शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
4
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
5
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
6
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
7
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
8
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
9
१ महिना सूर्य-शनि समोरासमोर: ८ राशींना विशेष लाभ, भरभरून पद-पैसा; शुभ-कल्याण, सुखाचा काळ!
10
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
11
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
12
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना
13
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
14
"महाराष्ट्रातील मतचोरीचाही राहुल गांधींकडून पर्दाफाश, फडणविसांनी तात्काळ राजानीमा द्यावा’’, काँग्रेसची मागणी   
15
डॉक्टरांनी फ्लू सांगितलं पण आईने गुगलवर शोधलं; लेकाला गंभीर आजार असल्याचं समजलं अन्...
16
प्रिती झिंटाच्या संघाची उडाली दाणादाण; फलंदाजांनी केली हाराकिरी, फायनलचं स्वप्न भंगलं?
17
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
18
Lahori Zeera Success Story: १० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
19
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
20
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 

मेळघाटातील पुनर्वसित ग्रामस्थांचा तिढा कायम; जमिनी पाहणार मग निर्णय घेणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 22:40 IST

अकोट : मेळघाटातून पुनर्वसित करण्यात आलेल्या ग्रामस्थांनी पुन्हा मेळघाटातील जुन्या गावी शेतजमिनींसह इतर मागण्यांकरिता आंदोलन सुरू केले आहे. त्यांना जंगलाबाहेर आणण्याकरिता १२ जानेवारी रोजी लोकप्रतिनिधी व अधिकार्‍यांचा ताफा गेला होता. त्यांच्यामध्ये झालेल्या चर्चेत ई-क्लासच्या आधी जमिनी पाहणार व मगच सामूहिक निर्णय घेणार असल्याचे पुनर्वसित गावकर्‍यांनी सांगितले. त्यामुळे सध्यातरी पुनर्वसित गावकर्‍यांना जंगलाबाहेर काढण्याचा तिढा कायम आहे. 

ठळक मुद्देपुनर्वसित ग्रामस्थांचा जंगलाबाहेर आणण्याकरिता १२ जानेवारी रोजी लोकप्रतिनिधी व अधिकार्‍यांचा ताफा गेला होतात्यांच्यामध्ये झालेल्या चर्चेत ई-क्लासच्या आधी जमिनी पाहणार व मगच सामूहिक निर्णय घेणार असल्याचे पुनर्वसित गावकर्‍यांनी सांगितले

लोकमत न्यूज नेटवर्कअकोट : मेळघाटातून पुनर्वसित करण्यात आलेल्या ग्रामस्थांनी पुन्हा मेळघाटातील जुन्या गावी शेतजमिनींसह इतर मागण्यांकरिता आंदोलन सुरू केले आहे. त्यांना जंगलाबाहेर आणण्याकरिता १२ जानेवारी रोजी लोकप्रतिनिधी व अधिकार्‍यांचा ताफा गेला होता. त्यांच्यामध्ये झालेल्या चर्चेत ई-क्लासच्या आधी जमिनी पाहणार व मगच सामूहिक निर्णय घेणार असल्याचे पुनर्वसित गावकर्‍यांनी सांगितले. त्यामुळे सध्यातरी पुनर्वसित गावकर्‍यांना जंगलाबाहेर काढण्याचा तिढा कायम आहे. 

अकोट  व तेल्हारा तालुक्यात मेळघाटातील आठ गावांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. त्यांनी शेत जमिनी मिळण्याकरिता पुन्हा जंगलात जाऊन आंदोलन सुरू केले. या आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्री यांनी शेत जमिनी देण्याबाबत शासन निर्णय जारी केला. त्यानंतर अमरावतीचे पालकमंत्री प्रवीण पोटे, खासदार आनंदराव अडसूळ, आमदार बच्चू कडू, आमदार प्रभुदास भिलावेकर, उप वनसंरक्षक जी. गुरुप्रसाद, अकोला जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, अमरावती जिल्हाधिकारी अभिजित बांगर, अकोट एस.डी.ओ. उदय राजपूत, धारणी एस.डी.ओ. राठोड, अकोट तहसीलदार विश्‍वनाथ घुगे, धारणी, चिखलदरा तहसीलदार यांच्यासह प्रहारचे जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर व इतर पदाधिकारी, अधिकारी, कर्मचार्‍यांचा ताफा केलपाणीला पोहोचला. यावेळी ग्रामस्थांना शासन निर्णयाची माहिती देण्यात आली. उपस्थितांसह आमदार बच्चू कडू यांनी  शासन निर्णय हा तुमच्या आंदोलनाचा विजय असल्याचे समजून सांगितले. जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी शासन निर्णय निघाला, जमिनी शोधल्या, त्यामुळे आपण जंगलातून चला, लोकवस्तीत राहूनसुद्धा प्रश्न सुटू शकतो. प्रश्न जर निकाली निघाला नाही, तर पुन्हा आपण आंदोलन करण्यास मोकळे आहात, असे सांगून शासनाची बाजू मांडली. दरम्यान, पुनर्वसित गावकर्‍यांनी आम्हाला शक्यतोवर धारणी, चिखलदरा या भागात जमिनी देण्यात याव्यात, त्या भागाशी आमचे नाते जुळलेले आहे, असे सांगितले. तसेच देण्यात येणार्‍या ई-क्लासच्या जमिनी पाहण्याचे निमंत्रण शासनाच्यावतीने त्यांना देण्यात आले. याप्रसंगी पुनर्वसित ग्रामस्थांनी त्या जमिनी पाहण्याकरिता  प्रतिनिधींची निवड करण्याकरिता आठ गावांतील गावकर्‍यांची रविवारी बैठक घेण्यात येईल, या बैठकीत ठरल्याप्रमाणे ई-क्लासच्या जमिनी पाहून आल्यानंतर  पुढील निर्णय घेणार असल्याचे ठामपणे अधिकारी व लोकप्रतिनिधींना सांगितले. त्यामुळे जंगलाबाहेर पुनर्वसित गावकर्‍यांना आणण्याकरिता गेलेला फौजफाटा रात्री २ वाजता परतला असून, पुनर्वसित आंदोलनकर्ते अजूनही जंगलात ठिय्या देऊन आहेत. 

टॅग्स :akotअकोटMelghatमेळघाट