शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
2
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
3
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
6
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
7
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
8
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
9
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
10
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
11
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
12
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
13
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
14
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
15
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
16
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
17
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
18
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
19
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
20
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी

खासगी एजन्सी करणार मालमत्तांचे पुनर्मुल्यांकन, टॅक्स वसूली; पाच वर्षांसाठी करारनामा; महापालिका देणार वर्क ऑर्डर

By आशीष गावंडे | Updated: July 27, 2023 17:48 IST

...यापैकी स्वाती इन्डस्ट्रीजने ८.३९ दराने सादर केलेली निविदा मंजूर हाेण्याची दाट शक्यता आहे.

शहरातील मालमत्तांचे पुनर्मुल्यांकन (असेसमेंट) करणे, अकाेलेकरांजवळून टॅक्स वसूल करण्यासह पाणीपट्टी व बाजार वसूलीसाठी खासगी एजन्सी नियुक्त करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त कविता द्विवेदी यांनी घेतला आहे. प्रशासनाने निविदा प्रक्रिया राबवली असता, झारखंड मधील रांची येथील स्वाती इन्डस्ट्रीज व स्पॅराे साॅफ्टवेअर प्रायव्हेट लिमीटेड कंपनी यांच्यामार्फत अर्ज प्राप्त झाले हाेते. यापैकी स्वाती इन्डस्ट्रीजने ८.३९ दराने सादर केलेली निविदा मंजूर हाेण्याची दाट शक्यता आहे.

महापालिकेने उत्पन्नात वाढ न केल्यास विकास कामांसाठी एक छदामही देणार नसल्याची भूमिका तत्कालीन राज्य शासनाने घेतली हाेती. त्यावर मनपाचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी सन २०१६ मध्ये हद्दवाढ क्षेत्रासहीत शहरातील मालमत्तांचे ‘जीआयएस’ प्रणालीद्वारे पुनर्मुल्यांकन करण्यासाठी खासगी एजन्सीची नियुक्ती केली हाेती. पुनर्मुल्यांकन करण्यापूर्वी टॅक्स विभागाच्या दप्तरी मालमत्तांची संख्या ७२ हजार हाेती. यापासून प्रशासनाला वर्षाकाठी अवघे १८ काेटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त हाेत असे. ‘जीआयएस’ प्रणालीद्वारे पुनर्मुल्यांकन केल्यानंतर मालमत्तांची संख्या तब्बल १ लाख ४४ हजार झाली.यानंतर प्रशासनाने २०१७ मध्ये सुधारित करवाढ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर वर्षाकाठी ७८ काेटी रुपये उद्दिष्ट निश्चित करण्यात आले. दरम्यान, निकषानुसार दर पाच वर्षांनंतर मालमत्तांचे पुनर्मुल्यांकन करणे क्रमप्राप्त आहे. २०२२ राेजी ही मुदत संपुष्टात आल्यामुळे आयुक्त कविता द्विवेदी यांनी पुनर्मुल्यांकनाचा निर्णय घेतला. तसेच थकीत मालमत्ता कर जमा करतेवेळी नागरिकांची नकारघंटा लक्षात घेता मालमत्ता कर वसूलीची जबाबदारीही खासगी एजन्सीकडेच दिली जाणार आहे.

अकाेलेकरांकडे १२० काेटी रुपये थकबाकीमनपाच्या मालमत्ता विभागाकडून चालू आर्थिक वर्षासाठी ८० काेटी रुपये टॅक्स जमा केला जाताे. दुसरीकडे प्रशासनाने वारंवार सूचना, नाेटीस जारी करुनही काही मालमत्ता धारक टॅक्स जमा करत नसल्यामुळे थकबाकीचा आकडा १२० काेटींच्या घरात पाेहाेचला आहे. अर्थात एजन्सीला पहिल्या वर्षी २०० काेटी रुपये वसूल करावे लागतील. 

एजन्सीकडे पाणीपट्टी, बाजार वसूलीची जबाबदारीजलप्रदाय विभागाला वर्षाकाठी ९ काेटी ५० लक्ष रुपये पाणीपट्टीचे उद्दिष्ट आहे. यापैकी निम्मी रक्कम वसूल केली जाते. बाजार व परवाना विभागामार्फतदैनंदिन बाजार वसूलीकरीता सुमारे ९५ लक्ष रुपये, गाळेधारकांकडून ४४ लक्ष व हाेर्डिंगपासून ५० लक्ष रुपये वसूल केले जातात. यापुढे ही सर्व वसूली एजन्सीमार्फत केली जाणार आहे. 

टॅग्स :AkolaअकोलाTaxकर