शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

विध्यार्थ्यांच्या २५ टक्के प्रवेश प्रक्रियेत भाडे करारनामाचा खोडा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 14:55 IST

 अकोला: इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये आरटीई २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. अनेक गोरगरीब, आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांना इंग्रजी शाळांमध्ये प्रवेशाची लॉटरी लागली आहे; परंतु त्यांच्या प्रवेशामध्ये शासनाच्या नियमानेच खोडा घातला आहे.

ठळक मुद्देसध्या जिल्ह्यातील २0८ शाळांमधील २५ टक्के राखीव २,४८२ जागांवर प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहेत.भाड्याच्या घरात राहतात, अशा पालकांना दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृती भाडे करारनामा शाळेत सादर केल्याशिवाय प्रवेश मिळत नाही.घरमालक अधिक कराचा भरणा करावा लागेल, या भीतीने पालकांना भाडे करारनामा देण्यास नकार देत आहेत.

- नितीन गव्हाळे

 अकोला: इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये आरटीई २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. अनेक गोरगरीब, आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांना इंग्रजी शाळांमध्ये प्रवेशाची लॉटरी लागली आहे; परंतु त्यांच्या प्रवेशामध्ये शासनाच्या नियमानेच खोडा घातला आहे. भाडे करारनामा शाळेत सादर केल्याशिवाय विद्यार्थ्यांना शाळांमध्ये प्रवेश मिळत नाही आणि घरमालक भाडे करारनामासाठी लागणारी कागदपत्रे देत नसल्याने अनेक पालक त्रस्त झाले आहेत.सध्या जिल्ह्यातील २0८ शाळांमधील २५ टक्के राखीव २,४८२ जागांवर प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहेत. पहिल्या सोडतीमध्ये जिल्ह्यातील १,६८९ विद्यार्थ्यांचे इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश निश्चित करायचे आहेत. ज्या विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित झाला, त्या विद्यार्थ्यांच्या पालकांना शाळेमध्ये रहिवासी, वास्तव्याचा पुरावा म्हणून आधारकार्ड, पासपोर्ट, निवडणूक ओळखपत्र, वीज, टेलिफोन बिल, घरपट्टी, दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत भाडे करारनामा द्यावा लागतो. आता स्थानिक रहिवासी आहेत. त्यांना दुय्यम निबंधकाचा नोंदणीकृत भाडे करारनामा वगळता इतर कागदपत्रांच्या आधारे प्रवेश देण्यात येत आहे; परंतु जे पालक तालुक्याच्या, गावाच्या ठिकाणावरून मुलांच्या शिक्षणासाठी शहरात, तालुक्याच्या ठिकाणी आले, भाड्याच्या घरात राहतात, अशा पालकांना दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृती भाडे करारनामा शाळेत सादर केल्याशिवाय प्रवेश मिळत नाही. त्यासाठी पालक घरमालकांकडे भाडे करारनामासाठी लागणाऱ्या नमुना ड, सातबारा, खरेदीखत आदी कागदपत्रांची मागणी करीत आहेत; परंतु घरमालक अधिक कराचा भरणा करावा लागेल, या भीतीने पालकांना भाडे करारनामा देण्यास नकार देत आहेत. त्यामुळे शेकडो पालक त्रस्त झाले असून, इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेशाची मिळालेली संधी गमवावी लागते की काय, याची चिंता त्यांना सतावत आहेत. विशेष म्हणजे, इंग्रजी माध्यमांच्या प्रवेशापासून गोरगरीब पालकांनाच मुकावे लागणार आहे. यावर प्राथमिक शिक्षण विभागाने तोडगा काढून पालकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.विद्यार्थी संघटना आता गप्प का?आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेबाबत एका विद्यार्थी संघटनेने शिक्षण विभागाला धारेवर धरले होते. आमच्या पाठपुराव्यामुळे भाडे करारनामाचा आदेश निघाल्याचा कांगावासुद्धा या संघटनेने केला होता; परंतु आता हा भाडे करारनामाच गोरगरीब, आर्थिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांच्या प्रवेशाच्या मुळावर उठला आहे. गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना इंग्रजी शाळेत प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असलेला भाडे करारानामाची अट शासनाने रद्द करावी. यासाठी विद्यार्थी संघटनांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाeducationशैक्षणिक