शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
5
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
6
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
7
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
8
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
9
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
10
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
11
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
12
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
20
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग

बाटलीबंद ज्युस व शीतपेयांमधील घटकांचे प्रमाण ठरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 18:38 IST

शीतपेय तयार करताना त्यात उपयोगात आणल्या जाणाऱ्या घटकांचे प्रमाण आता अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणांतर्गत ठरवून देण्यात येणार.

अकोला: शीतपेय तयार करताना त्यात विविध घटकांचे प्रमाण किती असावे, या संदर्भात आतापर्यंत कुठलाच नियम नव्हता; परंतु यापुढे शीतपेय तयार करताना त्यात उपयोगात आणल्या जाणाऱ्या घटकांचे प्रमाण आता अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणांतर्गत ठरवून देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एफएसएसएआयच्या नवीन नियमावलीचे उल्लंघन केल्यास उत्पादकांवर कठोर कारवाईबाजारपेठेत विक्री होणाºया कुठल्याच शरबत, फळांचा रस तसेच इतर शीतपेयांमध्ये वापरण्यात येणाºया घटकांबद्दल आणि त्यांच्या प्रमाणाबद्दल कुठलेच नियम नव्हते. त्यामुळे उत्पादकांवर कुठलेच निर्बंधही नव्हते; परंतु आता अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने पुढाकार घेत शीतपेय आणि ज्युस यामध्ये फळांचा रस आणि इतर घटकांचे प्रमाण किती असावे, याची नियमावली तयार करण्यास सुरुवात केली आहे. तसेच मसुदा तयार करण्याची प्रक्रिया सुरू असून, एफएसएसएआयच्या नवीन नियमानुसार फळांचा रस, पाणी, सॉलिड, सायट्रिक अ‍ॅसिड यांचे प्रमाण ठरवण्यात आले आहे. अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने फळांचा रस आणि अन्य घटक किती असावेत, याचे प्रमाण ठरवून दिले आहे. या संदर्भात प्राधिकरणाकडून नोटिफिकेशनदेखील काढण्यात आले आहे. त्यानुसार, तज्ज्ञांकडून सूचना मागविण्यात आल्या आहेत. या सूचनांचा विचार करून अंतिम मसुदा तयार केला जाणार आहे. त्यानंतरच या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.असे असेल प्रमाणशीतपेयांमध्ये फळांच्या रसासोबतच सायट्रिक अ‍ॅसिड व इतर घटकांचा समावेश असतो. एफएसएसएआयच्या नवीन नियमानुसार, शीतपेयांमध्ये फळांच्या रसाचे प्रमाण २५ टक्के, तर सायट्रिक अ‍ॅसिडचे प्रमाण ३.५ टक्के असणे आवश्यक आहे. या शिवाय, इतर घटकांचे प्रमाण हे शीतपेयानुसार बदलण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने फळांचा रस आणि सायट्रिक अ‍ॅसिडचे प्रमाण सारखेच ठेवण्यात आले आहे.

या निर्णयामुळे आता शीतपेय तयार करताना उत्पादकांना नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. उत्पादकांनी या नियमांचे पालन न केल्यास त्यांच्यावर अन्न व औषध प्रशासन (एफडीए) द्वारे कारवाई केली जाईल.- नितीन ताथोड, अन्न सुरक्षा अधिकारी, अन्न व औषध प्रशासन, अकोला

 

टॅग्स :AkolaअकोलाHealthआरोग्य