शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

 रब्बी हंगामातील हरभऱ्याची वाढ खुंटली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 12:10 IST

पिकाची वाढ होण्यासाठी शेतकºयांनी विविध टॉनिक फवारणीचा प्रयत्न सुरू केल्याने त्यांचा खर्चही वाढला आहे.

अकोला : शेतकºयांनी यावर्षी उशिरा पेरणी केलेल्या रब्बी हंगामातील हरभºयांची वाढ खुंटल्याने शेतकºयांची चिंता वाढली आहे. या पिकाची वाढ होण्यासाठी शेतकºयांनी विविध टॉनिक फवारणीचा प्रयत्न सुरू केल्याने त्यांचा खर्चही वाढला आहे.गतवर्षी पाऊस नोव्हेंबर महिन्यापर्यंत सुरू होता. शेतकºयांना शेतीची कोणतीच कामे करता न आल्याने शेतात प्रचंड तण वाढले होते. पाऊस गेल्यानंतर वापसा येण्यासाठी शेतकºयांना प्रतीक्षा करावी लागली. हरभरा पेरणी ही आॅक्टोबर व नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात करणे अपेक्षित असते. तथापि, यावर्षी डिसेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत शेतकºयांनी पेरणी केली. म्हणजेच रब्बी पेरणीचा हंगाम एक महिना पुढे गेला. गहू पेरणी तर आणखी सुरू आहे; परंतु उशिरा केलेल्या पेरणीमुळे अनेक भागातील हरभरा पिकाची वाढ झाली नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे पीक वाढीसाठी शेतकरी या पिकावर विविध प्रकारची औषध (टॉनिक) फवारणी करीत आहे. काही भागात हरभरा पीक पिवळे पडत असल्याने बुरशीनाशक फवारणी करण्यात येत आहे. हरभºयाचे झाड वाढावीत, यासाठीचे विविध प्रयत्न करीत असताना घाटेअळीने तोंड वर काढले आहे. या अळीच्या व्यवस्थापनासाठी कीटकनाशकांची फवारणीही शेतकºयांना करावी लागत आहे.विदर्भात खरीप हंगामातील सोयाबीन, ज्वारी, मूग व उडीद ही नगदी पिके काढल्यानंतर शेतकरी गहू, हरभरा पिकांची पेरणी करतात. ज्यांच्याकडे संरक्षित सिंचनाची व्यवस्था आहे. त्या ठिकाणी शेतकरी गहू पेरणी करतात. हरभरा सहसा कोरडवाहूच घेतला जात; परंतु यावर्षी पेरण्यांना उशीर झाल्याने हरभºयाच्या झाडांची अपेक्षित वाढ झाली नसल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी तर अगदी लहान झाडांना फुलोरा आला आहे. याचा परिणाम पीक उत्पादनावर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी