शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांवरील अतिरिक्त कामांचा भार कमी केल्यास आमूलाग्र बदल शक्य!

By admin | Updated: August 27, 2015 00:49 IST

परिचर्चेतील सूर; संपन्न-सुखवस्तू कुटुंबीयांनी मुलांना सरकारी शाळेतच पाठवावे

अकोला : संपन्न व सुखवस्तू कुटुबियांनी आपल्या मुलांना जिल्हा परिषद व महापालिकेच्या शाळांमध्ये दाखल केल्यास शाळांची स्थिती नक्कीच सुधारेल. मात्र, विविध योजना मार्गी लावण्यासाठी या शाळांमधील शिक्षकांवर वेळोवेळी जो अतिरिक्त भार टाकला जातो, तो शासनाने कमी केल्यास आमूलाग्र बदल शक्य असल्याचा आशावादी सूर ह्यलोकमतह्ण शहर कार्यालयात बुधवारी पार पडलेल्या परिचर्चेत उमटला. सरकारी शाळांची अवस्था अत्यंत बिकट आहे. तेथे सोयी सुविधा नाहीत. शिक्षकांची हजारो पदे रिक्त आहेत. ज्यांना या शाळांची स्थिती सुधारावयाची ते याकडे लक्ष देत नाहीत, कारण त्यांची मुले खासगी व कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकत असल्याने त्यांना सरकारी शाळांमध्ये काही स्वारस्य नाही. अशा परिस्थितीत समाजातील प्रतिष्ठितांना त्यांच्या मुलांना सरकारी शाळांमध्ये पाठवायला लावले की, या शाळा आपोआपाच सुधारतील, असा आदेश अलाहबाद उच्च न्यायालयाने मंगळवार, १८ ऑगस्ट रोजी दिला. सरकारी-निमसरकारी अधिकारी व कर्मचारी, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधी, न्यायाधीश,अशा प्रतिष्ठितांनी या आदेशाचे सक्तीने पालन करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. या आदेशाची सक्ती राज्य शासनानेदेखील महाराष्ट्रात केल्यास, डबघाईस आलेल्या शहरातील महानगरपालिकेच्या शाळा तथा जिल्हा परिषदेच्या शाळांची आणि त्याच ओघाने या शाळांमध्ये शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांंंचे भवितव्य कसे राहील, या विषयावर परिचर्चेत मंथन करण्यात आले. जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या अनेक शाळांमध्ये पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, आसन व्यवस्था यासारख्या मूलभूत सुविधांचा अभाव आहे. दर्जेदार शिक्षणाची हमी नाही. तसेच सामाजिक प्रतिष्ठा जपण्यासाठी पालकांचा इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे अधिक ओढा असल्याने, श्रीमंतच नव्हे तर गरिबाघरची मुलंदेखील या शाळांकडे फिरकेनासी झाली आहेत. परिणामस्वरूप विद्यादानाचं मोलाचं कार्य कराणार्‍या या शाळांमधील शिक्षकांना दर शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला विद्यार्थी संख्या वाढविण्यासाठी वणवण भटकावं लागतं. शासनदेखील निवडणुकीच्या काळात या शिक्षकांना मतदार याद्या तयार करण्यासाठी कामाला लावतं. ही बाब एवढय़ावरच थांबत नाही, तर आरोग्य, बांधकाम आणि शासनाच्या इतर विभागाच्या योजना मार्गी लावण्यासाठी सरकारी शाळांमधील शिक्षकांचा पुरेपूर उपयोग केला जातो. यामुळे विद्यादानाच्या मूळ हेतूला हरताळ फासला जातो. या परिचर्चेत शिक्षण विभागाचे , प्रशासन अधिकारी अनिल बिडवे, शिवसेनेचे राजेश मिश्रा, जितेंद्र काठोळे, जिल्हा परिषद शिक्षक श्याम राऊत, जागृती रात्रशाळेचे मुख्याध्यापक विनायक देशमुख यांनी सहभाग घेतला.