शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

रिलायन्सने १२ लाखांचा दंड भरलाच नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 01:52 IST

शहरात फोर-जी केबल टाकण्यासाठी खोदकाम करणार्‍या रिलायन्स जिओ इन्फोकॉम कंपनीने महापालिकेची ९00 मि.मी. व्यासाची मुख्य जलवाहिनी फोडली होती. या प्रकरणात मनपा प्रशासनाने रिलायन्स कंपनीला बारा लाखांचा दंड आकारला होता. मनपाच्या पत्राला केराची टोपली दाखवत कंपनीने दंडाची रक्कम भरलीच नसल्याचे समोर आले आहे.

ठळक मुद्देमहापालिकेच्या पत्राला केराची टोपली

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शहरात फोर-जी केबल टाकण्यासाठी खोदकाम करणार्‍या रिलायन्स जिओ इन्फोकॉम कंपनीने महापालिकेची ९00 मि.मी. व्यासाची मुख्य जलवाहिनी फोडली होती. या प्रकरणात मनपा प्रशासनाने रिलायन्स कंपनीला बारा लाखांचा दंड आकारला होता. मनपाच्या पत्राला केराची टोपली दाखवत कंपनीने दंडाची रक्कम भरलीच नसल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी कंपनीच्या विरोधात फौजदारी तक्रार दाखल करण्याची मागणी भाजपचे नगरसेवक विजय इंगळे यांनी प्रशासनाकडे केली आहे. दक्षिण झोनमधील कौलखेड, खडकी परिसरात रिलायन्स कंपनीच्यावतीने फोर-जी केबल टाकण्यासाठी खोदकाम करण्यात आले. २२ सप्टेंबर रोजी खोदकाम करताना, कंपनीकडून अकोला शहराला पाणी पुरवठा करणारी ९00 मि.मी. व्यासाची मुख्य जलवाहिनी फुटली होती. त्यामुळे शहराला होणारा पाणी पुरवठा खंडित झाला होता. जलवाहिनी दुरुस्त करण्यासाठी किमान तीन दिवसांचा अवधी लागणार होता. पाइपलाइन फुटल्यामुळे लाखो लीटर पाण्याचा अपव्यय झाला होता. या प्रकरणाची दखल घेत महापालिकेच्या जलप्रदाय विभागाने रिलायन्स कंपनीला पत्र पाठवून जलवाहिनी दुरुस्तीसाठी आठ लाख रुपये आणि पाण्याच्या अपव्यय झाल्यामुळे चार लाख रुपये असा एकूण बारा लाखांचा दंड आकारला होता. दीड महिना उलटून गेल्यानंतरही रिलायन्स कंपनीने मनपाकडे दंडाची रक्कम जमा केली नाही. मनपाकडून कंपनीला झुकते माप दिल्या जात असल्याचा आरोप करीत भाजपचे नगरसेवक विजय इंगळे यांनी मनपासह कंपनीच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. कंपनीने दंडाने रक्कम जमा न केल्यास, फौजदारी तक्रार करण्याची मागणी नगरसेवक विजय इंगळे यांनी प्रशासनाकडे केली आहे. 

रिलायन्स कंपनीने दंडाची रक्कम भरण्यास विलंब केल्याची बाब मान्य आहे; परंतु कंपनीला कोणतीही सूट न देता, दंडाची रक्कम वसूल करण्याचे निर्देश दिले आहेत. बुधवारी सायंकाळपर्यंत कंपनीने दंडाची रक्कम जमा न केल्यास फौजदारी स्वरूपाची तक्रार नोंदविण्याचा मार्ग मोकळा आहे. - सुरेश हुंगे, कार्यकारी अभियंता, जलप्रदाय, मनपा.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाReliance Communicationsरिलायन्स कम्युनिकेशन