शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

८४ खेडी योजनेत  ७७ लाख रुपयांच्या भ्रष्टाचाराची गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 12:55 IST

अकोला: खारपाणपट्ट्यातील गावांना कायमस्वरूपी पाणी पुरवठा करण्यासाठी ८४ खेडी योजनेची जलवाहिनी, पाण्याच्या टाक्या तसेच इतर दुरुस्तीसाठी मिळालेल्या १० कोटी २० लाख रुपयांच्या खर्चात ७७ लाख रुपयांच्या भ्रष्टाचाराची गळती झाल्याचे पुढे येत आहे.

सदानंद सिरसाट,अकोला: खारपाणपट्ट्यातील गावांना कायमस्वरूपी पाणी पुरवठा करण्यासाठी ८४ खेडी योजनेची जलवाहिनी, पाण्याच्या टाक्या तसेच इतर दुरुस्तीसाठी मिळालेल्या १० कोटी २० लाख रुपयांच्या खर्चात ७७ लाख रुपयांच्या भ्रष्टाचाराची गळती झाल्याचे पुढे येत आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने अमरावती विभागीय कार्यालयात सादर केलेल्या अहवालात हा भ्रष्टाचार उघड झाला आहे. विशेष म्हणजे, ‘लोकमत’ने आॅक्टोबर २०१८ मध्ये सातत्याने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार चौकशी अहवाल तयार झाला आहे.८४ खेडी योजनेचे पाणी शेवटच्या टाकीत पोहोचविण्याच्या उपाययोजनेवर २०१५-१६ मध्ये १० कोटी २० लाख रुपये खर्च झाले. तरीही २७ गावांतील टाकीत पाणी पोहोचत नसल्याचा धक्कादायक प्रकार जिल्हा परिषद, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अभियंत्यांच्या संयुक्त पाहणीत उघड झाला. तो अहवाल दाबून ठेवण्यात आला. त्यावेळी ‘लोकमत’ने १४ आॅक्टोबर २०१८ रोजी प्रसिद्ध केलेल्या वृत्तात दुरुस्तीमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाल्याची बाब मांडली होती.- ३२ लाखांचे पाइप गायब८४ खेडी योजनेतील गावांना पुरेशा प्रमाणात पाणी पुरवठा होत नसल्याने ग्रामस्थांनी गावातून जाणाऱ्या जलवाहिनीवरच नळ जोडणी केली. ही समस्या निकाली काढण्यासाठी गावातून जाणारी जलवाहिनी लोखंडी (डीआय) करणे आवश्यक होते. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने १४४ किमी पीव्हीसी जलवाहिनीपैकी ५६ किमी बदलली, तर काही किरकोळ दुरुस्त्या केल्या. त्यापैकी ३२ लाख रुपये किमतीची ४ किमी ६०० मीटरपेक्षाही अधिक लांबीचे पाइप गायब असल्याची माहिती आहे.- नोंद नसलेल्या लिकेजसाठी २२ लाखांचा खर्चसुरळीत पाणी पुरवठा करण्यासाठी योजनेच्या जलवाहिनीवर असलेल्या ६५० पेक्षाही अधिक लिकेजची दुरुस्ती केल्याचे दाखविण्यात आले. त्याची कुठेही नोंद नसताना त्यावर २२ लाखांपेक्षाही अधिक रकमेचे देयक अदा करण्यात आले.- फ्लो मीटरच नाहीत; तीन लाखांचे देयक अदाविशेष म्हणजे, योजनेसाठी दोन फ्लो मीटर घेण्यात आले. त्यासाठी तीन लाखांचे देयकही कंत्राटदाराला देण्यात आले. ते मीटर अस्तित्वातच नसल्याचे चौकशीत पुढे आले. सर्व बाबींची जबाबदारी असलेले तत्कालीन उपअभियंता एच. जी. ताठे यांनी चौकशीमध्ये कोणतीच माहिती दिली नसल्याचेही पुढे आले आहे.- योजनेतील तहानलेली गावे!धनकवाडी, करतवाडी अ, सावरगाव, विटाळी, पुंडा, बांबर्डा, रोहणखेड, कावसा बु., कावसा खु., तरोडा, रेल, धारेल, दनोरी-पनोरी, दहीहांडा, वडद बु., केळीवेळी, जऊळखेड बु., ठोकबर्डी, पाटसुल, लामकानी, पळसोद, निजामपूर, देवर्डा, पारळा, किनखेड, पिलकवाडी, हनवाडी, नांदखेड, सांगवी, नेर व पिवंदळ खु. या गावांमध्ये टाकीत पाणी पोहोचलेले नाही.जिल्हा परिषद कोल्हे आक्रमकत्यानंतर १ नोव्हेंबर २०१८ रोजी स्थायी समितीच्या सभेत खारपाणपट्ट्यातील गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी झालेल्या खर्चातील भ्रष्टाचारावर खडाजंगी झाली. तेल्हारा, अकोट तालुक्यातील गावांची तहान भागविण्याच्या निधीवरही डल्ला मारण्याच्या या वृत्तीचा जिल्हा परिषद सदस्य गोपाल कोल्हे यांनी चांगलाच समाचार घेतला होता. या प्रकाराने जाग आलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अमरावती विभागीय कार्यालयाने अकोला कार्यालयाला चौकशीचे निर्देश दिले. ‘लोकमत’ने उपस्थित केलेल्या मुद्यांसह चौकशी झाली. अहवाल अमरावती विभागीय कार्यालयात सादर झाला आहे. कोट्यवधींच्या भ्रष्टाचारप्रकरणी दोषींवर कारवाई झालीच पाहिजे, यासाठी लढा देणार असल्याचे कोल्हे यांनी सांगितले.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद