शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

उद्यापासून १९५ पाेलिस शिपाइ पदासाठी भरती प्रक्रिया; प्रशासन सज्ज असल्याची जिल्हा पाेलिस अधीक्षकांची माहिती

By आशीष गावंडे | Updated: June 17, 2024 20:50 IST

उमेदवारांना शारिरीक तसेच कागदपत्रे पडताळणी चाचणीसाठी पोलिस मुख्यालयात बोलविल्या जाणार आहे.

अकाेला: जिल्हा पाेलिस दलाच्यावतीने १९ जून पासून १९५ पाेलिस शिपाइ पदासाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. या पदभरतीसाठी एकूण २१ हजार ८५३ उमेदवारांचे ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले असून यामध्ये १६ हजार १६१ पुरुष उमेदवार, ५ हजार ६९१ महिला उमेदवार तसेच तृतीयपंथी पुरु पुरुष उमेवाराची संख्या एक आहे. निमवाडीस्थित पाेलिस मुख्यालयात बुधवारी सकाळी ५ वाजता पासून या प्रक्रियेला प्रारंभ केला जाणार आहे. यासाठी पाेलिस यंत्रणा सज्ज असल्याची माहिती साेमवारी आयाेजित पत्रकार परिषदेत जिल्हा पाेलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी दिली.

उमेदवारांना शारिरीक तसेच कागदपत्रे पडताळणी चाचणीसाठी पोलिस मुख्यालयात बोलविल्या जाणार आहे. यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गातील ८०० पुरुष उमेदवारांना १९ जून व २० जून राेजी तसेच २१ व २२ जून राेजी १हजार उमेदवारांचा समावेश राहील. २४ जून ते १ जुलै या कालावधीत १हजार ५०० उमेदवारांना बोलाविण्यात येइल. २ जुलै राेजी सर्वसाधारण पुरुष प्रवर्गातील १ हजार ६२ पुरुष उमेदवार बोलावल्या जातील. त्यानंतर ३ जुलै राेजी भुकंपग्रस्त, माजी सैनिक, अंशकालीन, तृतीयपंथी, होमगार्ड, पोलिस पाल्य, खेळाडू, प्रकल्पग्रस्त आदी प्रवर्गातील सर्व पुरुष उमेदवारांना बाेलावून त्यांच्या कागदपत्रांची  पडताळणी केली जाणार असल्याची माहिती जिल्हा पाेलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी दिली. यावेळी अपर जिल्हा पाेलिस अधीक्षक अभय डाेंगरे, स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख पाेलिस निरीक्षक शंकर शेळके उपस्थित हाेते. 

४ जुलै पासून महिला पदासाठी प्रक्रियाआरक्षण प्रर्वगातील महिला उमेदवारांची चाचणी व कागदपत्र पडताळणीची प्रक्रिया ४ जुलै पासून सुरु हाेइल. ४ जुलै व ५ जुलै या दाेन दिवसांच्या कालावधीत १ हजार ५०० महिला उमेदवार व ६ जुलै राेजी महिला आरक्षणातील उर्वरित १ हजार ५४ महिला उमेदवार तसेच १०२ महिला भुकंपग्रस्त, माजी सैनिक, अंशकालीन, अनाथ, होमगार्ड, पोलिस पाल्य, खेळाडू, प्रकल्पग्रस्त अशा एकुण १ हजार १५६ महिला उमेदवारांना पडताळणीसाठी बोलविण्यात आले आहे. उर्वरीत १ हजार ५३५ महिला उमेदवारांची पडताळणी ८ जुलै राेजी पार पडेल. ही पदभरती प्रक्रिया १७ दिवस चालणार आहे. रविवारी या प्रक्रियेला विराम दिला जाणार असल्याचे पाेलिस अधीक्षकांनी सांगितले. 

 उमेदवारांना चार दिवसांची मुदतज्या उमेदवारांना पाेलिस पदभरतीसाठी एकाच दिवशी दोन ठिकाणी किंवा लागोपाठ मैदानी चाचणी व कागदपत्रे पडताळणीसाठी तारीख देण्यात आली असेल, अशा उमेदवारांना एका ठिकाणची पडताळणी आटाेपल्यानंतर दुस-या जिल्हयात जाण्यासाठी किमान ४ दिवसांच्या अंतराने पदभरतीसाठी मुदत देण्यात आली आहे. उमेदवारांना अडचण असल्यास त्यांनी raunak.sarafa mahait.org यावर ईमेल करावा, असे पाेलिस अधीक्षक सिंह यांनी नमुद केले. 

टॅग्स :Policeपोलिस