शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
6
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
7
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
8
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
9
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
10
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
11
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
12
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
13
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
14
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
15
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
16
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
17
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
18
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
19
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
20
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात रब्बीची आतापर्यंत ३७ टक्केच पेरणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2019 15:55 IST

राज्यातील रब्बी हंगामातील पीक पेरणीचे क्षेत्र ५६ लाख हेक्टर आहे.

अकोला : राज्यात आतापर्यंत २१ लाख हेक्टर म्हणजेच ३७ टक्केच रब्बी पिकांची पेरणी झाली आहे. परतीचा पाऊस लांबल्याने यावर्षी रब्बी पेरणीचा हंगाम एक महिना पुढे गेला असल्याचे तज्ज्ञाने म्हणणे आहे.राज्यातील रब्बी हंगामातील पीक पेरणीचे क्षेत्र ५६ लाख हेक्टर आहे. आतापर्यंत ९० टक्केच्यावर पेरणी अपेक्षित होती. तथापि, पाऊस आॅक्टोबर, नोव्हेंबर महिन्यातही पडल्याने खरीप हंगामातील पिके काढणीस विलंब झाला. परिणामी रब्बी पिकांच्या पेरणीसाठी मशागतीची कामे उशिरा सुरू झाली. त्यामुळे राज्यात सर्वत्र पेरण्यांना उशीर होत आहे. विदर्भातील अमरावती विभागात यावर्षी ६ लाख ३५ हजार हेक्टरवर पेरणीचे नियोजन करण्यात आले. प्रत्यक्षात आतापर्यंत १ लाख व हजार हेक्टरवर म्हणजेच २६ टक्के क्षेत्रावरच पेरणी झाली आहे. यामध्ये सर्वाधिक हरभरा पेरणीवर शेतकऱ्यांनी भर दिला आहे.दरवर्षी हरभरा पेरणी सर्वसाधारण नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आाठवड्यापर्यंत तर गहू पिकाची पेरणी १५ डिसेंबरपर्यंत करता येते; परंतु यावर्षी ऋतूचक्र बदलले असून, जमीन ओली आहे. म्हणूनच या दोन्ही पिकांची पेरणी १५ डिसेंबरपर्यंत करता येईल, अशी शिफारस करण्यात आली असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. गहू पेरणी १५ जानेवारीपर्यंत होण्याची शक्यताही त्यांनी वर्तविली आहे.

- सिंचनाला पाणी उपलब्धराज्यात जवळपास सर्वच धरणात मुबलक पाणी उपलब्ध असल्याने धरणांच्या क्षेत्रात येणाºया रब्बी पिकांना पाणी मिळणार आहे. म्हणूनच शेतकरी यावर्षी गव्हाची पेरणी १५ जानेवारीपर्यंत करण्याची शक्यता आहे. काही भागात कोरडवाहू क्षेत्रावरही शेतकऱ्यांनी गहू पेरणी केली आहे.

 रब्बी पेरणीचा हंगाम एक महिना पुढे गेला असून, गहू, हरभरा पेरणी १५ नोव्हेंबरपर्यंत केली जाते. यावर्षी १५ डिसेंबरपर्यंत पेरणी करता येईल, अशी शिफारस करण्यात आली आहे.- डॉ.एन.आर. पोटदुखे,विभागप्रमुख,कडधान्य विभाग,डॉ. पंजबाराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.

 

टॅग्स :agricultureशेतीAkolaअकोलाFarmerशेतकरी