शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमादरम्यान झाला गोळीबार  
3
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
4
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
5
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
6
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
7
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
8
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
9
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
10
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
11
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
12
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
13
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
14
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
15
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
16
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
17
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
18
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
19
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
20
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता

प्रधानसेवक मोदी खोटे बोलत आहेत; अँड. प्रकाश आंबेडकर यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 01:19 IST

प्रधानसेवक सातत्याने खोटे बोलत आहेत,  असे सांगत या प्रकाराचा निषेध ‘लुटारूंचा दिवस’ म्हणून भारि प-बहुजन महासंघ करणार आहे. नोटाबंदीमध्ये जीव गेलेल्यांना  श्रद्धांजली व निषेध कार्यक्रम प्रत्येक जिल्हा व तालुक्यात  घेण्याचे आवाहन पक्षाचे नेते अँड. प्रकाश आंबेडकर यांनी केले  आहे. 

ठळक मुद्देलुटारूंचा दिवस’ म्हणून  निषेध

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : प्रधानसेवक नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २0१६ रोजी  एक हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा रद्द केल्या.  आरबीआयच्या कायद्यानुसार हा निर्णय सेंट्रल कमिटीच घेऊ  शकते, त्यानुसारची कार्यवाही आरबीआयकडून केली जाते.  सेंट्रल कमिटीने हा निर्णय घेतला की नाही, हे अद्यापही गुलदस् त्यात आहे. त्याबाबत प्रधानसेवक सातत्याने खोटे बोलत आहेत,  असे सांगत या प्रकाराचा निषेध ‘लुटारूंचा दिवस’ म्हणून भारि प-बहुजन महासंघ करणार आहे. नोटाबंदीमध्ये जीव गेलेल्यांना  श्रद्धांजली व निषेध कार्यक्रम प्रत्येक जिल्हा व तालुक्यात  घेण्याचे आवाहन पक्षाचे नेते अँड. प्रकाश आंबेडकर यांनी केले  आहे. नोटाबंदीसाठी जी कारणे देण्यात आली, त्यापैकी एक वगळता इ तर कारणांसाठी आरबीआयने २00५ च्या आधीच्या नोटा  बदलण्याचा निर्णय घेतला होता. नोटाबंदीचे सर्मथन करताना  प्रधानसेवकांनी काळा पैसा बाहेर काढणे, खोट्या नोटांना आळा  घालणे, दहशतवादी कारवाया रोखणे, अशी कारणे दिली होती.  त्यापैकी काहीही साध्य झाले नसल्याचेही अँड. आंबेडकर यांनी  म्हटले आहे. प्रधानसेवकांनी अमेरिका दौर्‍यात तेथील क्रेडिट कार्ड कंपन्यांच्या  संघटनेबरोबर करारनामा करून त्यांना भारतात पूर्णपणे  मोकळीक देण्याचे आश्‍वासन दिले आहे. त्यामुळे ते सातत्याने  प्लास्टिक मनी वापरण्याचे आवाहन करतात, त्याचे कारण  अमेरिकन कंपन्यांबरोबर झालेला करारनामा असल्याचेही अँड.  आंबेडकर यांनी म्हटले आहे. ३१ डिसेंबर २0१६ नंतर अनिवासी भारतीयांना नोटा बदलण्याचा  अधिकार ठेवला. भारतीयांना दुसर्‍या देशाचे चलन ठेवता येत  नाही. त्याप्रमाणे अनिवासी भारतीय दुसर्‍या देशाचे नागरिक अस तील, तर भारतीय चलन बाळगण्यावर र्मयादा आहेत. कोणता  कायदा, नियमानुसार अनिवासी भारतीयांना भारतीय चलन  बाळगता येते, याचे उत्तरही प्रधानसेवकांनी द्यावे, असे आव्हानही  त्यांनी दिल्याचे पत्रक पक्षाचे केंद्रीय सरचिटणीस ज.वि. पवार,  सहजिल्हा प्रसिद्धिप्रमुख रणजित वाघ यांनी प्रसिद्धीस दिले आहे. 

काँग्रेस पाळणार काळा दिवस नोटबंदीचा निर्णय हा देशाच्या आर्थिक विकासाला खिळ  बसविणारा ठरला असून या निर्णयाचा निषेध करण्यासाठी काँग्रेस  बुधवार ८ नाव्हेंबर हा दिवस काळा दिवस म्हणून पाळणार आहे.  स्थानिक स्वराज्य भवनातून काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते  मोर्चा काढणार असून मदनलाल धिंग्रा चौकात निर्दशने करणार  असल्याची माहिती महानगर अध्यक्ष बबनराव चौधरी तसेच  जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल यांनी दिली.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकर