शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

आरटीई : पहिल्या फेरीतील ५६५ प्रवेश प्रलंबितच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 12:16 IST

अकोला: शिक्षण हक्क कायद्याच्या (आरटीई) २५ टक्के प्रवेश प्रक्रियेअंतर्गत पहिल्या फेरीत लॉटरी पद्धतीने निवड झालेल्या जिल्ह्यातील १,८६५ पैकी केवळ १,३०० विद्यार्थ्यांचेच प्रवेश आतापर्यंत निश्चित झाले आहेत.

ठळक मुद्देपहिल्या मुदतवाढीनंतरही ५६५ विद्यार्थ्यांचे प्रवेश अजूनही प्रलंबित आहेत.या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी आता दुसऱ्यांदा मिळालेली १० मेपर्यंतची मुदतवाढ दिलासा देणारी ठरणार आहे. आरटीई प्रवेश प्रक्रियेस १० मेपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अकोला: शिक्षण हक्क कायद्याच्या (आरटीई) २५ टक्के प्रवेश प्रक्रियेअंतर्गत पहिल्या फेरीत लॉटरी पद्धतीने निवड झालेल्या जिल्ह्यातील १,८६५ पैकी केवळ १,३०० विद्यार्थ्यांचेच प्रवेश आतापर्यंत निश्चित झाले आहेत. पहिल्या मुदतवाढीनंतरही ५६५ विद्यार्थ्यांचे प्रवेश अजूनही प्रलंबित असून, या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी आता दुसऱ्यांदा मिळालेली १० मेपर्यंतची मुदतवाढ दिलासा देणारी ठरणार आहे.आर्थिक दुर्बल व मागास घटकातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाचा अधिकार देण्यात आला असून, या विद्यार्थ्यांसाठी २५ टक्के मोफत प्रवेश राखीव ठेवण्यात आले आहेत. या अंतर्गत अकोला जिल्ह्यात २०७ शाळांमध्ये २ हजार ३७५ जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या प्रवेश प्रक्रियेचा लाभ घेण्यासाठी ५ ते ३० मार्च या कालावधीत ६,४१४ पालकांनी आॅनलाइन अर्ज केले. त्यानंतर ९ एप्रिल रोजी लॉटर पद्धतीने विद्यार्थ्यांची १,८६५ निवड यादी जाहीर करण्यात आली. त्यानंतर ११ एप्रिलपासून प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया सुरू झाली. यंदा कागदपत्रे पडताळणी समिती स्थापन करण्यात आली असून, या समितीकडून छाननी झालेल्या विद्यार्थ्यांना निवड झालेल्या शाळांमध्ये प्रवेश देण्यात येत आहे. पहिल्या फेरीत प्रवेश मिळालेल्या पालकांना प्रवेश घेण्यासाठी ४ मेपर्यंतची मुदतवाढ दिली होती; मात्र या कालावधीमध्येही अनेकांना प्रवेश मिळाला नसल्याच्या तक्रारी शिक्षण संचालकांकडे करण्यात आल्या होत्या. या पृष्ठभूमीवर आरटीई प्रवेश प्रक्रियेस १० मेपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.मुदत वाढीची ५६५ विद्यार्थ्यांना संधीप्रथम फेरीतील लॉटरी लागलेल्या पालकांना प्रवेश घेण्यासाठी १० मेपर्यंत दिलेल्या मुदतवाढीची अंतिम संधी उपलब्ध झाली आहे. या कालावधीत निवड झालेले; परंतु प्रवेश बाकी असलेल्या ५६५ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे.मुदतीत प्रवेश न झाल्यास दुसºया फेरीत संधी नाही!दिलेल्या कालावधीत प्रवेश निश्चित न केल्यास संबंधित पालकांची अर्ज निकाली काढण्यात येतील. निकाली काढण्यात आलेले अर्ज दुसºया फेरीसाठी ग्राह्य राहत नाही. त्यामुळे ज्या पालकांना पहिल्या फेरीत लॉटरी लागली आहे, त्यांनी बालकांचे प्रवेश तत्काळ निश्चित करून घेणे आवश्यक असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाRight To Educationशिक्षण हक्क कायदाEducation Sectorशिक्षण क्षेत्रStudentविद्यार्थी