शहरं
Join us  
Trending Stories
1
जिंकलो रे राजेहो ! उपोषण सोडताना मनोज जरांगे यांचे आनंदोद्गार; आंदोलकांनी उधळला गुलाल
2
आजचे राशीभविष्य, ०३ सप्टेंबर २०२५: आज नवीन काम सुरू करू नका, स्वकीयांचे गैरसमज होतील
3
टीम इंडियाच्या मुख्य प्रायोजकत्वासाठी अर्ज करा! BCCIने मागविल्या बोली; अंतिम तारीखही दिली
4
कळा वाढल्याने भररस्त्यात रुग्णवाहिकेतच केली प्रसूती; डॉक्टरांच्या निर्णयामुळे मायलेक सुखरूप
5
मोठी झेप! भारताने बनविली स्वदेशी ‘विक्रम’ चिप! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण
6
माझ्या आईबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांना बिहारची जनता माफ करणार नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी
7
एलिफंटा, न्हावा बेटावर पर्यटनासाठी मास्टर प्लॅनिंग; सिडको करणार विकास; ग्रामस्थ संभ्रमात
8
दहशतवादाविरोधात दुतोंडी भूमिका नको; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे SCO मध्ये पाकिस्तानला खडेबोल
9
जम्मू काश्मीर: पूंछ जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न भारतीय लष्कराने हाणून पाडला !
10
अफगाणिस्तानच्या पूर्व भागात रात्री ६ रिक्टर स्केल क्षमतेचा तीव्र भूकंप; ८०० लोकांचा मृत्यू
11
मराठा आरक्षण: सरकारचा मसुदा तयार; लवकरच निर्णय; मुख्यमंत्री अन् उपसमितीची संयुक्त बैठक
12
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
13
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
14
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
15
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
16
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
17
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
18
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
19
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
20
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला

 रब्बी हंगामातील हरभऱ्याची वाढ खुंटली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 12:10 IST

पिकाची वाढ होण्यासाठी शेतकºयांनी विविध टॉनिक फवारणीचा प्रयत्न सुरू केल्याने त्यांचा खर्चही वाढला आहे.

अकोला : शेतकºयांनी यावर्षी उशिरा पेरणी केलेल्या रब्बी हंगामातील हरभºयांची वाढ खुंटल्याने शेतकºयांची चिंता वाढली आहे. या पिकाची वाढ होण्यासाठी शेतकºयांनी विविध टॉनिक फवारणीचा प्रयत्न सुरू केल्याने त्यांचा खर्चही वाढला आहे.गतवर्षी पाऊस नोव्हेंबर महिन्यापर्यंत सुरू होता. शेतकºयांना शेतीची कोणतीच कामे करता न आल्याने शेतात प्रचंड तण वाढले होते. पाऊस गेल्यानंतर वापसा येण्यासाठी शेतकºयांना प्रतीक्षा करावी लागली. हरभरा पेरणी ही आॅक्टोबर व नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात करणे अपेक्षित असते. तथापि, यावर्षी डिसेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत शेतकºयांनी पेरणी केली. म्हणजेच रब्बी पेरणीचा हंगाम एक महिना पुढे गेला. गहू पेरणी तर आणखी सुरू आहे; परंतु उशिरा केलेल्या पेरणीमुळे अनेक भागातील हरभरा पिकाची वाढ झाली नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे पीक वाढीसाठी शेतकरी या पिकावर विविध प्रकारची औषध (टॉनिक) फवारणी करीत आहे. काही भागात हरभरा पीक पिवळे पडत असल्याने बुरशीनाशक फवारणी करण्यात येत आहे. हरभºयाचे झाड वाढावीत, यासाठीचे विविध प्रयत्न करीत असताना घाटेअळीने तोंड वर काढले आहे. या अळीच्या व्यवस्थापनासाठी कीटकनाशकांची फवारणीही शेतकºयांना करावी लागत आहे.विदर्भात खरीप हंगामातील सोयाबीन, ज्वारी, मूग व उडीद ही नगदी पिके काढल्यानंतर शेतकरी गहू, हरभरा पिकांची पेरणी करतात. ज्यांच्याकडे संरक्षित सिंचनाची व्यवस्था आहे. त्या ठिकाणी शेतकरी गहू पेरणी करतात. हरभरा सहसा कोरडवाहूच घेतला जात; परंतु यावर्षी पेरण्यांना उशीर झाल्याने हरभºयाच्या झाडांची अपेक्षित वाढ झाली नसल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी तर अगदी लहान झाडांना फुलोरा आला आहे. याचा परिणाम पीक उत्पादनावर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी