शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
2
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
3
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
4
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
5
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
6
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
7
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
8
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
9
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
10
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
11
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
12
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
13
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
14
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
15
NEET परीक्षा का बरे होत नसेल हो नीट?
16
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
17
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
18
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
19
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
20
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!

राज्यात रब्बी पेरणीला वातावरण अनुकूल!

By admin | Updated: October 7, 2015 02:03 IST

मराठवाड्यात रब्बीचा पेरा वाढणार; पश्‍चिम विदर्भात परिस्थिती कमजोर.

अकोला: परतीच्या पावसाने राज्यात बहुतांश ठिकाणी बर्‍यापैकी हजेरी लावल्याने शेतकर्‍यांच्या आशा पल्लवित झाल्या असून, कृषी विभागानेही यावर्षी राज्यात ५५ लाख हेक्टरपेक्षा अधिक रब्बी हंगामाचे नियोजन केले आहे. मराठवाडा, विदर्भात शेतीची मशागतीची कामे जोरात सुरू असून, काही ठिकाणी रब्बी पिकांच्या पेरणीला सुरुवात झाली आहे. यावर्षी खरीप हंगामात पावसाने पाठ फिरवल्याने संपूर्ण राज्यात अवर्षण स्थिती निर्माण झाली आहे; पण परतीच्या पावसामुळे अनेक भागातील शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. कमी पावसाचा सर्वाधिक फटका मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर, बीडसह दक्षिण मराठवाड्याला बसला असून, पश्‍चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा व वाशिम या जिल्हय़ासह राज्यातील इतर जिल्हय़ात कमी पाऊस झाल्याने खरीप पिकांना फटका बसला आहे. यावर्षी सुरुवातीपासूनच पावसाने दडी मारली; परंतु परतीच्या पावसाने बर्‍यापैकी हजेरी लावल्याने यावर्षी रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण तयार झाले असल्याने कृषी विभागाने यावर्षी रब्बी हंगामातील पीक पेरणीचे उद्दिष्ट वाढवले आहे. मराठवाड्यात मागील आठवड्यापासून अधून-मधून पाऊस सुरू आहे. उस्मानाबादमध्ये सोमवारी पाऊस पडला आहे. या पाण्यात पिण्याचे पाणी, जनावरांच्या चार्‍याची परिस्थिती सुधारली नसली तरी या पावसाचा रब्बीला फायदा होणार असल्याने शेतकर्‍यांनी रब्बी ज्वारी, हरभरा, करडईचे नियोजन केले आहे. दोन दिवसात या भागातील शेतकर्‍यांनी स्व. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून दहा लाख क्विंटल बियाणे खरेदी केले आहे. यामध्ये परभणी मोती,ज्योती आदी वाण खरेदीवर भर दिला आहे. यासंदर्भात परभणी येथील कृषीविद्यापीठाचे कुलगुरू तसेच राहूरी येथील महात्मा ज्योतिबा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू बी. वेंकटस्वरलू आणि डॉ. तुकाराम मोरे यांनी मराठवाड्यात परतीच्या पावसाने चांगला दिलासा दिल्याने शेतकर्‍यांनी रब्बीचे नियोजन केले आहे.आमच्याकडून १0 लाख क्विंटलच्यावर बियाणे खरेदी केले आहे. खरेदी सुरू च आहे; परंतु चारा टंचाई आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम आहे. चारा टंचाईवर मात करण्यासाठी चारा लागवडीचे उद्दिष्ट आहे. शेतकर्‍यांना चार्‍याचे बियाणे दिले जात आहे. *राज्यातील रब्बीचे उद्दिष्ट अमरावती विभागासाठी जवळपास ९ लाख ५७ हजार हेक्टरचे नियोजन करण्यात आले आहे. पुणे विभागासाठी २२ लाख हेक्टर, औरंगाबाद विभाग ८ लाख ६0 हजार हेक्टर, लातूर विभाग १२ लाख हेक्टर, कोल्हापूर विभाग ५ लाख हेक्टरवर, नागपूर विभाग ४ लाख १३ हजार हेक्टर, नाशिक विभाग ४ लाख १५ हजार हेक्टर, तर कोकण ३४ लाख हेक्टर.