शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

मेळघाटातील पुनर्वसित ग्रामस्थांचा तिढा कायम; जमिनी पाहणार मग निर्णय घेणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 22:40 IST

अकोट : मेळघाटातून पुनर्वसित करण्यात आलेल्या ग्रामस्थांनी पुन्हा मेळघाटातील जुन्या गावी शेतजमिनींसह इतर मागण्यांकरिता आंदोलन सुरू केले आहे. त्यांना जंगलाबाहेर आणण्याकरिता १२ जानेवारी रोजी लोकप्रतिनिधी व अधिकार्‍यांचा ताफा गेला होता. त्यांच्यामध्ये झालेल्या चर्चेत ई-क्लासच्या आधी जमिनी पाहणार व मगच सामूहिक निर्णय घेणार असल्याचे पुनर्वसित गावकर्‍यांनी सांगितले. त्यामुळे सध्यातरी पुनर्वसित गावकर्‍यांना जंगलाबाहेर काढण्याचा तिढा कायम आहे. 

ठळक मुद्देपुनर्वसित ग्रामस्थांचा जंगलाबाहेर आणण्याकरिता १२ जानेवारी रोजी लोकप्रतिनिधी व अधिकार्‍यांचा ताफा गेला होतात्यांच्यामध्ये झालेल्या चर्चेत ई-क्लासच्या आधी जमिनी पाहणार व मगच सामूहिक निर्णय घेणार असल्याचे पुनर्वसित गावकर्‍यांनी सांगितले

लोकमत न्यूज नेटवर्कअकोट : मेळघाटातून पुनर्वसित करण्यात आलेल्या ग्रामस्थांनी पुन्हा मेळघाटातील जुन्या गावी शेतजमिनींसह इतर मागण्यांकरिता आंदोलन सुरू केले आहे. त्यांना जंगलाबाहेर आणण्याकरिता १२ जानेवारी रोजी लोकप्रतिनिधी व अधिकार्‍यांचा ताफा गेला होता. त्यांच्यामध्ये झालेल्या चर्चेत ई-क्लासच्या आधी जमिनी पाहणार व मगच सामूहिक निर्णय घेणार असल्याचे पुनर्वसित गावकर्‍यांनी सांगितले. त्यामुळे सध्यातरी पुनर्वसित गावकर्‍यांना जंगलाबाहेर काढण्याचा तिढा कायम आहे. 

अकोट  व तेल्हारा तालुक्यात मेळघाटातील आठ गावांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. त्यांनी शेत जमिनी मिळण्याकरिता पुन्हा जंगलात जाऊन आंदोलन सुरू केले. या आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्री यांनी शेत जमिनी देण्याबाबत शासन निर्णय जारी केला. त्यानंतर अमरावतीचे पालकमंत्री प्रवीण पोटे, खासदार आनंदराव अडसूळ, आमदार बच्चू कडू, आमदार प्रभुदास भिलावेकर, उप वनसंरक्षक जी. गुरुप्रसाद, अकोला जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, अमरावती जिल्हाधिकारी अभिजित बांगर, अकोट एस.डी.ओ. उदय राजपूत, धारणी एस.डी.ओ. राठोड, अकोट तहसीलदार विश्‍वनाथ घुगे, धारणी, चिखलदरा तहसीलदार यांच्यासह प्रहारचे जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर व इतर पदाधिकारी, अधिकारी, कर्मचार्‍यांचा ताफा केलपाणीला पोहोचला. यावेळी ग्रामस्थांना शासन निर्णयाची माहिती देण्यात आली. उपस्थितांसह आमदार बच्चू कडू यांनी  शासन निर्णय हा तुमच्या आंदोलनाचा विजय असल्याचे समजून सांगितले. जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी शासन निर्णय निघाला, जमिनी शोधल्या, त्यामुळे आपण जंगलातून चला, लोकवस्तीत राहूनसुद्धा प्रश्न सुटू शकतो. प्रश्न जर निकाली निघाला नाही, तर पुन्हा आपण आंदोलन करण्यास मोकळे आहात, असे सांगून शासनाची बाजू मांडली. दरम्यान, पुनर्वसित गावकर्‍यांनी आम्हाला शक्यतोवर धारणी, चिखलदरा या भागात जमिनी देण्यात याव्यात, त्या भागाशी आमचे नाते जुळलेले आहे, असे सांगितले. तसेच देण्यात येणार्‍या ई-क्लासच्या जमिनी पाहण्याचे निमंत्रण शासनाच्यावतीने त्यांना देण्यात आले. याप्रसंगी पुनर्वसित ग्रामस्थांनी त्या जमिनी पाहण्याकरिता  प्रतिनिधींची निवड करण्याकरिता आठ गावांतील गावकर्‍यांची रविवारी बैठक घेण्यात येईल, या बैठकीत ठरल्याप्रमाणे ई-क्लासच्या जमिनी पाहून आल्यानंतर  पुढील निर्णय घेणार असल्याचे ठामपणे अधिकारी व लोकप्रतिनिधींना सांगितले. त्यामुळे जंगलाबाहेर पुनर्वसित गावकर्‍यांना आणण्याकरिता गेलेला फौजफाटा रात्री २ वाजता परतला असून, पुनर्वसित आंदोलनकर्ते अजूनही जंगलात ठिय्या देऊन आहेत. 

टॅग्स :akotअकोटMelghatमेळघाट