बुलडाणा : जनसामान्याची अहोरात्र सेवा करणारे एस.टी.महामंडळ नेहमीच तोट्यात असते, आता तर महामंडळचे अस्तीत्वच धोक्यात आल्याची भिती व्यक्त केल्या जात आहे. एस.टी.ला धोका नाही असे सरकार कितीही सांगत असले तरी आपण काळाची पावले ओळखली पाहिजे. नोकर्या टीकवायच्या असतील तर प्रवाशांना चांगली सेवा द्या. एस.टी.वाचली तरच नोकर्या वाचतील असा सल्ला खा. रामदास आठवले यांनी दिला. कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटनेचे ८ वे द्वीवार्षीक अधिवेशन बुलडाणा येथे १८ फेब्रुवारी रोजी पार पडले. यावेळी उद्घाटनपर भाषणात खा. आठवले बोलत होते. स्वगताध्यक्ष म्हणून राज्य उपाध्यक्ष बाबासाहेब जाधव तर प्रमुख अतिथी म्हणून माजी सनदी अधिकारी उत्तमराव खोब्रागडे, आ. हर्षवर्धन सपकाळ, आ. अशोक उईके, जि.प.चे माजी सभापती दिलीप जाधव, सुनिल निरभवणे, संस्थापक अध्यक्ष पी.टी.खंडारे, एच.बी.तायडे, नरहरी गवई, अरविंद जगताप, व्ही.के.रामटेके, दादाराव गायकवाड यांची उपस्थिती होती. यावेळी ह्यएस.टी.चे अस्तीत्व संपुष्टात आनणारे रस्ते वाहतुक सुरक्षा विधेयक २0१४ मधील जाचक कलम रद्द कराह्ण असा ठराव पारीत करून एस.टी.बचाव अभियाणाला सुरूवात करण्यात आली. प्रास्ताविक भाषणात निमंत्रक सुनिल निरभवणे यांनी संघटनेची भुमिका मांडली. ते म्हणाले की, प्रस्तावित रस्ते वाहतुक २0१४ विधेयकाती १४५, ४७ आणि १४८ या कलमान्वये टप्पा वाहतुक देण्याचा अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थेला राहणार आहे.टेंडर पध्दतीने रस्ते विकल्या जातील, अर्थतातच नफ्याचे मार्ग एस.टी.ला मिळणार नाही त्यामुळे एसटीचे अस्तीत्व संपुष्टात येईल पर्यायाने कर्मचार्यांच्या नोकर्या धोक्यात येतील त्यामुळे हे विधेयक संसदेत संमत होणार नाही त्यासाठी जनजागृती होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगीतले. यावेळी सामाजिक, राजकिय क्षेत्रात कार्य करणार्या मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. तर स्वागताध्यक्ष बाबासाहेब जाधव यांचा सपत्नीक रामदास आठवले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्र संचालन रमेश आराख, सुरेश साबळे यांनी केले.अधिवेशनाला राज्यभरातून कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
प्रवाशांना चांगल्या सेवा द्या- आठवले
By admin | Updated: February 19, 2015 00:19 IST