.९

बाळापूर             ८४.०

पातूर             १५७.२

अकोला             ९०.५

बार्शीटाकळी ८४.८

मूर्तिजापूर             १००.४

 

काटेपुर्णा ९३, तर वान ६६ टक्के भरले!

जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्प असलेल्या काटेपुर्णा प्रकल्पात ९३.७५ टक्के, तर वान प्रकल्पात ६६.६४ टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे. वान प्रकल्पाच्या क्षेत्रात सतत पाऊस सुरूच असल्याने पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. काटेपुर्णाची २ वक्रव्दारे ३० सेंमी उंचीने उघडली आहेत.

टॅग्स :AkolaअकोलाRainपाऊस