शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
3
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
4
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
6
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
7
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
8
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
9
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
10
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
11
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
12
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
13
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
14
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
15
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
16
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
17
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
18
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
19
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
20
आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

शेतकरी अडचणीत; १५ जूनपूर्वी पीक कर्ज उपलब्ध करा! - किशोर तिवारी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 12:09 IST

शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी १५ जूनपूर्वी पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचे नियोजन करावे, अशा सूचना विदर्भ व मराठवाड्यातील जिल्हाधिकारी आणि जिल्हा अग्रणी बँकांच्या व्यवस्थापकांना पत्राद्वारे दिल्या आहेत.

- संतोष येलकर

अकोला : दुष्काळी परिस्थितीत अचडणीत सापडलेल्या विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी १५ जूनपूर्वी पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचे नियोजन करावे, अशा सूचना विदर्भ व मराठवाड्यातील जिल्हाधिकारी आणि जिल्हा अग्रणी बँकांच्या व्यवस्थापकांना पत्राद्वारे दिल्या आहेत, असे वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी शनिवारी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.गतवर्षीच्या खरीप हंगामात केवळ ३० टक्के शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करण्यात आले होते; परंतु यावर्षी शंभर टक्के शेतकºयांना खरिपासाठी १५ जूनपर्यंत पीक कर्ज उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. एक लाख रुपयांपेक्षा जास्त पीक कर्ज घेण्यासाठी शेतकºयांना शेती ‘मॉरगेज’ करावी लागते. त्यासाठी येणाºया खर्चाचा भुर्दंड शेतकºयांना सहन करावा लागतो. त्यामुळे पीक कर्जाची मर्यादा १० लाख रुपये वाढविण्यात यावी, यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आग्रह करणार असल्याचे किशोर तिवारी यांनी सांगितले.कुचराई केल्यास कारवाई !पीक कर्जाचे पुनर्गठन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे राष्ट्रीयीकृत बँकांनी १५ जूनपूर्वी शेतकºयांना पीक कर्ज वाटप होईल, यादृष्टीने सकारात्मक भूमिका घेण्याचे सांगत, पीक कर्ज वाटपाच्या कामात कुचराई करणाºया अधिकारी व बँकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा किशोर तिवारी यांनी बोलून दाखविला.तालुकास्तरावर कर्ज मेळावे घ्या !खरीप हंगामासाठी पीक कर्जाचे वाटप करण्यासाठी १५ मेपासून तालुकास्तरावर कर्ज मेळावे घेण्यात यावे, तसेच ग्रामसभांमध्ये पीक कर्जाचे पुनर्गठन, दुष्काळी परिस्थितीत राबविण्यात येणाºया विविध योजनांची माहिती शेतकरी व ग्रामस्थांना द्यावी, असे निर्देशही किशोर तिवारी यांनी विदर्भ व मराठवाड्यातील जिल्हाधिकाºयांना लिहिलेल्या पत्रात देण्यात आले.विदर्भ व मराठवाड्यातील सर्व शेतकºयांना खरीप हंगामासाठी १५ जूनपूर्वी पीक कर्जाचे वाटप पूर्ण करण्याच्या सूचना विदर्भ व मराठवाड्यातील जिल्हाधिकारी आणि जिल्हा अग्रणी बँकांच्या व्यवस्थापकांना १० मे रोजी पत्राद्वारे दिल्या आहेत.-किशोर तिवारीअध्यक्ष, वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन.

 

टॅग्स :AkolaअकोलाKishor Tiwariकिशोर तिवारीFarmerशेतकरीCrop Loanपीक कर्ज