शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

विध्यार्थ्यांच्या २५ टक्के प्रवेश प्रक्रियेत भाडे करारनामाचा खोडा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 14:55 IST

 अकोला: इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये आरटीई २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. अनेक गोरगरीब, आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांना इंग्रजी शाळांमध्ये प्रवेशाची लॉटरी लागली आहे; परंतु त्यांच्या प्रवेशामध्ये शासनाच्या नियमानेच खोडा घातला आहे.

ठळक मुद्देसध्या जिल्ह्यातील २0८ शाळांमधील २५ टक्के राखीव २,४८२ जागांवर प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहेत.भाड्याच्या घरात राहतात, अशा पालकांना दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृती भाडे करारनामा शाळेत सादर केल्याशिवाय प्रवेश मिळत नाही.घरमालक अधिक कराचा भरणा करावा लागेल, या भीतीने पालकांना भाडे करारनामा देण्यास नकार देत आहेत.

- नितीन गव्हाळे

 अकोला: इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये आरटीई २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. अनेक गोरगरीब, आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांना इंग्रजी शाळांमध्ये प्रवेशाची लॉटरी लागली आहे; परंतु त्यांच्या प्रवेशामध्ये शासनाच्या नियमानेच खोडा घातला आहे. भाडे करारनामा शाळेत सादर केल्याशिवाय विद्यार्थ्यांना शाळांमध्ये प्रवेश मिळत नाही आणि घरमालक भाडे करारनामासाठी लागणारी कागदपत्रे देत नसल्याने अनेक पालक त्रस्त झाले आहेत.सध्या जिल्ह्यातील २0८ शाळांमधील २५ टक्के राखीव २,४८२ जागांवर प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहेत. पहिल्या सोडतीमध्ये जिल्ह्यातील १,६८९ विद्यार्थ्यांचे इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश निश्चित करायचे आहेत. ज्या विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित झाला, त्या विद्यार्थ्यांच्या पालकांना शाळेमध्ये रहिवासी, वास्तव्याचा पुरावा म्हणून आधारकार्ड, पासपोर्ट, निवडणूक ओळखपत्र, वीज, टेलिफोन बिल, घरपट्टी, दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत भाडे करारनामा द्यावा लागतो. आता स्थानिक रहिवासी आहेत. त्यांना दुय्यम निबंधकाचा नोंदणीकृत भाडे करारनामा वगळता इतर कागदपत्रांच्या आधारे प्रवेश देण्यात येत आहे; परंतु जे पालक तालुक्याच्या, गावाच्या ठिकाणावरून मुलांच्या शिक्षणासाठी शहरात, तालुक्याच्या ठिकाणी आले, भाड्याच्या घरात राहतात, अशा पालकांना दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृती भाडे करारनामा शाळेत सादर केल्याशिवाय प्रवेश मिळत नाही. त्यासाठी पालक घरमालकांकडे भाडे करारनामासाठी लागणाऱ्या नमुना ड, सातबारा, खरेदीखत आदी कागदपत्रांची मागणी करीत आहेत; परंतु घरमालक अधिक कराचा भरणा करावा लागेल, या भीतीने पालकांना भाडे करारनामा देण्यास नकार देत आहेत. त्यामुळे शेकडो पालक त्रस्त झाले असून, इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेशाची मिळालेली संधी गमवावी लागते की काय, याची चिंता त्यांना सतावत आहेत. विशेष म्हणजे, इंग्रजी माध्यमांच्या प्रवेशापासून गोरगरीब पालकांनाच मुकावे लागणार आहे. यावर प्राथमिक शिक्षण विभागाने तोडगा काढून पालकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.विद्यार्थी संघटना आता गप्प का?आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेबाबत एका विद्यार्थी संघटनेने शिक्षण विभागाला धारेवर धरले होते. आमच्या पाठपुराव्यामुळे भाडे करारनामाचा आदेश निघाल्याचा कांगावासुद्धा या संघटनेने केला होता; परंतु आता हा भाडे करारनामाच गोरगरीब, आर्थिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांच्या प्रवेशाच्या मुळावर उठला आहे. गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना इंग्रजी शाळेत प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असलेला भाडे करारानामाची अट शासनाने रद्द करावी. यासाठी विद्यार्थी संघटनांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाeducationशैक्षणिक