शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात रब्बी पेरणीला वातावरण अनुकूल!

By admin | Updated: October 7, 2015 02:03 IST

मराठवाड्यात रब्बीचा पेरा वाढणार; पश्‍चिम विदर्भात परिस्थिती कमजोर.

अकोला: परतीच्या पावसाने राज्यात बहुतांश ठिकाणी बर्‍यापैकी हजेरी लावल्याने शेतकर्‍यांच्या आशा पल्लवित झाल्या असून, कृषी विभागानेही यावर्षी राज्यात ५५ लाख हेक्टरपेक्षा अधिक रब्बी हंगामाचे नियोजन केले आहे. मराठवाडा, विदर्भात शेतीची मशागतीची कामे जोरात सुरू असून, काही ठिकाणी रब्बी पिकांच्या पेरणीला सुरुवात झाली आहे. यावर्षी खरीप हंगामात पावसाने पाठ फिरवल्याने संपूर्ण राज्यात अवर्षण स्थिती निर्माण झाली आहे; पण परतीच्या पावसामुळे अनेक भागातील शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. कमी पावसाचा सर्वाधिक फटका मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर, बीडसह दक्षिण मराठवाड्याला बसला असून, पश्‍चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा व वाशिम या जिल्हय़ासह राज्यातील इतर जिल्हय़ात कमी पाऊस झाल्याने खरीप पिकांना फटका बसला आहे. यावर्षी सुरुवातीपासूनच पावसाने दडी मारली; परंतु परतीच्या पावसाने बर्‍यापैकी हजेरी लावल्याने यावर्षी रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण तयार झाले असल्याने कृषी विभागाने यावर्षी रब्बी हंगामातील पीक पेरणीचे उद्दिष्ट वाढवले आहे. मराठवाड्यात मागील आठवड्यापासून अधून-मधून पाऊस सुरू आहे. उस्मानाबादमध्ये सोमवारी पाऊस पडला आहे. या पाण्यात पिण्याचे पाणी, जनावरांच्या चार्‍याची परिस्थिती सुधारली नसली तरी या पावसाचा रब्बीला फायदा होणार असल्याने शेतकर्‍यांनी रब्बी ज्वारी, हरभरा, करडईचे नियोजन केले आहे. दोन दिवसात या भागातील शेतकर्‍यांनी स्व. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून दहा लाख क्विंटल बियाणे खरेदी केले आहे. यामध्ये परभणी मोती,ज्योती आदी वाण खरेदीवर भर दिला आहे. यासंदर्भात परभणी येथील कृषीविद्यापीठाचे कुलगुरू तसेच राहूरी येथील महात्मा ज्योतिबा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू बी. वेंकटस्वरलू आणि डॉ. तुकाराम मोरे यांनी मराठवाड्यात परतीच्या पावसाने चांगला दिलासा दिल्याने शेतकर्‍यांनी रब्बीचे नियोजन केले आहे.आमच्याकडून १0 लाख क्विंटलच्यावर बियाणे खरेदी केले आहे. खरेदी सुरू च आहे; परंतु चारा टंचाई आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम आहे. चारा टंचाईवर मात करण्यासाठी चारा लागवडीचे उद्दिष्ट आहे. शेतकर्‍यांना चार्‍याचे बियाणे दिले जात आहे. *राज्यातील रब्बीचे उद्दिष्ट अमरावती विभागासाठी जवळपास ९ लाख ५७ हजार हेक्टरचे नियोजन करण्यात आले आहे. पुणे विभागासाठी २२ लाख हेक्टर, औरंगाबाद विभाग ८ लाख ६0 हजार हेक्टर, लातूर विभाग १२ लाख हेक्टर, कोल्हापूर विभाग ५ लाख हेक्टरवर, नागपूर विभाग ४ लाख १३ हजार हेक्टर, नाशिक विभाग ४ लाख १५ हजार हेक्टर, तर कोकण ३४ लाख हेक्टर.