शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
3
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
4
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
6
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
7
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
8
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
9
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
10
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
11
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
12
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
13
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
14
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
15
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
16
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
17
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
18
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
19
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
20
आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

गृह राज्यमंत्री रणजित पाटील यांची हकालपटटी करा; अन्यथा १५ दिवसात भूमिका जाहीर करू! - खासदार संजय धोत्रे यांचा मुख्यमंत्र्यांना 'अल्टीमेटम'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 17:16 IST

अकोला : राज्याचे गृह राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी; अन्यथा 15 दिवसांनंतर आपण आपली भूमिका जाहीर करू, असा निवार्णीचा इशारा भारतीय जनता पक्षाचे खासदार संजय धोत्रे यांनी गुरुवारी दिला.

ठळक मुद्देडॉ. रणजित पाटील यांचे मूळ गाव असलेल्या घुंगशी येथील ग्राम पंचायत निवडणुकीदरम्यान उफाळलेल्या वादातून, डॉ. पाटील यांच्या निकटवतीर्यांनी विरोधी गटातील लोकांच्या घरात शिरून त्यांना मारहाण केल्याचा व एका महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप आहे.याचा जाब विचारण्यासाठी खासदार संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा व आमदार रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वात, भाजपाच्या एका शिष्टमंडळाने गुरुवारी पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांची भेट घेतली.डॉ.पाटील यांची मुख्यमंत्र्यांनी तत्काळ मंत्रीमंडळातून हकालपटटी करावी; अन्यथा पंधरा दिवसानंतर आपण व आपले सहकारी भूमिका जाहीर करू, असा निवार्णीचा इशाराच त्यांनी दिला.

अकोला : राज्याचे गृह राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी; अन्यथा 15 दिवसांनंतर आपण आपली भूमिका जाहीर करू, असा निवार्णीचा इशारा भारतीय जनता पक्षाचे खासदार संजय धोत्रे यांनी गुरुवारी दिला.डॉ. रणजित पाटील यांचे मूळ गाव असलेल्या घुंगशी येथील ग्राम पंचायत निवडणुकीदरम्यान उफाळलेल्या वादातून, डॉ. पाटील यांच्या निकटवतीर्यांनी विरोधी गटातील लोकांच्या घरात शिरून त्यांना मारहाण केल्याचा व एका महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार करूनही पोलिसांनी गुन्हे का दाखल केले नाहीत, याचा जाब विचारण्यासाठी खासदार संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा व आमदार रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वात, भाजपाच्या एका शिष्टमंडळाने गुरुवारी पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांची भेट घेतली. त्यानंतर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात प्रसारमाध्यमांना संबोधित करताना, खा. धोत्रे यांनी डॉ. रणजित पाटील यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आणि त्यांच्या हकालपट्टीची मागणी केली.खा. धोत्रे व डॉ. पाटील यांच्यातील बेबनाव नवा नाही. दोन्ही गट सतत एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात असतात. डॉ पाटील यांच्या घुंगशी या गावातील ग्रामपंचायत निवडणुकीवरून या दोन गटांमधील वाद नव्याने उफाळला आहे. निवडणुकीदरम्यान डॉ. पाटील यांच्या गटातील लोकांनी विरोधी गटातील हिंमतराव देशमुख यांच्यावर हल्ला करून, त्यांचे बोटच दातांनी तोडून टाकण्याचा प्रकार घडला आहे. याशिवाय इतरही काही जणांना मारहाण व एका महिलेचा विनयभंग केल्याचाही आरोप आहे. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती; मात्र पोलिसांनी अद्याप गुन्हे दाखल केलेले नाहीत.या पार्श्वभूमीवर खा. धोत्रे यांनी गृह राज्यमंत्र्याना लक्ष्य करून, त्यांच्यावर अधिकारांचा गैरवापर केल्याचा आरोप केला. शासकीय यंत्रणेला वेठीस धरून मनमानी करणा?्या डॉ.पाटील यांची मुख्यमंत्र्यांनी तत्काळ मंत्रीमंडळातून हकालपटटी करावी; अन्यथा पंधरा दिवसानंतर आपण व आपले सहकारी भूमिका जाहीर करू, असा निवार्णीचा इशाराच त्यांनी दिला.मूर्तिजापूर तालुक्यातील घुंगशी ग्राम पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसह, जिल्ह्यातील इतर तीन ग्राम पंचायतींच्या पोटनिवडणुकांचे निकाल बुधवारी जाहीर झाले. घुंगशी या गावात देशमुख व पाटील गटात अनेक वषार्पासून वाद सुरू आहे. निवडणुकीच्या निमित्ताने तो पुन्हा रंगला होता. निवडणूक निकालाने डॉ. पाटील यांच्या गटाला मोठा धक्का बसला. त्यांचे सर्व उमेदवार पराभूत झाले आहेत. डॉ. पाटील यांच्या गटाच्या विरोधात उभ्या ठाकलेल्या परिवर्तन पॅनलचे सर्व उमेदवार विजयी झाले आहेत.

घुंगशी ग्रामपंचायत निवडणुकीचा आणि त्या निवडणुकीत उद्भवलेल्या वादाशी माझा कुठलाही संबंध नाही. गत वर्षभरात मी त्या गावातही गेलेलो नाही. मी त्या गावाचा मतदारही नाही. त्यामुळे तेथे घडलेल्या प्रकरणाशी माझा संबंध जोडणे चुकीचे आहे. माझ्यावर करण्यात आलेले आरोप सपशेल खोटे आहेत. यापूर्वी अनेकदा ज्या गोष्टींचा माझ्याशी काहीही संबध नाही. त्याच्याशी संबंध जोडून माझ्यावर आरोप झालेत. त्यातलाच हा प्रकार आहे.पुरावे न देता  केवळ व्यक्तीगत द्वेषातून  असे आरोप करणे चुकीचे आहे. घुंगशी येथे झालेला प्रकार निंदनीय आहे.या बाबत कारवाई झालीच पाहिजे. कायद्यनुसार ती होईलच; मात्र केवळ मला अडचणीत आणण्यासाठी खोटे आरोप केले जात आहेत.- डॉ. रणजीत पाटील, गृहराज्य मंत्री, महाराष्ट्र राज्य.

टॅग्स :AkolaअकोलाSanjay Dhotreसंजय धोत्रेministerमंत्रीBJPभाजपा