शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
4
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
5
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
6
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
7
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
8
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
9
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
10
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
11
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
12
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
13
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
14
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
15
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
17
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
18
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
19
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
20
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!

महात्मा गांधी, दाभोळकर हत्येसाठी वापरलेली ‘मोडस आॅपरेंडी’ एकच - तुषार गांधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 2:43 PM

महात्मा गांधी यांच्या हत्येच्या कटात अनेकांचा सहभाग होता. राष्टÑीय स्वयंसेवक संघ व सावरकर यांची प्रेरणा व प्रोत्साहन या हत्येसाठी होते, असा आरोप तुषार गांधी यांनी केला.

ठळक मुद्दे ‘ते’ आम्ही नव्हेच अशा पद्धतीने आता राजकारण केले जात असल्याचा आरोप प्रख्यात लेखक तुषार गांधी यांनी केला.नवनवीन व्यक्तींचा वापर झाल्याने या हत्येमागील षडयंत्रांची साखळी थेट एका संस्थेपर्यंत पोहचत नाही.इतिहासकारांनी अन् आमच्या परिवारानेही कस्तुरबांच्या कर्तृतवाची प्रभावी दखल घेतली नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: महात्मा गांधी यांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेली मोडस आॅपरेंडीच नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येसाठी वापरण्यात आली. वेगवेगळ्या स्तरावर टीम तयार करून या हत्या घडविण्यात आल्या. त्यामुळेच या हत्यामागे ज्या संस्थांची प्रेरणा अन् प्रोत्साहन होते तिथपर्यंत थेट पोहचता येत नाही, अशी खंत व्यक्त करून त्याचाच फायदा अशा हत्यामध्ये सहभागी संस्था घेत असून, ‘ते’ आम्ही नव्हेच अशा पद्धतीने आता राजकारण केले जात असल्याचा आरोप प्रख्यात लेखक तुषार गांधी यांनी केला.महात्मा गांधी जन्मशताब्दीच्या निमित्ताने येथील शिवाजी महाविद्यालयात गांधी यांचे व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी मंचावर प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे, डॉ. गजानन नारे, ज्येष्ठ पत्रकार अविनाश दुधे उपस्थित होते. तुषार गांधी पुढे म्हणाले की, महात्मा गांधी यांच्या हत्येच्या कटात अनेकांचा सहभाग होता. राष्टÑीय स्वयंसेवक संघ व सावरकर यांची प्रेरणा व प्रोत्साहन या हत्येसाठी होते, असा आरोप त्यांनी केला. गांधी हत्येनंतर कोर्टात खटला उभा राहिल्यावर पुराव्याअभावी या काहींची सुटका झाली असली तरी पुरावे कोर्टासमोर उपलब्ध होणार नाहीत असेच षडयंत्र या मागे रचले गेले होते. त्यामुळे न्यायालयाच्या निकालाचा आधार घेऊन ‘ते’ आम्ही नव्हेच अशा सांगणाऱ्या संस्था निर्दोषत्व सांगत असल्या तरी त्यांचीच प्रेरणा या हत्येमागे होती हे सिद्ध करण्यास कपूर आयोग महत्त्वाच ठरतो, असे ते म्हणाले. गांधी हत्येप्रमाणेच दाभोळकर यांची हत्या करण्यात आली. विचारांची लढाई विचारांनीच केली पाहिजे यावर ज्यांचा विश्वास नाही अशा संस्थांचा या मध्ये सहभाग होता; मात्र हत्येसाठी वेगवेगळ्या पातळीवर नवनवीन व्यक्तींचा वापर झाल्याने या हत्येमागील षडयंत्रांची साखळी थेट एका संस्थेपर्यंत पोहचत नाही. मुंबईचा डॉन दाऊद इब्राहीमसुद्धा अशाच मोडस आॅपरेंडीमुळे पोलिसांच्या हाती लागला नसल्याचा आरोपही त्यांनी केला.महात्मा गांधींनी या देशाला वैचारिक लढा लढण्याची ताकद दिली. स्वातंत्र्याच्या आंदोलनात एखादे आंदोलन पुकारले की सर्व नेत्यांना अटक केली जात असे; मात्र जनता आंदोलनात कायम राहत गेल्याने स्वातंत्र्याचा लढा यशस्वी झाला यामागे महात्मा गांधींनी दिलेला विचार होता, असे त्यांनी सांगितले. महात्मा गांधी सोबतच कस्तुरबा गांधी यांचेही योगदान तेवढेच तुल्यबळ आहे; मात्र इतिहासकारांनी अन् आमच्या परिवारानेही कस्तुरबांच्या कर्तृतवाची प्रभावी दखल घेतली नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाला प्रख्यात कवी विठ्ठल वाघ, महादेवराव भुईभार, विजय विल्हेकर यांच्यासह अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमानंतर तुषार गांधी यांनी श्रोत्यांच्या प्रश्नांचे निरसन केले. संचालन चंद्रकांत झटाले यांनी केले. तर प्राचार्य डॉ. भीसे यांनी आभार मानले.

टॅग्स :AkolaअकोलाMahatma Gandhiमहात्मा गांधीNarendra Dabholkarनरेंद्र दाभोलकरRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ