शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

परतीच्या पावसामुळे कपाशीची पाते, फुले गळाली; सोयाबीन भिजले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2019 14:57 IST

परतीच्या पावसामुळे दोन्ही पिकांचे नुकसान होत असून, काढण्यात आलेले सोयाबीन पाण्याने भिजले आहे. कपाशीची, पाते, फुलगळ सुरू आहे.

अकोला: दोन दिवसांपासून विदर्भात पाऊस पडत असल्याने कपाशी पिकाची पाते, फुले गळाली,सोयाबीन भिजले.फळ पिकांचेही नुकसान झाले .सध्या ईशान्येकडून वारे वाहत असून, २३ आॅक्टोबरपर्यंत परतीच्या पावसाची शक्यता कृषी हवामान तज्ज्ञांकडून वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे.सद्यस्थितीत ईशान्येकडून पावसाचे वारे वाहत असून, राज्यात बहुतांश ठिकाणी परतीचा पाऊस सुरू आहे. दोन दिवसांपासून पश्चिम विदर्भातील काही भागाात पाऊस पडत आहे. हा पाऊस २३ आॅक्टोबरपर्यंत राहील. तर विदर्भात जोर वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. याचा परिणाम खरीप पिकांवर झाला असून, उडीद हातचा गेला आहे. आता सोयाबीन काढणी सुरू आहे. कपाशी पीक काही ठिकाणी बोंड्यावर, बहुतांश ठिकाणी फुले, पात्यावर आले आहे; परंतु परतीच्या पावसामुळे दोन्ही पिकांचे नुकसान होत असून, काढण्यात आलेले सोयाबीन पाण्याने भिजले आहे. कपाशीची, पाते, फुलगळ सुरू आहे. हा पाऊस असाच राहिल्यास पिकांचे मोठे नुकसान होेण्याची शक्यता असल्याने शेतकरी धास्तावला आहे.अकोला जिल्ह्यात शनिवारी बहुतांश ठिकाणी पाऊस पडला. पीक कापणी सुरू असतानाचा हा पाऊस कोसळल्याने शेतकरी, मजुरांना सोयबीन काढणीचे काम अर्धवट सोडावे लागले. काढलेले सोयाबीन पाण्यात भिजले. ट्रॅक्टरही शेतात फसल्याचे प्रकार घडले.

- शेतकरी आर्थिक संकटातया पावसामुळे पपई, लिंबू, संत्रा या फळपिकांचे मोठ्या प्रमाणात फटका बसला,. दिवसभरात अधूनमधून जोरात कोसळलेल्या या पावसामुळे पपई आणि लिंबूची फळे जमिनीवर गळून पडली, तर अंबिया बहारातील संत्राचेही बरेच नुकसान झाले. त्याशिवाय काढणीवर आलेले आणि काढून ठेवलेले सोयाबीन या पावसामुळे भिजल्याने या शेतमालाचा दर्जाही खालावणार आहे. त्यामुळे अवकाळी पावसाच्या रुपाने आलेल्या एका नव्या संकटाने शेतकºयांना पुन्हा आर्थिक संकटात टाकले आहे.सध्या ईशान्येकडून वारे वाहत असून, २३ आॅक्टोबरपर्यंत परतीचा पाऊस राज्यात राहील. विदर्भात हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. खरीप पिकांची काढणी सुरू असेल किंवा झाली असेल तर शेतमालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. पीक भिजणार नाही याची दक्षता घ्यावी.- डॉ. रामचंद्र साबळे,ज्येष्ठ कृषी हवामान शास्त्रज्ञ,पुणे.

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी