शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
3
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
4
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
5
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
6
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
7
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
8
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
9
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
10
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
11
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
12
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
13
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
14
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
15
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
16
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
17
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
18
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
19
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
20
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 

सत्ताधाऱ्यांवर दबाव वाढला; १०० कोटींच्या प्रस्तावासाठी मनपात लगीनघाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 14:07 IST

शासनाने मंजूर केलेल्या १०० कोटींच्या विकास कामांचे प्रस्ताव तातडीने निकाली काढण्यासाठी सत्ताधाºयांनी लगीनघाई सुरू केली.

ठळक मुद्देनवीन प्रभागांचा विकास करण्यासाठी आ.रणधीर सावरकर यांनी शासनाकडे ११० कोटींचा विकास आराखडा सादर केला.काही लेटलतीफ नगरसेवकांमुळे प्रस्तावाला विलंब झाला.असंतोष धुमसत असल्याचे ध्यानात येताच सत्ताधारी भाजपाने १०० कोटींचे प्रस्ताव तातडीने शासनदरबारी सादर करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

- आशिष गावंडे

अकोला: महापालिका क्षेत्राची हद्दवाढ होऊन दीड वर्षांपेक्षा जास्त कालावधी उलटला आहे. या दरम्यान हद्दवाढीत सामील झालेल्या नवीन प्रभागात मूलभूत सुविधांचा उडालेला बोजवारा व नगरसेवकांकडून होणारी टाळाटाळ पाहता सर्वसामान्यांमध्ये सत्ताधारी भाजपाप्रती असंतोष निर्माण झाल्याचे चित्र समोर आले आहे. ही बाब लक्षात घेता शासनाने मंजूर केलेल्या १०० कोटींच्या विकास कामांचे प्रस्ताव तातडीने निकाली काढण्यासाठी सत्ताधाºयांनी लगीनघाई सुरू केली असून, प्रशासनाने ६१० विकास कामांपैकी ७७ कामांचे प्रस्ताव अमरावती येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाकडे सादर केल्याची माहिती आहे.शहरालगतच्या २४ गावांचा महापालिकेच्या सोयी-सुविधांवर ताण पडत असण्यासोबतच निकषानुसार मनपा क्षेत्राची हद्दवाढ करण्यासाठी मनपाचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी शासनाकडे हद्दवाढीचा प्रस्ताव सादर केला होता. या गावांमध्ये ले-आऊट नसल्यामुळे प्रशस्त रस्ते, नाल्या, सर्व्हिस लाइन, पथदिव्यांसह पाणी पुरवठ्याची समस्या कायम होती. ही बाब लक्षात घेता अकोला पूर्व विधानसभा मतदार संघाचे आमदार रणधीर सावरकर यांनी हद्दवाढीसाठी शासनाकडे पाठपुरावा केला. शासनाने १ सप्टेंबर २०१६ रोजी हद्दवाढीवर शिक्कामोर्तब करीत अधिसूचना जारी केली. हद्दवाढीत सामील झालेल्या नवीन प्रभागांचा विकास करण्यासाठी आ.रणधीर सावरकर यांनी शासनाकडे ११० कोटींचा विकास आराखडा सादर केला होता. त्यापैकी मुख्यमंत्र्यांनी १०० कोटींचा आराखडा मंजूर करीत २० कोटींच्या निधीला मंजुरी दिली होती. मनपा प्रशासनाने संबंधित प्रभागातील नगरसेवकांना विकास कामांचे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. काही लेटलतीफ नगरसेवकांमुळे प्रस्तावाला विलंब झाला. यादरम्यान, प्रभागात मूलभूत सुविधांचा बोजवारा उडाला असताना भाजपाचे नगरसेवक समस्यांकडे ढुंकूणही पाहत नसल्याचा आरोप नागरिकांमधून सुरू झाला. त्यात तथ्यही असल्याचे दिसून येते. त्याचा परिपाक म्हणून की काय, डाबकी रोडवरील प्रभाग क्रमांक ८ मधील संतप्त नागरिकांनी रस्त्यावर उतरून रास्ता रोको केल्याचे समोर आले. नवीन प्रभागातील नागरिकांचा संयम सुटत चालला असून, असंतोष धुमसत असल्याचे ध्यानात येताच सत्ताधारी भाजपाने १०० कोटींचे प्रस्ताव तातडीने शासनदरबारी सादर करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबादBJPभाजपा