शहरं
Join us  
Trending Stories
1
"रोहितसोबत फलंदाजी करणं सोपं गेलं, कारण..."; विराट कोहलीने सांगून टाकली 'मन की बात'
2
राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट
3
पोत्यातून निघाल्या नोटाच नोटा! भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडला 'खजिना'; आतापर्यंत किती मोजल्या?
4
Viral Video: जुना, तुटलेल्या टीव्हीचा बनवला हेल्मेट; तरुणाचा जुगाड पाहून नेटकरी शॉक!
5
ICC Womens World Cup 2025 : ठरलं! नवी मुंबईत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
काहींची व्यक्तिगत पातळीवर टीका; पण जैन बांधवांनी माझं एकदाही नाव घेतलं नाही - मुरलीधर मोहोळ
7
दोन शून्य, नंतर 'मॅचविनिंग' अर्धशतक! विजयावर विराट कोहली म्हणाला- "इतकी वर्ष खेळूनसुद्धा.."
8
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर्सची भररस्त्यात छेड काढणारा अकील खान ६ तासांत पोलिसांच्या ताब्यात
9
एकनाथ शिंदेंची अचानक 'दिल्ली'वारी, PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; महायुतीतील मतभेदावर म्हणाले...
10
Satish Shah Death: 'साराभाई वर्सेस साराभाई' फेम अभिनेते सतीश शाह यांचं निधन, ७४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
सतीश शाह यांच्या निधनानंतर आर माधवनची भावुक पोस्ट, 'या' विनोदी मालिकेत केलं होतं एकत्र काम
12
बलूच नेत्यानं केली पाक लष्करप्रमुख असीम मुनीरची पोलखोल; जगासमोर उघड झाला पाकिस्तानचा 'डबल गेम'
13
Virat Kohli: वनडे + टी-२० मध्ये सर्वाधिक धावा; कोहलीच्या डोक्यावर ताज, सचिन तेंडुलकरला टाकलं मागे
14
मुंबईत शिंदेसेना फक्त ६५ ते ७० जागाच लढवणार?; भाजपानं कंबर कसली, 'अबकी बार १५० पार'चा नारा
15
AUS W vs SA W : वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच असं घडलं; Alana King नं ७ विकेट्स घेत रचला इतिहास
16
कोण आहे सतीश शाह यांची पत्नी? दोघांना नव्हते मूल; जोडीदाराच्या निधनाने बसला धक्का
17
सामनावीर अन् मालिकावीर! रोहित शर्मा दुहेरी सन्मानावर म्हणाला- "मालिका हरलो असलो तरीही..."
18
Virat Kohli: 'रन मशीन' विराटची गगनभरारी! संगकाराला पछाडलं, आता फक्त सचिन तेंडुलकर पुढे
19
IND vs AUS: रोहितच्या सेंच्युरीसह किंग कोहलीची फिफ्टी; ऑस्ट्रेलिया विरुद्ध अखेरच्या वनडेत अविस्मरणीय शो!
20
मंगळ गोचर २०२५: २७ ऑक्टोबर रोजी मंगळ गोचर; पुढचे दोन महिने 'या' ५ राशींसाठी असणार खास!

इयत्ता दुसरी ते आठवीतील विद्यार्थ्यांची संपादणूक चाचण्यांमध्ये प्रगती समाधानकारक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 12:48 IST

दुसरी ते आठवीतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता समाधानकारक असल्याचे टक्केवारीवरून दिसून आले आहे.

- नितीन गव्हाळे  लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या संकल्पनेतून जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाच्या माध्यमातून इयत्ता दुसरी ते आठवीतील विद्यार्थ्यांची आॅगस्ट व सप्टेंबर महिन्यात संपादणूक चाचणी घेण्यात आली होती. या संपादणूक चाचणीमध्ये दुसरी ते आठवीतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता समाधानकारक असल्याचे टक्केवारीवरून दिसून आले आहे.जिल्हा परिषदेचे सीईओ आयुष प्रसाद यांनी शिक्षकांच्या शिकविण्यातील आणि विद्यार्थ्यांच्या शिकण्यातील अडचणी समजून घेऊन त्या दूर करण्यासाठी, विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविली पाहिजे. तसेच विद्यार्थ्यांचा शैक्षणिक गुणवत्ता विकासाचा पाया कच्चा राहू नये, एकही मुलगा अप्रगत राहू नये, यासाठी संपादणूक चाचण्या आयोजित करण्याची संकल्पना मांडली होती. या संपादणूक चाचणीच्या माध्यमातून विद्यार्थी ज्या इयत्तेत शिकत आहे, त्या इयत्तेत क्षमतांचीही संपादणूक वेळच्यावेळी तपासून व मदत करून अप्रगत विद्यार्थ्यांची संख्या कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यांच्या संकल्पनेनुसार जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाच्यावतीने जिल्ह्यातील इयत्ता दुसरी ते आठवीतील मराठी व उर्दू माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी ५ ते ९ आॅगस्ट आणि २३ ते २७ सप्टेंबर या कालावधीत भाषा, इंग्रजी, गणित, विज्ञान व सामाजिक शास्त्र विषयावर संपादणूक चाचणी घेण्यात आली होती. या चाचण्यांचे निकाल जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेकडे आले असून, यात इयत्ता दुसरी ते आठवीतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता समाधानकारक असल्याचे दिसून आले आहे. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी आणखी प्रयत्न करण्यात येणार आहे.जि.प. सीईओ आयुष प्रसाद यांच्या संकल्पनेनुसार संपादणूक पातळी चाचणी घेण्यात आली. या चाचण्यांमध्ये इ. दुसरी ते आठवीतील विद्यार्थ्यांची प्रगती समाधानकारक असल्याचे दिसून आले. त्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी आणखी प्रयत्न करण्यात येणार आहेत.-डॉ. समाधान डुकरे,प्राचार्य, जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था.

टॅग्स :AkolaअकोलाEducationशिक्षण