शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

राज्यात रब्बीची आतापर्यंत ३७ टक्केच पेरणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2019 15:55 IST

राज्यातील रब्बी हंगामातील पीक पेरणीचे क्षेत्र ५६ लाख हेक्टर आहे.

अकोला : राज्यात आतापर्यंत २१ लाख हेक्टर म्हणजेच ३७ टक्केच रब्बी पिकांची पेरणी झाली आहे. परतीचा पाऊस लांबल्याने यावर्षी रब्बी पेरणीचा हंगाम एक महिना पुढे गेला असल्याचे तज्ज्ञाने म्हणणे आहे.राज्यातील रब्बी हंगामातील पीक पेरणीचे क्षेत्र ५६ लाख हेक्टर आहे. आतापर्यंत ९० टक्केच्यावर पेरणी अपेक्षित होती. तथापि, पाऊस आॅक्टोबर, नोव्हेंबर महिन्यातही पडल्याने खरीप हंगामातील पिके काढणीस विलंब झाला. परिणामी रब्बी पिकांच्या पेरणीसाठी मशागतीची कामे उशिरा सुरू झाली. त्यामुळे राज्यात सर्वत्र पेरण्यांना उशीर होत आहे. विदर्भातील अमरावती विभागात यावर्षी ६ लाख ३५ हजार हेक्टरवर पेरणीचे नियोजन करण्यात आले. प्रत्यक्षात आतापर्यंत १ लाख व हजार हेक्टरवर म्हणजेच २६ टक्के क्षेत्रावरच पेरणी झाली आहे. यामध्ये सर्वाधिक हरभरा पेरणीवर शेतकऱ्यांनी भर दिला आहे.दरवर्षी हरभरा पेरणी सर्वसाधारण नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आाठवड्यापर्यंत तर गहू पिकाची पेरणी १५ डिसेंबरपर्यंत करता येते; परंतु यावर्षी ऋतूचक्र बदलले असून, जमीन ओली आहे. म्हणूनच या दोन्ही पिकांची पेरणी १५ डिसेंबरपर्यंत करता येईल, अशी शिफारस करण्यात आली असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. गहू पेरणी १५ जानेवारीपर्यंत होण्याची शक्यताही त्यांनी वर्तविली आहे.

- सिंचनाला पाणी उपलब्धराज्यात जवळपास सर्वच धरणात मुबलक पाणी उपलब्ध असल्याने धरणांच्या क्षेत्रात येणाºया रब्बी पिकांना पाणी मिळणार आहे. म्हणूनच शेतकरी यावर्षी गव्हाची पेरणी १५ जानेवारीपर्यंत करण्याची शक्यता आहे. काही भागात कोरडवाहू क्षेत्रावरही शेतकऱ्यांनी गहू पेरणी केली आहे.

 रब्बी पेरणीचा हंगाम एक महिना पुढे गेला असून, गहू, हरभरा पेरणी १५ नोव्हेंबरपर्यंत केली जाते. यावर्षी १५ डिसेंबरपर्यंत पेरणी करता येईल, अशी शिफारस करण्यात आली आहे.- डॉ.एन.आर. पोटदुखे,विभागप्रमुख,कडधान्य विभाग,डॉ. पंजबाराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.

 

टॅग्स :agricultureशेतीAkolaअकोलाFarmerशेतकरी