शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

...तर रिलायन्सच्या सात हजार पोलच्या प्रस्तावाला मंजुरी नाहीच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 12:12 IST

मनपाने आकारलेला दंड कंपनीने जमा न केल्यास रिलायन्सच्या सात हजार पोलच्या प्रस्तावाला मंजुरी देणार नसल्याची भूमिका महापालिका प्रशासनाने घेतली आहे.

ठळक मुद्देअनधिकृतपणे फायबर आॅप्टिक केबलचे जाळे टाकल्या जात असल्याचा प्रकार समोर आला होता. याप्रकरणी महापालिका प्रशासनाच्या विद्युत विभागाने अनधिकृत केबल जप्त करण्याची कारवाई केली होती.मनपासह महावितरण कंपनीची परवानगी आवश्यक असून, खासगी कंपन्यांनी या दोन्ही यंत्रणांची परवानगी घेतली नसल्याची माहिती आहे.

अकोला: महापालिकेची मुख्य जलवाहिनी फोडून लाखो लीटर पाण्याचा अपव्यय करणाºया रिलायन्स जिओ इन्फोकॉम कंपनीने प्रशासनाच्या १२ लाख रुपयांच्या दंडात्मक रकमेला ‘खो’ दिल्याचे समोर आले आहे. यादरम्यान, शहरात सात हजार पोलच्या माध्यमातून घराघरांत फायबर आॅप्टिक केबलचे जाळे पसरविण्यासाठी कंपनीने मनपाक डे प्रस्ताव सादर केल्याची माहिती आहे. जलवाहिनी फोडल्याप्रकरणी मनपाने आकारलेला दंड कंपनीने जमा न केल्यास रिलायन्सच्या सात हजार पोलच्या प्रस्तावाला मंजुरी देणार नसल्याची भूमिका महापालिका प्रशासनाने घेतली आहे.शहरात महावितरण कंपनीचे विद्युत पोल, मनपाचे पथदिवे असणारे खांब तसेच काही नागरिकांच्या इमारतींवर काही कंपन्यांकडून अनधिकृतपणे फायबर आॅप्टिक केबलचे जाळे टाकल्या जात असल्याचा प्रकार समोर आला होता. याप्रकरणी महापालिका प्रशासनाच्या विद्युत विभागाने अनधिकृत केबल जप्त करण्याची कारवाई केली होती. त्यानंतर सत्ताधारी भाजपाने स्थानिक केबल संचालकांना दिलासा देत महापालिकेचे खांब व इमारतींवरून केबल टाकण्यासाठी शुल्क आकारणीचा प्रस्ताव मंजूर केला. यामध्ये एक रुपया खांब आणि इमारतीसाठी १० रुपये असे शुल्क आकारण्यात आले. तत्पूर्वी काही मोठ्या कंपन्यांनी शहरात अनधिकृतरीत्या केबल टाकल्याचे चित्र आहे. नागरिकांच्या घरापर्यंत फायबर आॅप्टिक केबलचे जाळे टाकण्याचे काम शहरातील अग्रवाल व मित्तल नामक खासगी व्हेंडरने घेतली आहे. सदर केबलचे जाळे टाकण्यासाठी मनपासह महावितरण कंपनीची परवानगी आवश्यक असून, खासगी कंपन्यांनी या दोन्ही यंत्रणांची परवानगी घेतली नसल्याची माहिती आहे. अशा स्थितीत शहरात फोर-जी सुविधेसाठी केबलचे जाळे टाकणाºया रिलायन्स इन्फोकॉम कंपनीने मनपाकडे सात हजार पोल उभारण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात ५४० पोल उभारल्या जाणार असून, त्या पोलच्या माध्यमातून नागरिकांच्या घरापर्यंत फायबर केबलचे जाळे टाकण्यात येणार आहे. सदर पोल महापालिकेला एलईडी पथदिव्यांसाठी वापरता येणार असून, त्या मोबदल्यात मनपाला महिन्याकाठी आर्थिक स्वरूपात भाडे दिल्या जाणार असल्याची माहिती आहे. हा प्रस्ताव लक्षात घेताच प्रशासनाने जोपर्यंत रिलायन्स कंपनीकडून १२ लाखांचा दंड जमा केला जात नाही, तोपर्यंत या प्रस्तावाला मंजुरी देणार नसल्याची भूमिका घेतली आहे.

दंड भरण्यास टाळाटाळ!मनपाची मुख्य जलवाहिनी फोडणाऱ्या रिलायन्स कंपनीला दंडापोटी १२ लाख रुपये जमा करणे मोठी बाब नाही. कंपनी दंड जमा करीत नसल्याचे पाहून मनपाने खदान पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी कंपनीविरोधात गुन्हे दाखल केल्यावरही कंपनीने दंड जमा न केला नाही. ही बाब पाहता कंपनीला स्थानिक राजकारण्यांचा वरदहस्त असल्याचे बोलल्या जात आहे. कंपनीला आकारलेला दंड कमी करावा, यासाठी महापालिकेतील भाजपाचे पदाधिकारी आग्रही असल्याची माहिती आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाReliance Communicationsरिलायन्स कम्युनिकेशनmahavitaranमहावितरण