शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

सत्ताधाऱ्यांवर दबाव वाढला; १०० कोटींच्या प्रस्तावासाठी मनपात लगीनघाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 14:07 IST

शासनाने मंजूर केलेल्या १०० कोटींच्या विकास कामांचे प्रस्ताव तातडीने निकाली काढण्यासाठी सत्ताधाºयांनी लगीनघाई सुरू केली.

ठळक मुद्देनवीन प्रभागांचा विकास करण्यासाठी आ.रणधीर सावरकर यांनी शासनाकडे ११० कोटींचा विकास आराखडा सादर केला.काही लेटलतीफ नगरसेवकांमुळे प्रस्तावाला विलंब झाला.असंतोष धुमसत असल्याचे ध्यानात येताच सत्ताधारी भाजपाने १०० कोटींचे प्रस्ताव तातडीने शासनदरबारी सादर करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

- आशिष गावंडे

अकोला: महापालिका क्षेत्राची हद्दवाढ होऊन दीड वर्षांपेक्षा जास्त कालावधी उलटला आहे. या दरम्यान हद्दवाढीत सामील झालेल्या नवीन प्रभागात मूलभूत सुविधांचा उडालेला बोजवारा व नगरसेवकांकडून होणारी टाळाटाळ पाहता सर्वसामान्यांमध्ये सत्ताधारी भाजपाप्रती असंतोष निर्माण झाल्याचे चित्र समोर आले आहे. ही बाब लक्षात घेता शासनाने मंजूर केलेल्या १०० कोटींच्या विकास कामांचे प्रस्ताव तातडीने निकाली काढण्यासाठी सत्ताधाºयांनी लगीनघाई सुरू केली असून, प्रशासनाने ६१० विकास कामांपैकी ७७ कामांचे प्रस्ताव अमरावती येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाकडे सादर केल्याची माहिती आहे.शहरालगतच्या २४ गावांचा महापालिकेच्या सोयी-सुविधांवर ताण पडत असण्यासोबतच निकषानुसार मनपा क्षेत्राची हद्दवाढ करण्यासाठी मनपाचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी शासनाकडे हद्दवाढीचा प्रस्ताव सादर केला होता. या गावांमध्ये ले-आऊट नसल्यामुळे प्रशस्त रस्ते, नाल्या, सर्व्हिस लाइन, पथदिव्यांसह पाणी पुरवठ्याची समस्या कायम होती. ही बाब लक्षात घेता अकोला पूर्व विधानसभा मतदार संघाचे आमदार रणधीर सावरकर यांनी हद्दवाढीसाठी शासनाकडे पाठपुरावा केला. शासनाने १ सप्टेंबर २०१६ रोजी हद्दवाढीवर शिक्कामोर्तब करीत अधिसूचना जारी केली. हद्दवाढीत सामील झालेल्या नवीन प्रभागांचा विकास करण्यासाठी आ.रणधीर सावरकर यांनी शासनाकडे ११० कोटींचा विकास आराखडा सादर केला होता. त्यापैकी मुख्यमंत्र्यांनी १०० कोटींचा आराखडा मंजूर करीत २० कोटींच्या निधीला मंजुरी दिली होती. मनपा प्रशासनाने संबंधित प्रभागातील नगरसेवकांना विकास कामांचे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. काही लेटलतीफ नगरसेवकांमुळे प्रस्तावाला विलंब झाला. यादरम्यान, प्रभागात मूलभूत सुविधांचा बोजवारा उडाला असताना भाजपाचे नगरसेवक समस्यांकडे ढुंकूणही पाहत नसल्याचा आरोप नागरिकांमधून सुरू झाला. त्यात तथ्यही असल्याचे दिसून येते. त्याचा परिपाक म्हणून की काय, डाबकी रोडवरील प्रभाग क्रमांक ८ मधील संतप्त नागरिकांनी रस्त्यावर उतरून रास्ता रोको केल्याचे समोर आले. नवीन प्रभागातील नागरिकांचा संयम सुटत चालला असून, असंतोष धुमसत असल्याचे ध्यानात येताच सत्ताधारी भाजपाने १०० कोटींचे प्रस्ताव तातडीने शासनदरबारी सादर करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबादBJPभाजपा