शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आंबेडकरांच्या अटी-शर्तीमध्ये अडकणार आघाडीचा प्रस्ताव 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 13:00 IST

अ‍ॅड.आंबेडकर यांची भूमिका तसेच इतर मित्रपक्षांसाठी द्याव्या लागणाऱ्या जागा पाहता अ‍ॅड.आंबेडकर यांच्या ‘अटी-शर्ती’च आघाडीचा मार्ग अवरुद्ध करतील, अशी शक्यता आहे.

ठळक मुद्दे भारिप-बमसंचे सर्वेसर्वा अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचा काँग्रेस-राष्टवादी काँग्रेसवर असलेला रोष सर्वश्रुत आहे.त्यामुळे ते या दोन्ही पक्षांसोबत आघाडी करण्यास कधीही इच्छुक होत नाहीत. परिणामी, धर्मनिरपेक्ष विचारांच्या मतांचे विभाजन होऊन त्याचा फायदा भाजपा-सेनेला होतो.

- राजेश शेगोकारअकोला : भारिप-बमसंचे सर्वेसर्वा अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचा काँग्रेस-राष्टवादी काँग्रेसवर असलेला रोष सर्वश्रुत आहे. त्यामुळे ते या दोन्ही पक्षांसोबत आघाडी करण्यास कधीही इच्छुक होत नाहीत; ते जाणीवपूर्वक तडजोड होऊ शकणार नाहीत, अशा अटी टाकतात. परिणामी, धर्मनिरपेक्ष विचारांच्या मतांचे विभाजन होऊन त्याचा फायदा भाजपा-सेनेला होतो, असा आरोप अ‍ॅड. आंबेडकर यांच्यावर सातत्याने होत आला आहे. या पृष्ठभूमीवर यावेळी पहिल्यांदाच अ‍ॅड. आंबेडकर यांनी काँग्रेसला आघाडीचा प्रस्ताव देऊन सहा जागांची मागणी केली आहे. वरवर पाहता ही मागणी तडजोड होऊ शकेल, अशी असली तरी आघाडीतील राष्ट्रवादीसंदर्भात अ‍ॅड.आंबेडकर यांची भूमिका तसेच इतर मित्रपक्षांसाठी द्याव्या लागणाऱ्या जागा पाहता अ‍ॅड.आंबेडकर यांच्या ‘अटी-शर्ती’च आघाडीचा मार्ग अवरुद्ध करतील, अशी शक्यता आहे.वंचित बहुजन आघाडीचे नवे राजकारणअ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांनी सोशल इंजिनिअरिंगचा नवा अध्याय मांडत अकोला पॅटर्न यशस्वी केला. भारिप-बहुजन महासंघ हे त्या पॅटर्नचे राजकीय नाव.या पॅटर्नला अकोल्यात यश मिळाल्यानंतर त्यांचे राजकीय महत्त्व वाढले. त्यानंतर प्रत्येक निवडणुकीच्या वेळी अ‍ॅड. आंबेडकरांनी नवा डाव मांडला. १९९८ च्या लोकसभा निवडणुकीच्यावेळी रिपाइंचे ऐक्य झाल्यावर प्रकाश आंबेडकर काँग्रेससोबत गेले व विजयी झाले; मात्र १९९९ च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा वेगळे झाले. त्यानंतर तिसरी आघाडी, रिडालोस म्हणजेच रिपब्लिकन डावी लोकशाही आघाडी मध्यंतरी कम्युनिस्टांसोबत कापूस परिषद घेऊन त्यांची सोबत तर कधी स्वतंत्र असे डाव त्यांनी मांडले. यावेळी त्यांनी वंचित बहुजन आघाडीचा सारिपाट मांडला आहे. हा डाव खेळण्यासाठी त्यांना काँग्रेस सोबत हवी आहे; पण मनातून राष्ट्रवादी नको, त्यामुळे या नव्या सारिपाटावर सोबती कोण घ्यायचा, याची पहिली चाल ते खेळले आहेत. फक्त या डावात शह कुणाला अन् मात कुणावर, हेच पाहणे बाकी आहे.अ‍ॅड. आंबेडकर यांनी ‘बहुजन वंचित आघाडीच्या’ बॅनरखाली काँग्रेसला लोकसभेच्या १२ जागांचा प्रस्ताव दिला आहे. माळी, मुस्लीम, धनगर, भटक्या विमुक्त, ओबीसीमधील मागास समाज अशा घटकांना प्रतिनिधित्व देण्यासाठी १२ जागा हव्या असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या प्रस्तावाला काँग्रेसकडून अजूनही सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. एकीकडे काँग्रेससोबत १२ जागांची मागणी करताना दुसरीकडे काँग्रेसचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडीत समाविष्ट होण्यासाठी त्यांच्या आणखी काही अटी आहेत. राष्टÑवादीच्या विशेषत: राष्टÑवादीचे संस्थापक शरद पवार यांचे छुपे भाजप प्रेम हा त्यांच्या टीकेचा रोख राहिला आहे. सध्याही ते मराठा आरक्षणाच्या मुद्यावर पवारांना लक्ष्य करीत आहेत. अशा स्थितीत आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादीसारख्या मोठ्या मित्रपक्षाला दुखावेल का, हा प्रश्नच आहे. महाराष्टÑात लोकसभेच्या ४८ जागांपैकी काँग्रेस व त्यांचे मित्रपक्ष २६ तर राष्टÑवादी व त्याचे सहकारी पक्ष २२ जागा लढवितात. आता स्वाभिमानी शेतकरी संघटनाही काँग्रेससोबत येण्यास इच्छुक असून, त्यांना सहा जागा हव्या आहेत. सोबतच इतर पक्षांनाही सामावून घ्यायचे आहे, त्यामुळे दोन्ही काँग्रेसला जागा उरतील तरी किती, त्यामुळे अ‍ॅड. आंबेडकरांच्या अटी-शर्तीमध्ये आघाडीचेच बारा वाजण्यास वेळ लागणार नाही.सत्ताधारी भाजपाला सत्तेपासून दूर करण्यासाठी सर्व विरोधकांची एकत्रित मोट बांधण्याचा प्रयत्न देशभरात होत आहे. या प्रयत्नांमध्ये भारिप-बमसंचे सर्वेसर्वा अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचाही सहभाग असावा, असा अनेक काँग्रेसजनांचा आग्रह आहे; मात्र त्यासाठी अर्ध्याहून अधिक जागा कमी लढण्याचा धोका काँग्रेस पत्करणार नाही. दुसरीकडे ज्या बारा जागा अ‍ॅड. आंबेकडरांनी मागितल्या आहेत, त्या कुठल्या कुठल्या समाजाला देणार आहोत, हेही आधीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे उद्या वाटाघाटी चर्चा होऊन काही जागा कमी झाल्या, तर ज्या समाजाला प्रतिनिधित्व देणार होते, त्यांना वंचित ठेवावे लागेल, त्यामुळे त्या समाजाचा रोष कोण घेणार, असा साराच गुंता असल्याने वरवर सोशल इंजिनिअरिंगचा वाटणारा अ‍ॅड. आंबेडकरांचा आघाडी प्रस्ताव हा चक्र व्यूह आहे. उद्या आघाडी झाली नाही अन् मत विभाजनाचा लाभ भाजपाला झालाच, तर अ‍ॅड. आंबेडकर हे मी प्रस्ताव दिला होता, काँग्रेसलाच नको होता, हे सांगण्यास मोकळे!

 

टॅग्स :AkolaअकोलाPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर