शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

प्रकट मुलाखत : दोन घटनांनी ‘प्रश्नचिन्ह’ निर्माण झाले - मतीन भोसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 11:12 IST

७ व्या राज्यस्तरीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनात शनिवारी मतीन भोसले यांची प्रकट मुलाखत झाली.

- नीलिमा शिंगणे-जगड  लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: आयुष्यात असे काही प्रसंग येतात, ज्यामुळे तुमचे संपूर्ण जीवनच बदलून जाते. माझ्याही आयुष्यात असे दोन प्रसंग आले की, ज्यामुळे मी पूर्णपणे बदलत गेलो. एक म्हणजे फासे पारधी समाजाची दोन मुले नाल्याच्या पुरात वाहून गेले आणि दुसरा म्हणजे मुंबईतील दादर रेल्वे स्टेशनवर भीक मागत असताना दोन भीक मागणारी मुले रेल्वेखाली कटून मरण पावली. हे दृश्य एवढे विदारक होते की, मी त्याप्रसंगी आत्महत्येचा विचार केला; मात्र याच प्रसंगातून सावरू न प्रश्नचिन्ह ही भटक्या आणि आदिवासी समाजातील मुलांना शिक्षण देणारी संस्थेची निर्मिती झाली, असे आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी झटणारे सामाजिक कार्यकर्ते मतीन भोसले यांनी सांगितले.७ व्या राज्यस्तरीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनात शनिवारी मतीन भोसले यांची प्रकट मुलाखत झाली. मुलाखत कवी किशोर बळी यांनी घेतली. मतीन भोसले यांचा जीवन प्रवास एकेका प्रसंगातून उलगडत गेला. एवढ्या कष्टातून उभारलेल्या प्रश्नचिन्हावर मात्र आज प्रश्नचिन्ह उभे झाले आहे. त्याचे उत्तर विद्यमान सरकारने द्यायला पाहिजे. समृद्धी महामार्गामुळे प्रश्नचिन्ह संस्था उद्ध्वस्त झाली आहे. प्रश्नचिन्हसाठीचा संघर्ष एका वळणावर असतानाच समृद्धीची कुºहाड प्रश्नचिन्हावर पडली. लोकवर्गणीतून १ कोटी ७७ हजार मदत मिळाली होती. यामधून वर्गखोल्या, वाचनालय, २५० झाडे लावून प्रश्नचिन्हची इमारत दिमाखात उभी राहिली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पालकमंत्री बच्चू कडू यांनी लक्ष घातल्यास नव्याने प्रश्नचिन्हाचा प्रवास सुरू होऊ शकतो, असे भोसले म्हणाले.पारधी समाजाच्या माथ्यावर चोर हा शिक्का बसलेला आहे. पारधी समाजातील मुले, आदिवासी मुले, रस्त्यावर भीक मागणारी मुले यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता शाळा सुरू केली. शाळा चालविण्यासाठी पैसे लागतात. यासाठी भीक मांगो आंदोलन सुरू केले. या आंदोलनात लोकांकडून केवळ एक रुपया मागत होतो. या आंदोलनादरम्यान २१ दिवसांत २८ पोलीस केसेस दाखल झाल्या.मुलांची तस्करी करतात, त्यांच्या किडन्या काढतात, राजस्थानमध्ये मुली विकतात, अशा प्रकारचे आरोप लावण्यात आले होते. याच दरम्यान कारागृहातही डांबण्यात आले. कारागृहातील हा विलक्षण अनुभव होता, असेदेखील भोसले यांनी सांगितले.

टॅग्स :rashtrasant tukdoji maharaj vichar sahitya samelanराष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनAkolaअकोलाinterviewमुलाखत