शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

पवित्र पोर्टलवरील बेरोजगार शिक्षकांची नोंदणी आटोपली; आता शिक्षक भरतीची प्रतीक्षा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 13:37 IST

अकोला: २0१0 पासून शासनाने शिक्षक भरतीवर बंदी घातल्यामुळे राज्यातील शेकडो शाळांमधील पदे रिक्त राहिली. शासनाने ही बंदी मागे घेत, २0 हजार रिक्त पदे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरण्याचा निर्णय घेतला.

अकोला: २0१0 पासून शासनाने शिक्षक भरतीवर बंदी घातल्यामुळे राज्यातील शेकडो शाळांमधील पदे रिक्त राहिली. शासनाने ही बंदी मागे घेत, २0 हजार रिक्त पदे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पोर्टलवर शिक्षक भरतीसाठी बेरोजगार डीएड, बीएड, एमएड पदवीधारक उमेदवारांनी नोंदणी केली. अंदाजे १ लाख ७१ हजार ३४८ उमेदवारांनी पोर्टलवर नोंदणी केली असून, नोंदणीची प्रक्रिया आटोपली आहे; परंतु आता पात्र बेरोजगार उमेदवारांना शिक्षक भरतीसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.शिक्षक भरती बंद असल्यामुळे प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यामिक शाळांमधील रिक्त भरण्याची शिक्षण संस्थाचालकांनी सातत्याने मागणी केली; परंतु शिक्षण संस्थाचालकांकडून बेरोजगार उमेदवारांची आर्थिक लूट होते आणि गुणवत्तासुद्धा जोपासली नव्हती. यामुळे शासनाने शिक्षक भरतीला परवानगी दिली नाही. अखेर शासनाने २0१८ मध्ये शिक्षक भरतीवरील बंदी उठवित, शिक्षकांसाठी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी सुरू केली. ही चाचणी उत्तीर्ण करणाऱ्या बेरोजगार शिक्षकांनी पवित्र पोर्टलवरील नोंदणी करण्यास शासनाने सुविधा उपलब्ध करून दिली होती. शिक्षकाच्या गुणवत्तेचा विचार करूनच त्याची निवड करण्याचे शासनाने स्पष्ट केले होते; परंतु शासनाच्या शिक्षक भरतीला शिक्षण संस्थाचालकांनी विरोध करीत, उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर सुनावणी करताना, न्यायालयाने पवित्र पोर्टलला ३१ मेपर्यंत स्थगिती दिली होती. नंतर मात्र संस्थाचालकांना विश्वासात घेऊन शासनाने शिक्षक भरती करावी, असे स्पष्ट केले. त्यामुळे आता संस्थाचालकांना विश्वासात घेऊन शिक्षक भरती होण्याची शक्यता आहे. त्यासाठी शासनाने बिंदुनामावली अद्ययावत करणे, एसईबीसी प्रवर्ग विचारात घेऊन बिंदुनामावली अद्ययावत करणे, खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना पवित्र प्रणालीवरील व्यक्तिगत माहितीमध्ये बदल करण्याची सुविधा देणे, संचमान्यतेतील गटनिहाय व विषयनिहाय रिक्त पदांची माहिती बिंदुनामावलीनुसार पवित्र पोर्टलवर भरण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे; परंतु पवित्र पोर्टलवरील नोंदणी आटोपल्यानंतर शिक्षक भरती कधी होणार, असा प्रश्न उमेदवारांकडून उपस्थित होत आहे. निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी शिक्षक भरती प्रक्रिया पूर्ण करण्याची मागणी बेरोजगार उमेदवारांकडून होत आहे.फेब्रुवारी महिन्यात भरतीची शक्यताशिक्षक भरती करण्यासाठी पवित्र निवड प्रक्रिया ठरविण्यात आली. निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी फेब्रुवारी महिन्यात शिक्षक भरतीची प्रक्रिया राबविण्यात येण्याची शक्यता असल्याचे शिक्षण विभागातील सूत्रांनी सांगितले.

रिक्त पदांची माहिती बिंदुनामावलीनुसार पवित्र पोर्टलवर भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे शिक्षक भरतीची प्रक्रिया राबविण्याची माहिती देण्यात आली; परंतु त्यात काही बदल झाला. लवकरच शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू होईल. त्या दृष्टिकोनातून हालचाली सुरू आहेत.-प्रकाश मुकुंदशिक्षणाधिकारी, माध्यमिक

 

टॅग्स :AkolaअकोलाTeacherशिक्षक