शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
5
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
6
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
7
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
8
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
9
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
10
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
11
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
12
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
13
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
14
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
15
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
16
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
17
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
18
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
19
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
20
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू

विध्यार्थ्यांच्या २५ टक्के प्रवेश प्रक्रियेत भाडे करारनामाचा खोडा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 14:55 IST

 अकोला: इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये आरटीई २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. अनेक गोरगरीब, आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांना इंग्रजी शाळांमध्ये प्रवेशाची लॉटरी लागली आहे; परंतु त्यांच्या प्रवेशामध्ये शासनाच्या नियमानेच खोडा घातला आहे.

ठळक मुद्देसध्या जिल्ह्यातील २0८ शाळांमधील २५ टक्के राखीव २,४८२ जागांवर प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहेत.भाड्याच्या घरात राहतात, अशा पालकांना दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृती भाडे करारनामा शाळेत सादर केल्याशिवाय प्रवेश मिळत नाही.घरमालक अधिक कराचा भरणा करावा लागेल, या भीतीने पालकांना भाडे करारनामा देण्यास नकार देत आहेत.

- नितीन गव्हाळे

 अकोला: इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये आरटीई २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. अनेक गोरगरीब, आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांना इंग्रजी शाळांमध्ये प्रवेशाची लॉटरी लागली आहे; परंतु त्यांच्या प्रवेशामध्ये शासनाच्या नियमानेच खोडा घातला आहे. भाडे करारनामा शाळेत सादर केल्याशिवाय विद्यार्थ्यांना शाळांमध्ये प्रवेश मिळत नाही आणि घरमालक भाडे करारनामासाठी लागणारी कागदपत्रे देत नसल्याने अनेक पालक त्रस्त झाले आहेत.सध्या जिल्ह्यातील २0८ शाळांमधील २५ टक्के राखीव २,४८२ जागांवर प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहेत. पहिल्या सोडतीमध्ये जिल्ह्यातील १,६८९ विद्यार्थ्यांचे इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश निश्चित करायचे आहेत. ज्या विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित झाला, त्या विद्यार्थ्यांच्या पालकांना शाळेमध्ये रहिवासी, वास्तव्याचा पुरावा म्हणून आधारकार्ड, पासपोर्ट, निवडणूक ओळखपत्र, वीज, टेलिफोन बिल, घरपट्टी, दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत भाडे करारनामा द्यावा लागतो. आता स्थानिक रहिवासी आहेत. त्यांना दुय्यम निबंधकाचा नोंदणीकृत भाडे करारनामा वगळता इतर कागदपत्रांच्या आधारे प्रवेश देण्यात येत आहे; परंतु जे पालक तालुक्याच्या, गावाच्या ठिकाणावरून मुलांच्या शिक्षणासाठी शहरात, तालुक्याच्या ठिकाणी आले, भाड्याच्या घरात राहतात, अशा पालकांना दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृती भाडे करारनामा शाळेत सादर केल्याशिवाय प्रवेश मिळत नाही. त्यासाठी पालक घरमालकांकडे भाडे करारनामासाठी लागणाऱ्या नमुना ड, सातबारा, खरेदीखत आदी कागदपत्रांची मागणी करीत आहेत; परंतु घरमालक अधिक कराचा भरणा करावा लागेल, या भीतीने पालकांना भाडे करारनामा देण्यास नकार देत आहेत. त्यामुळे शेकडो पालक त्रस्त झाले असून, इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेशाची मिळालेली संधी गमवावी लागते की काय, याची चिंता त्यांना सतावत आहेत. विशेष म्हणजे, इंग्रजी माध्यमांच्या प्रवेशापासून गोरगरीब पालकांनाच मुकावे लागणार आहे. यावर प्राथमिक शिक्षण विभागाने तोडगा काढून पालकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.विद्यार्थी संघटना आता गप्प का?आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेबाबत एका विद्यार्थी संघटनेने शिक्षण विभागाला धारेवर धरले होते. आमच्या पाठपुराव्यामुळे भाडे करारनामाचा आदेश निघाल्याचा कांगावासुद्धा या संघटनेने केला होता; परंतु आता हा भाडे करारनामाच गोरगरीब, आर्थिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांच्या प्रवेशाच्या मुळावर उठला आहे. गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना इंग्रजी शाळेत प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असलेला भाडे करारानामाची अट शासनाने रद्द करावी. यासाठी विद्यार्थी संघटनांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाeducationशैक्षणिक