शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

‘एनएमएमएस’ परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 13:30 IST

अकोला: केंद्र शासनाच्यावतीने आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी संधी मिळावी, या उद्देशाने ‘एनएमएमएस’ शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते.

ठळक मुद्देइयत्ता आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘एनएमएमएस’ परीक्षा घेतली जाते. भारतातून एक लाख विद्यार्थ्यांना ‘एनएमएमएस’ परीक्षा उत्तीर्ण केल्यास शिष्यवृत्ती दिली जाते.महाराष्ट्रातील १0 टक्के विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते.

अकोला: केंद्र शासनाच्यावतीने आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी संधी मिळावी, या उद्देशाने ‘एनएमएमएस’ शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. या परीक्षेसाठी १२ सप्टेंबरपासून नोंदणी सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी करण्याचे आवाहन शिक्षण विभागासह विज्ञान अध्यापक मंडळाने केले आहे.इयत्ता आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘एनएमएमएस’ परीक्षा घेतली जाते. ज्या पालकांचे उत्पन्न दीड लाख रुपयांच्या आत आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येते. भारतातून एक लाख विद्यार्थ्यांना ‘एनएमएमएस’ परीक्षा उत्तीर्ण केल्यास शिष्यवृत्ती दिली जाते. महाराष्ट्रातील १0 टक्के विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. यापूर्वी एनएमएमएस परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांला सहा हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जात होती; परंतु आता त्यात वाढ करण्यात आली असून, वर्षाला १२ हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. अकोला जिल्ह्यातून दरवर्षी या परीक्षेला अडीच ते तीन हजार विद्यार्थी बसतात. ही शिष्यवृत्ती आठवी ते बारावीपर्यंत देण्यात येते; परंतु त्यासाठी विद्यार्थ्याला प्रत्येक वर्गाची परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण करावी लागते. गतवर्षी जिल्ह्यातून एनएमएमएस शिष्यवृत्तीसाठी ३५0 विद्यार्थ्यांची निवड झाली होती. यंदा त्यात वाढ झाली पाहिजे. त्यासाठी आठवी वर्गातील विद्यार्थ्यांनी ‘एनएमएमएस’ परीक्षेसाठी नोंदणी करावी, असे शिक्षण विभागासह जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. रवींद्र भास्कर, अनिल मसने, ओरा चक्रे, अनिल जोशी यांनी कळविले आहे. (प्रतिनिधी)

 

टॅग्स :AkolaअकोलाStudentविद्यार्थीexamपरीक्षा