शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाला राज्य शासनाने घटनापीठाकडे आव्हान द्यावे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 10:21 IST

Supreme Court पुनर्विचार याचिका दाखल करून आव्हान देण्याची मागणी ओबीसी महासंघाने राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह मुख्य सचिवांकडे शनिवारी निवेदनाद्वारे केली आहे.

अकोला : स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा फटका राज्यातील सहा जिल्हा परिषदांमधील नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या (ओबीसी) ८५ सदस्य आणि त्याअंतर्गत २७ पंचायत समित्यांमधील ११६ सदस्यांना बसला आहे. ओबीसी प्रवर्गातील या सर्व सदस्यांची पदे रिक्त घोषित करण्यात आली असून, लवकरच निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालास राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाकडे पुनर्विचार याचिका दाखल करून आव्हान देण्याची मागणी ओबीसी महासंघाने राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह मुख्य सचिवांकडे शनिवारी निवेदनाद्वारे केली आहे.

जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांमधील आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने ४ फेब्रुवारी रोजी दिलेल्या निकालानुसार अकोला, वाशिम, नागपूर, धुळे, नंदुरबार व पालघर, इत्यादी सहा जिल्हा परिषदांमधील ओबीसी प्रवर्गातील ८५ सदस्य आणि या जिल्हा परिषदांतर्गत २७ पंचायत समित्यांमधील ओबीसी प्रवर्गाच्या ११६ सदस्यांची पदे रिक्त झाली आहेत. या सर्व ठिकाणी नव्याने निवडणुका घेण्याचा कार्यक्रम घोषित करण्यात येणार आहे. त्यामुळे ओबीसी सदस्यांना न्याय देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालास राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाकडे पुनर्विचार याचिका दाखल करून आव्हान द्यावे, अशी मागणी ओबीसी महासंघाच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री व मुख्य सचिवांकडे पाठविलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. या निवेदनावर ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बालमुकुंद भिरड, कार्याध्यक्ष ॲड. संतोष राहाटे, डाॅ. नीलेश उन्हाळे, मुस्ताक शहा, गोपाल राऊत, गोपाल कोल्हे, डाॅ. ओमप्रकाश धर्माळ, प्रदीप मांगुळकर, किरण बोराखडे, सचिन जामोदे, नाना मेहेर, शंकरराव गिरे, विठ्ठल राऊत यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील ओबीसी प्रवर्गातील सदस्यांची पदे रिक्त झाली आहेत. त्यामुळे ओबीसींना न्याय देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालास राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाकडे पुनर्विचार याचिका दाखल करून आव्हान देण्याची गरज आहे. त्यासाठी आम्ही राज्याचे मुख्यमंत्री व मुख्य सचिवांकडे निवेदन पाठवून मागणी केली आहे.

- बालमुकुंद भिरड, अध्यक्ष, ओबीसी महासंघ, अकोला

टॅग्स :AkolaअकोलाSupreme Courtसर्वोच्च न्यायालयAkola ZPअकोला जिल्हा परिषद