शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
4
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
5
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
6
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
7
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
8
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
9
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
10
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
11
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
12
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
13
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
14
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
15
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
16
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
17
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
18
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
19
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
20
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
Daily Top 2Weekly Top 5

खासगी एजन्सी करणार मालमत्तांचे पुनर्मुल्यांकन, टॅक्स वसूली; पाच वर्षांसाठी करारनामा; महापालिका देणार वर्क ऑर्डर

By आशीष गावंडे | Updated: July 27, 2023 17:48 IST

...यापैकी स्वाती इन्डस्ट्रीजने ८.३९ दराने सादर केलेली निविदा मंजूर हाेण्याची दाट शक्यता आहे.

शहरातील मालमत्तांचे पुनर्मुल्यांकन (असेसमेंट) करणे, अकाेलेकरांजवळून टॅक्स वसूल करण्यासह पाणीपट्टी व बाजार वसूलीसाठी खासगी एजन्सी नियुक्त करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त कविता द्विवेदी यांनी घेतला आहे. प्रशासनाने निविदा प्रक्रिया राबवली असता, झारखंड मधील रांची येथील स्वाती इन्डस्ट्रीज व स्पॅराे साॅफ्टवेअर प्रायव्हेट लिमीटेड कंपनी यांच्यामार्फत अर्ज प्राप्त झाले हाेते. यापैकी स्वाती इन्डस्ट्रीजने ८.३९ दराने सादर केलेली निविदा मंजूर हाेण्याची दाट शक्यता आहे.

महापालिकेने उत्पन्नात वाढ न केल्यास विकास कामांसाठी एक छदामही देणार नसल्याची भूमिका तत्कालीन राज्य शासनाने घेतली हाेती. त्यावर मनपाचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी सन २०१६ मध्ये हद्दवाढ क्षेत्रासहीत शहरातील मालमत्तांचे ‘जीआयएस’ प्रणालीद्वारे पुनर्मुल्यांकन करण्यासाठी खासगी एजन्सीची नियुक्ती केली हाेती. पुनर्मुल्यांकन करण्यापूर्वी टॅक्स विभागाच्या दप्तरी मालमत्तांची संख्या ७२ हजार हाेती. यापासून प्रशासनाला वर्षाकाठी अवघे १८ काेटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त हाेत असे. ‘जीआयएस’ प्रणालीद्वारे पुनर्मुल्यांकन केल्यानंतर मालमत्तांची संख्या तब्बल १ लाख ४४ हजार झाली.यानंतर प्रशासनाने २०१७ मध्ये सुधारित करवाढ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर वर्षाकाठी ७८ काेटी रुपये उद्दिष्ट निश्चित करण्यात आले. दरम्यान, निकषानुसार दर पाच वर्षांनंतर मालमत्तांचे पुनर्मुल्यांकन करणे क्रमप्राप्त आहे. २०२२ राेजी ही मुदत संपुष्टात आल्यामुळे आयुक्त कविता द्विवेदी यांनी पुनर्मुल्यांकनाचा निर्णय घेतला. तसेच थकीत मालमत्ता कर जमा करतेवेळी नागरिकांची नकारघंटा लक्षात घेता मालमत्ता कर वसूलीची जबाबदारीही खासगी एजन्सीकडेच दिली जाणार आहे.

अकाेलेकरांकडे १२० काेटी रुपये थकबाकीमनपाच्या मालमत्ता विभागाकडून चालू आर्थिक वर्षासाठी ८० काेटी रुपये टॅक्स जमा केला जाताे. दुसरीकडे प्रशासनाने वारंवार सूचना, नाेटीस जारी करुनही काही मालमत्ता धारक टॅक्स जमा करत नसल्यामुळे थकबाकीचा आकडा १२० काेटींच्या घरात पाेहाेचला आहे. अर्थात एजन्सीला पहिल्या वर्षी २०० काेटी रुपये वसूल करावे लागतील. 

एजन्सीकडे पाणीपट्टी, बाजार वसूलीची जबाबदारीजलप्रदाय विभागाला वर्षाकाठी ९ काेटी ५० लक्ष रुपये पाणीपट्टीचे उद्दिष्ट आहे. यापैकी निम्मी रक्कम वसूल केली जाते. बाजार व परवाना विभागामार्फतदैनंदिन बाजार वसूलीकरीता सुमारे ९५ लक्ष रुपये, गाळेधारकांकडून ४४ लक्ष व हाेर्डिंगपासून ५० लक्ष रुपये वसूल केले जातात. यापुढे ही सर्व वसूली एजन्सीमार्फत केली जाणार आहे. 

टॅग्स :AkolaअकोलाTaxकर