शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

पाच एकर कपाशीवर फिरवला ‘रोटाव्हेटर’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 12:33 IST

मुरलीधर पाटील यांनी पाच एकर शेतातील कपाशी पिकावर रोटाव्हेटर फिरवला.

- संतोष गव्हाळे  लोकमत न्यूज नेटवर्कहातरुण : परतीच्या पावसाने पिकांची नासाडी केली. शेतात पिकापेक्षा गवत वाढले. पाने व फुले गळतीने कपाशीच्या शेतात फक्त झाडेच उभी होती. लावलेला खर्चही वसूल होत नसल्याची शक्यता वाढल्याने हातरूण येथील मुरलीधर पाटील यांनी पाच एकर शेतातील कपाशी पिकावर रोटाव्हेटर फिरवला.खारपाणपट्ट्यातील शेतशिवारात कपाशीचे पीक शेतकऱ्यांना चार पैसे हाती देईल, अशा उत्तम स्थितीत असताना परतीच्या पावसाने पिकांची स्थिती विदारक झाली. शेतकरी मुरलीधर पाटील यांचे अंदुरा भाग दोन शिवारात मोर्णा नदी काठालगत गट नंबर २१६ मध्ये ५.५ एकर शेती आहे. सन २०१६ मध्ये बँकेचे एक लाख ८५ हजार कर्ज काढले होते. नंतर कर्जाचे पुनर्गठन केले. २०१६ चे पुनर्गठन असूनसुद्धा कर्जमाफी मिळाली नाही. कर्जासाठी बँकेच्या चकरा मारल्या; मात्र निराशा झाली. सावकाराकडून खरीप हंगामातील पेरणीसाठी कर्ज काढले. त्यानंतर संपूर्ण शेतीसाठी १५ हजार रुपयांचे बियाणे घेतले. पेरणीचा खर्च १० हजार रुपये झाला. मशागतीसाठी शेतीला १० हजार लागले. निंदण मजुरी ३० हजार असा एकूण ६५ हजार रुपये खर्च लागला. सतत तीन महिने पाऊस सुरू राहल्याने शेतात पिकापेक्षा गवत वाढले. शेतात जाण्यासाठी एकमेव असलेल्या रस्त्यावर चिखल असल्याने शेतीची मशागत करता आली नाही. हिरवे स्वप्न साकार होईल, असे वाटत असताना दिवाळीपूर्वी परतीच्या पावसाने कहर केला. त्यामुळे कपाशीच्या पाने व फुलांची मोठ्या प्रमाणात गळती झाली. बोंड्यातून बाहेर आालेला कापूस वेचणी न झाल्याने भिजला असून, कापसाचा सडा शेतशिवारात पडला आहे. कपाशीची बोंडे सडली. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला. पिकासाठी लावलेला खर्चही वसूल होणार नसल्याने निराश होऊन संपूर्ण ५.५ एकरातील कपाशी पिकावर रोटाव्हेटर फिरवला आहे. दिवाळी सणाला दिवा लावण्यासाठी व पूजेसाठी नवा कापूस घरी नव्हता, अशी भीषण ओल्या दुष्काळाची परिस्थिती ग्रामीण भागात आहे.पिकावर रोटाव्हेटर मारल्यानंतर रब्बी हंगामासाठी पैसा नाही. वर्षभर घरखर्च कसा चालवायचा, असा प्रश्न आहे.सावकाराचे कर्ज डोक्यावर आहे. शासनाच्या कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. नुकसानाचे पंचनामे अजून झाले नाहीत. मदत पदरात कधी पडेल, या प्रश्नांसह भविष्याची चिंता शेतकरी मुरलीधर पाटील यांनी व्यक्त केली.

तीन शेतकऱ्यांनी कपाशी मोडली!यावर्षीच्या खरीप हंगामात सतत पाऊस सुरू राहिल्याने शेती मशागतीची कामे करता आली नाही. कपाशी पीक सततच्या पावसामुळे पिवळे पडले असून, फुले आणि पात्या गळतीमुळे पिकाची स्थिती चिंताजनक झाली. पेरणीपासून कपाशी पिकावर झालेला खर्चही वसूल होणार नव्हता, त्यामुळे आठ एकर कपाशी पिकावर रोटाव्हेटर फिरवला असल्याची माहिती अंदुरा भाग दोन शेतकरी गजानन ठाकरे, पाच एकर कपाशी पीक मोडल्याची माहिती शेतकरी गजानन पाटील यांनी लोकमतशी बोलताना दिली.

कापसाची शेती यावर्षी तोट्याची ठरली. लागलेला खर्चही वसूल होण्याची शक्यता नसल्याने ५.५ एकर शेतातील कपाशीवर रोटाव्हेटर फिरवला. कर्जाचा डोंगर कायम असून, सरकारी मदत पदरात कधी पडेल, याकडे लक्ष लागले आहे.- मुरलीधर पाटील,शेतकरी हातरुण.

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी