शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

आरटीई : पहिल्या फेरीतील ५६५ प्रवेश प्रलंबितच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 12:16 IST

अकोला: शिक्षण हक्क कायद्याच्या (आरटीई) २५ टक्के प्रवेश प्रक्रियेअंतर्गत पहिल्या फेरीत लॉटरी पद्धतीने निवड झालेल्या जिल्ह्यातील १,८६५ पैकी केवळ १,३०० विद्यार्थ्यांचेच प्रवेश आतापर्यंत निश्चित झाले आहेत.

ठळक मुद्देपहिल्या मुदतवाढीनंतरही ५६५ विद्यार्थ्यांचे प्रवेश अजूनही प्रलंबित आहेत.या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी आता दुसऱ्यांदा मिळालेली १० मेपर्यंतची मुदतवाढ दिलासा देणारी ठरणार आहे. आरटीई प्रवेश प्रक्रियेस १० मेपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अकोला: शिक्षण हक्क कायद्याच्या (आरटीई) २५ टक्के प्रवेश प्रक्रियेअंतर्गत पहिल्या फेरीत लॉटरी पद्धतीने निवड झालेल्या जिल्ह्यातील १,८६५ पैकी केवळ १,३०० विद्यार्थ्यांचेच प्रवेश आतापर्यंत निश्चित झाले आहेत. पहिल्या मुदतवाढीनंतरही ५६५ विद्यार्थ्यांचे प्रवेश अजूनही प्रलंबित असून, या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी आता दुसऱ्यांदा मिळालेली १० मेपर्यंतची मुदतवाढ दिलासा देणारी ठरणार आहे.आर्थिक दुर्बल व मागास घटकातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाचा अधिकार देण्यात आला असून, या विद्यार्थ्यांसाठी २५ टक्के मोफत प्रवेश राखीव ठेवण्यात आले आहेत. या अंतर्गत अकोला जिल्ह्यात २०७ शाळांमध्ये २ हजार ३७५ जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या प्रवेश प्रक्रियेचा लाभ घेण्यासाठी ५ ते ३० मार्च या कालावधीत ६,४१४ पालकांनी आॅनलाइन अर्ज केले. त्यानंतर ९ एप्रिल रोजी लॉटर पद्धतीने विद्यार्थ्यांची १,८६५ निवड यादी जाहीर करण्यात आली. त्यानंतर ११ एप्रिलपासून प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया सुरू झाली. यंदा कागदपत्रे पडताळणी समिती स्थापन करण्यात आली असून, या समितीकडून छाननी झालेल्या विद्यार्थ्यांना निवड झालेल्या शाळांमध्ये प्रवेश देण्यात येत आहे. पहिल्या फेरीत प्रवेश मिळालेल्या पालकांना प्रवेश घेण्यासाठी ४ मेपर्यंतची मुदतवाढ दिली होती; मात्र या कालावधीमध्येही अनेकांना प्रवेश मिळाला नसल्याच्या तक्रारी शिक्षण संचालकांकडे करण्यात आल्या होत्या. या पृष्ठभूमीवर आरटीई प्रवेश प्रक्रियेस १० मेपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.मुदत वाढीची ५६५ विद्यार्थ्यांना संधीप्रथम फेरीतील लॉटरी लागलेल्या पालकांना प्रवेश घेण्यासाठी १० मेपर्यंत दिलेल्या मुदतवाढीची अंतिम संधी उपलब्ध झाली आहे. या कालावधीत निवड झालेले; परंतु प्रवेश बाकी असलेल्या ५६५ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे.मुदतीत प्रवेश न झाल्यास दुसºया फेरीत संधी नाही!दिलेल्या कालावधीत प्रवेश निश्चित न केल्यास संबंधित पालकांची अर्ज निकाली काढण्यात येतील. निकाली काढण्यात आलेले अर्ज दुसºया फेरीसाठी ग्राह्य राहत नाही. त्यामुळे ज्या पालकांना पहिल्या फेरीत लॉटरी लागली आहे, त्यांनी बालकांचे प्रवेश तत्काळ निश्चित करून घेणे आवश्यक असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाRight To Educationशिक्षण हक्क कायदाEducation Sectorशिक्षण क्षेत्रStudentविद्यार्थी