शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
4
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
6
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
7
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
8
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
9
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
10
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
11
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
12
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
13
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
14
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
15
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
16
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
17
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
18
घरांच्या विक्रीला ‘ब्रेक’; पुणे, मुंबईत मोठी घसरण; नव्या विमानतळामुळे...
19
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
20
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
Daily Top 2Weekly Top 5

परतीच्या पावसामुळे कपाशीची पाते, फुले गळाली; सोयाबीन भिजले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2019 14:57 IST

परतीच्या पावसामुळे दोन्ही पिकांचे नुकसान होत असून, काढण्यात आलेले सोयाबीन पाण्याने भिजले आहे. कपाशीची, पाते, फुलगळ सुरू आहे.

अकोला: दोन दिवसांपासून विदर्भात पाऊस पडत असल्याने कपाशी पिकाची पाते, फुले गळाली,सोयाबीन भिजले.फळ पिकांचेही नुकसान झाले .सध्या ईशान्येकडून वारे वाहत असून, २३ आॅक्टोबरपर्यंत परतीच्या पावसाची शक्यता कृषी हवामान तज्ज्ञांकडून वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे.सद्यस्थितीत ईशान्येकडून पावसाचे वारे वाहत असून, राज्यात बहुतांश ठिकाणी परतीचा पाऊस सुरू आहे. दोन दिवसांपासून पश्चिम विदर्भातील काही भागाात पाऊस पडत आहे. हा पाऊस २३ आॅक्टोबरपर्यंत राहील. तर विदर्भात जोर वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. याचा परिणाम खरीप पिकांवर झाला असून, उडीद हातचा गेला आहे. आता सोयाबीन काढणी सुरू आहे. कपाशी पीक काही ठिकाणी बोंड्यावर, बहुतांश ठिकाणी फुले, पात्यावर आले आहे; परंतु परतीच्या पावसामुळे दोन्ही पिकांचे नुकसान होत असून, काढण्यात आलेले सोयाबीन पाण्याने भिजले आहे. कपाशीची, पाते, फुलगळ सुरू आहे. हा पाऊस असाच राहिल्यास पिकांचे मोठे नुकसान होेण्याची शक्यता असल्याने शेतकरी धास्तावला आहे.अकोला जिल्ह्यात शनिवारी बहुतांश ठिकाणी पाऊस पडला. पीक कापणी सुरू असतानाचा हा पाऊस कोसळल्याने शेतकरी, मजुरांना सोयबीन काढणीचे काम अर्धवट सोडावे लागले. काढलेले सोयाबीन पाण्यात भिजले. ट्रॅक्टरही शेतात फसल्याचे प्रकार घडले.

- शेतकरी आर्थिक संकटातया पावसामुळे पपई, लिंबू, संत्रा या फळपिकांचे मोठ्या प्रमाणात फटका बसला,. दिवसभरात अधूनमधून जोरात कोसळलेल्या या पावसामुळे पपई आणि लिंबूची फळे जमिनीवर गळून पडली, तर अंबिया बहारातील संत्राचेही बरेच नुकसान झाले. त्याशिवाय काढणीवर आलेले आणि काढून ठेवलेले सोयाबीन या पावसामुळे भिजल्याने या शेतमालाचा दर्जाही खालावणार आहे. त्यामुळे अवकाळी पावसाच्या रुपाने आलेल्या एका नव्या संकटाने शेतकºयांना पुन्हा आर्थिक संकटात टाकले आहे.सध्या ईशान्येकडून वारे वाहत असून, २३ आॅक्टोबरपर्यंत परतीचा पाऊस राज्यात राहील. विदर्भात हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. खरीप पिकांची काढणी सुरू असेल किंवा झाली असेल तर शेतमालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. पीक भिजणार नाही याची दक्षता घ्यावी.- डॉ. रामचंद्र साबळे,ज्येष्ठ कृषी हवामान शास्त्रज्ञ,पुणे.

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी