शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

वऱ्हाडात ४५ टक्के क्षेत्रावर रब्बी पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 18:07 IST

अकोला : यावर्षीच्या पावसाच्या अनिश्चिततेचा परिणाम खरिपासह रब्बी हंगामावर झाला असून, पेरणीची गती खुंटली आहे.आजमितीस पश्चिम विदर्भात (वऱ्हाड) आतापर्यंत विविध पिकांची केवळ ४५ टक्क्यांवर पेरणी झाली आहे.

अकोला : यावर्षीच्या पावसाच्या अनिश्चिततेचा परिणाम खरिपासह रब्बी हंगामावर झाला असून, पेरणीची गती खुंटली आहे.आजमितीस पश्चिम विदर्भात (वऱ्हाड) आतापर्यंत विविध पिकांची केवळ ४५ टक्क्यांवर पेरणी झाली आहे. राज्यातील चित्र असेच आहे. राज्यात आतापर्यंत ५ लाख हेक्टरपर्यंतच रब्बीतील कडधान्याची पेरणी झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत हे अर्धेच क्षेत्र आहे.राज्यात रबी पिकांचे सरासरी क्षेत्र ५६.९३ लाख हेक्टर आहे. तर पश्चिम विदर्भातील अकोला,बुलडाणा,वाशिम,यवतमाळ व अमरावती या पाच जिल्ह्यातील रब्बीचे सरासरी क्षेत्र ६ लाख ४६ हजार ७६४ हेक्टर आहे. यावर्षी आतापर्यंत केवळ २ लाख ८८ हजार ३६१ हेक्टर म्हणजेच ४५ टक्के रब्बी पिकांची पेरणी झाली आहे. यात २ लाख ५० हजार २५४ हेक्टरवर हरभरा पेरणी झाली आहे. राज्यात राज्यातही हेच चित्र आहे.यावर्षी कमी पाऊस झाल्याने जमिनीत पूरेसा ओलावा नाही,बहुतांश ठिकाणी जमिनाला आतापासूनच भेगा पडल्या आहेत परिणामी रब्बी पेरणीवर परिणाम झाला आहे. वºहाडात आतापर्यंत ८० टक्केच्यावर पेरणी अपेक्षित होती तथापि यावर्षी ५५ टक्के रब्बीचे क्षेत्र पेरणीविना आहे. दरम्यान, जेथे संरक्षीत ओलीताची सोय आहे तेथील शेतकऱ्यांनी रब्बी गहू,हरभरा पेरणी केली आहे. जेथे ओलीताची व्यवस्था नाही तेथील शेतकºयांनी धाडस करू न रब्बी पेरणी केली पण ओलावा नसल्याने बºयाच ठिकाणी हरभºयावर परिणाम झाला आहे.राज्यात मागच्या २ नोव्हेंबरपर्यंत १३ टक्के पेरणी झाली होती.पेरण्यांची गती संथ असल्याने आतापर्यंत यात तेवढी गती आली नसल्याने यावर्षी रब्बीचे क्षेत्र मोठ्याप्रमाणात कोरडे राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गतवर्षी राज्यात आतापर्यंत १० लाख हेक्टरवर रब्बीतील कडधान्य पिकांची पेरणी झाली होती. यावर्षी हे क्षेत्र अर्धेच आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी