शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
2
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
3
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
4
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
5
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
6
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
7
मंडीमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान; घरं, रस्ते, पूल गेले वाहून, ४ जणांचा मृत्यू, १६ बेपत्ता
8
गॅस सिलेंडर घेताना या बाबींची करा पडताळणी, टळेल संभाव्य धोका
9
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच सारं काही २४ कॅरेट सोन्यांने बनवलेलं...
10
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
11
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
12
ठरलं! 'या' दिवशी जाहीर होणार सीए २०२५ परीक्षेचा अंतिम निकाल; कधी आणि कुठे पाहायचा?
13
"शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला तर निलंबनाचे काय, शेतकऱ्यांसाठी...’’, निलंबनानंतर नाना पटोले आक्रमक 
14
सावत्र बापच बनला हैवान! आईला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर करत होता बलात्कार; मुलगी गर्भवती होताच...
15
Photo: देशातील नंबर-१ इलेक्ट्रिक स्कूटरचे नवीन मॉडेल लॉन्च, एका चार्जवर १२१ किमी धावणार!
16
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, ताफ्यावर फेकली बाटली, बाटलीत होतं... 
17
चातुर्मास कधीपासून सुरू होणार? व्रत-वैकल्ये, सण-उत्सवांची रेलचेल; पाहा, महात्म्य अन् मान्यता
18
मी कुठंही असो.. तो मला शोधतोच! 'त्या' चर्चेवर पहिल्यांदाच व्यक्त झाली काव्या मारन
19
‘सासरा मालीश करायला लावायचा, पती नेत्यांसोबत झोपायला पाठवायचा’, पीडितेच्या आरोपांनी खळबळ
20
जळगावच्या मुलीचे कोल्हापूरमध्ये लग्न! बापाने घेतला गळफास; आईला माहिती होती सगळी गोष्ट

अकोला मेडशी निर्माणाधीन रस्मा खचला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:16 IST

पातूर अकोला मेडशी दरम्यान निर्माणधीन महामार्गाला भंडारज जवळील श्री हनुमान मंदिराकडील बाजूस अवकाळी पावसामुळे रस्त्याच्या कडेने भूस्खलन झाल्याने ...

पातूर अकोला मेडशी दरम्यान निर्माणधीन महामार्गाला भंडारज जवळील श्री हनुमान मंदिराकडील बाजूस अवकाळी पावसामुळे रस्त्याच्या कडेने भूस्खलन झाल्याने प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे याबाबत जागृत नागरिकांनी कंपनीच्या कारभाराविराेधात राेष व्यक्त केला असून गुजरातच्या या कंपनीला अभय काेणाचे असा प्रश्न उपस्थित हाेत आहे

अकोला मेडशी दरम्यान गुजरातच्या एका कंपनीला महामार्गाचे चौपदरीकरण करण्यासाठी केंद्र सरकारने 600 कोटी रुपये वरून अधिक रकमेचे कंत्राट मंजूर केले आहे सदर कंपनी रस्ता निर्माण करताना अतिशय घाईगर्दीने काम करीत असल्यामुळे केवळ आठ दिवसात तयार झालेला रस्तावर भंडारज फाट्या जवळील श्री हनुमान मंदिराच्या कडील बाजू भूस्खलन झाले असल्याचे येथील मंदिर पुजारी यांनी सांगितले

केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नामदार नितीन गडकरी यांच्या दिशा निर्देशानुसार अकोल्यापासून नांदेड पर्यंत म्हणजेच विदर्भ मराठवाडा जोडला जाणारा रस्ता मध्य प्रदेश ते आंध्र प्रदेश या राज्यांनाही ही जोडण्याचं काम करत आहे आहे

त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण भारत सरकार कार्यालय वाशिम यांनी सदर काम शासकीय परिमाणानुसार होणे अपेक्षित आहे हे मात्र हनुमान मंदिराजवळ सदर रस्त्याचं तीन ते चार ठिकाणी भूस्खलन झाल्याने रस्त्याच्या दर्जा संदर्भात नागरिकांनी प्रश्न उभे केले आहे सध्या गुजरातची मोंटे कार्लो कंपनी यांनी या कामाचे कंत्राट घेतले असल्याचे समजते सदर कंपनी ने शासकीय नियमांची पायमल्ली करत असल्याचे अनेक प्रकरणातून पुढे आले आहे नुकतेच अवैध मुरूम उत्खनन चा तारांकित प्रश्न विधान परिषदेतील आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी मांडला होता त्या अनुषंगाने महसूल विभागाने ऐंशी लाख रुपये पर्यंत दंड सदर कंपनीस ठोठावला आहे. त्याबरोबरच सातत्याने नागरिकांनी या कंपनीचा कार्यप्रणाली संबंधात

अनेक तक्रारी जिल्हाधिकारी तहसीलदार बाळापूर उपविभागीय अधिकारी यांच्याकडे केले आहेत. मात्र कंपनीच्या कामाकडे शासकीय यंत्रणा कमालीची डोळेझाक करीत असल्याचा आरोप नागरिकांना वेळोवेळी दिलेल्या निवेदनात केले आहे.

अकोला मेडशी दरम्यान महामार्गाचे चौपदरीकरण करण्यासाठी रस्त्याची इंग्रजकालीन मोठमोठी वृक्ष कत्तल सदर कंपनीने केली असली तरी तोडलेले ओंडके रस्त्याच्या दोन्ही ही बाजूस पडून असल्यामुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ झाल्याची माहिती लोकमतने यापूर्वीच प्रकाशित केली आहे. आता रस्ता भूस्खलनाचा नवा प्रश्न उभा राहिला आहे.