शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात रब्बी पेरणीला वातावरण अनुकूल!

By admin | Updated: October 7, 2015 02:03 IST

मराठवाड्यात रब्बीचा पेरा वाढणार; पश्‍चिम विदर्भात परिस्थिती कमजोर.

अकोला: परतीच्या पावसाने राज्यात बहुतांश ठिकाणी बर्‍यापैकी हजेरी लावल्याने शेतकर्‍यांच्या आशा पल्लवित झाल्या असून, कृषी विभागानेही यावर्षी राज्यात ५५ लाख हेक्टरपेक्षा अधिक रब्बी हंगामाचे नियोजन केले आहे. मराठवाडा, विदर्भात शेतीची मशागतीची कामे जोरात सुरू असून, काही ठिकाणी रब्बी पिकांच्या पेरणीला सुरुवात झाली आहे. यावर्षी खरीप हंगामात पावसाने पाठ फिरवल्याने संपूर्ण राज्यात अवर्षण स्थिती निर्माण झाली आहे; पण परतीच्या पावसामुळे अनेक भागातील शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. कमी पावसाचा सर्वाधिक फटका मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर, बीडसह दक्षिण मराठवाड्याला बसला असून, पश्‍चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा व वाशिम या जिल्हय़ासह राज्यातील इतर जिल्हय़ात कमी पाऊस झाल्याने खरीप पिकांना फटका बसला आहे. यावर्षी सुरुवातीपासूनच पावसाने दडी मारली; परंतु परतीच्या पावसाने बर्‍यापैकी हजेरी लावल्याने यावर्षी रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण तयार झाले असल्याने कृषी विभागाने यावर्षी रब्बी हंगामातील पीक पेरणीचे उद्दिष्ट वाढवले आहे. मराठवाड्यात मागील आठवड्यापासून अधून-मधून पाऊस सुरू आहे. उस्मानाबादमध्ये सोमवारी पाऊस पडला आहे. या पाण्यात पिण्याचे पाणी, जनावरांच्या चार्‍याची परिस्थिती सुधारली नसली तरी या पावसाचा रब्बीला फायदा होणार असल्याने शेतकर्‍यांनी रब्बी ज्वारी, हरभरा, करडईचे नियोजन केले आहे. दोन दिवसात या भागातील शेतकर्‍यांनी स्व. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून दहा लाख क्विंटल बियाणे खरेदी केले आहे. यामध्ये परभणी मोती,ज्योती आदी वाण खरेदीवर भर दिला आहे. यासंदर्भात परभणी येथील कृषीविद्यापीठाचे कुलगुरू तसेच राहूरी येथील महात्मा ज्योतिबा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू बी. वेंकटस्वरलू आणि डॉ. तुकाराम मोरे यांनी मराठवाड्यात परतीच्या पावसाने चांगला दिलासा दिल्याने शेतकर्‍यांनी रब्बीचे नियोजन केले आहे.आमच्याकडून १0 लाख क्विंटलच्यावर बियाणे खरेदी केले आहे. खरेदी सुरू च आहे; परंतु चारा टंचाई आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम आहे. चारा टंचाईवर मात करण्यासाठी चारा लागवडीचे उद्दिष्ट आहे. शेतकर्‍यांना चार्‍याचे बियाणे दिले जात आहे. *राज्यातील रब्बीचे उद्दिष्ट अमरावती विभागासाठी जवळपास ९ लाख ५७ हजार हेक्टरचे नियोजन करण्यात आले आहे. पुणे विभागासाठी २२ लाख हेक्टर, औरंगाबाद विभाग ८ लाख ६0 हजार हेक्टर, लातूर विभाग १२ लाख हेक्टर, कोल्हापूर विभाग ५ लाख हेक्टरवर, नागपूर विभाग ४ लाख १३ हजार हेक्टर, नाशिक विभाग ४ लाख १५ हजार हेक्टर, तर कोकण ३४ लाख हेक्टर.