शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
3
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
4
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
5
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
6
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
7
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
8
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
9
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
10
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
11
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
12
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
13
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
14
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
15
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
16
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
17
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
18
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
19
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
20
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?

११ हजारांची बॅग केली परत, ऑटोरिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा

By admin | Updated: December 31, 2014 00:50 IST

वाहतूक पोलिसांनी दाखविली दक्षता.

अकोला : प्राध्यापकांना शिकवणी शुल्कापोटी देण्याकरिता आणलेल्या ११ हजार रुपयांची बॅग बारावीत शिकणारा तरुण शहरातील टॉवर चौकात ऑटोरिक्षातच विसरला. ऑटोरिक्षा मलकापूरमध्ये गेल्यावर चालकाला हे लक्षात आले. सदर ऑटोरिक्षाचालकाने परत टॉवर चौक गाठून ती बॅग युवकाला परत केली. ही घटना ३0 डिसेंबर रोजी दुपारी घडली.बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील वरुड या गावातील रहिवासी असलेला हृषीकेश दुनारे हा अकोला येथे बारावीचे शिक्षण घेतो. मंगळवारी दुपारी तो शिकवणीचे ११ हजार रुपये प्राध्यापकांना देण्यासाठी बॅगेत घेऊन शहरात आला होता. टॉवर चौकात उतरल्यानंतर तो बॅग ऑटोरिक्षातच विसरला. हृषीकेशला उतरून दिल्यानंतर चालक विजय इंगळे हा ऑटोरिक्षा घेऊन मलकापूरला गेला. त्यानंतर हृषीकेशला बॅग विसरल्याचे लक्षात आले. त्याने चौकातील वाहतूक पोलिसांकडे जाऊन बॅग विसरल्याचे तसेच त्यामध्ये ११ हजार रुपये असल्याचेही सांगितले. पैसे परत मिळतील की नाही, या चिंतेने हृषीकेशला रडू कोसळले होते. चौकातील वाहतूक पोलीस संजय इंगळे व शरद इंगळे यांनी त्याचे सांत्वन करीत, कोणत्या ऑटोत, कोणत्या ठिकाणाहून बसला, याची माहिती घेतली. मात्र, त्याच्याकडे ऑटोरिक्षाचा क्रमांक नव्हता. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी हृषीकेश ज्या ठिकाणी ऑटोरिक्षात बसला त्या ठिकाणी जाऊन तेथे असलेल्या इतर चालकांशी चर्चा केली आणि तो कोणत्या ऑटोरिक्षात बसला, याची माहिती घेतली. त्यांनी दोन ऑटोरिक्षा त्याच्यामागे पाठविल्या. दरम्यान, मलकापूरला पोहोचल्यावर एमएच ३0 - ९६८६ क्रमांकाचा ऑटोरिक्षा असलेला विजय इंगळे यांना प्रवासी बॅग विसरल्याचे लक्षात आले. बॅगेत ११ हजार रुपये असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी मोहाला बळी न पडता, टॉवर चौकात ऑटोरिक्षा परत आणला आणि वाहतूक पोलिसांना याबाबत माहिती दिली. सदर पोलिसांनी विजय इंगळे यांची हृषीकेशशी भेट घालून दिली. बॅग त्याचीच असल्याची खात्री दिल्यानंतर हृषीकेशला पैशांसकट बॅग परत मिळाली. ऑटोरिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणाबद्दल उपस्थित सर्वांनी त्यांचे कौतुक केले.