शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

आरटीई : प्रवेशपात्र बालकांच्या कागदपत्रांची पडताळणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 14:03 IST

२७० बालकांची निवड झाल्यानंतर १८ जुलैपर्यंत तालुकास्तरीय पडताळणी समितीतर्फे बालकांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे.

ठळक मुद्देशिक्षण विभागात पडताळणी समितीतर्फे कागदपत्रांची पडताळणी आणि त्यानंतर प्रवेश अशी ही प्रक्रिया आहे.निवडपात्र बालकांच्या पालकांनी पंचायत समितीच्या शिक्षण विभाग किंवा संबंधित शाळेशी संपर्क साधणे आवश्यक आहे. कागदपत्रांची पडताळणी झाली नाही तर या बालकांना मोफत प्रवेशापासून मुकावे लागणार आहे.

- संतोष वानखडेलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : आरटीई (शिक्षण हक्क अधिनियम) अंतर्गत २५ टक्के मोफत प्रवेशासाठी पहिल्या व दुसºया लॉटरी पद्धतीत निवड होऊनही विहित मुदतीत ३७८ बालकांनी प्रवेश घेतले नाहीत. आता तिसºया लॉटरीत २७० बालकांची निवड झाल्यानंतर १८ जुलैपर्यंत तालुकास्तरीय पडताळणी समितीतर्फे बालकांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे.समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल, दिव्यांग व वंचित घटकांतर्गत येणाºया बालकांसाठी मोफत शिक्षण मिळावे, यासाठी शिक्षण हक्क अधिनियमांतर्गत खासगी शाळांमध्ये २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. जिल्ह्यातील ९३ खासगी शाळांची नोंदणी झाली असून, एकूण ९६५ जागांसाठी अंतिम मुदतीपर्यंत १८८२ प्रवेश अर्ज प्राप्त झाले होते. पहिल्या लॉटरी पद्धतीत ह्यघर ते शाळाह्ण या दरम्यानचे अंतर एक किमीपर्यंत असणाºया ५४३ बालकांची आणि त्यानंतर दुसºया लॉटरी पद्धतीतून ३८८ बालकांची प्रवेशासाठी निवड झाली होती. निवड झाल्यानंतर पंचायत समितीच्या शिक्षण विभागात पडताळणी समितीतर्फे कागदपत्रांची पडताळणी आणि त्यानंतर प्रवेश अशी ही प्रक्रिया आहे. विहित मुदतीत पालकांनी पडताळणीसाठी कागदपत्रे सादर न केल्याने किंवा शिक्षण विभाग, संबंधित शाळेशी संपर्क न साधल्याने प्रवेशपात्र ९३१ पैकी ३७८ बालकांचे प्रवेश झाले नाहीत. उर्वरीत ५५३ बालकांनी प्रवेश घेतले. रिक्त जागांवर प्रवेश व्हावे यासाठी १० जुलै रोजी तिसरी लॉटरी सोडत काढण्यात आली. यावेळी २७० बालकांची निवड झाली. ११ जुलैपासून या बालकांच्या पालकांना ह्यएसएमएसह्ण पाठविले जात आहेत. एसएमएस न आल्यास शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन ह्यअ‍ॅप्लिकेशन वाईज डिटेल्सह्णमध्ये अर्ज क्रमांक लिहून लॉटरी लागली आहे किंवा नाही हे पाहण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. निवडपात्र २७० बालकांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जात असून, १२ जुलैपर्यंत २७ बालकांचे प्रवेश झाले. १८ जुलैपर्यंत पडताळणी समितीतर्फे कागदपत्रांची पडताळणी केली जाणार असून, निवडपात्र बालकांच्या पालकांनी पंचायत समितीच्या शिक्षण विभाग किंवा संबंधित शाळेशी संपर्क साधणे आवश्यक आहे. १८ जुलैपर्यंत कागदपत्रांची पडताळणी झाली नाही तर या बालकांना मोफत प्रवेशापासून मुकावे लागणार आहे.

टॅग्स :washimवाशिमRight To Educationशिक्षण हक्क कायदा