शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

उमरा-सावरगाव मार्गावरील पुलाची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:57 IST

खेट्री : अकोला जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेले तसेच अकोला, बुलडाणा जिल्ह्यांतील अतिदुर्गम भागातील गावांना जोडणाऱ्या पातूर तालुक्यातील ६ किलोमीटर ...

खेट्री : अकोला जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेले तसेच अकोला, बुलडाणा जिल्ह्यांतील अतिदुर्गम भागातील गावांना जोडणाऱ्या पातूर तालुक्यातील ६ किलोमीटर अंतर असलेल्या उमरा-सावरगाव मार्गावरील पुलाची गेल्या दोन वर्षांपासून दुरवस्था झाली आहे. या पुलाच्या मधोमध मोठमोठे खड्डे पडल्याने अनेक वेळा अपघात होऊन अनेक जण जखमी झाल्याच्या घटना घडल्या असून, अपघातात वाढ होत आहे. मोठी घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या पुलावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत. याबाबतची तक्रार ग्रामस्थांनी संबंधित विभागाकडे वारंवार केली, परंतु अद्याप दखल घेतली गेली नाही. या पुलाच्या दुरवस्थेमुळे परिसरातील जवळपास २५ ते ३० गावांतील वाहनधारक व ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे. या परिसरातील ग्रामस्थांना बुलडाणा जिल्ह्यातील डोणगाव, मेहकर, औरंगाबाद, पुणे येथे जाण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे. संबंधित विभागाच्या वरिष्ठांनी दखल घेऊन तातडीने पुलावरील मधोमध पडलेले खड्डे बुजविण्याची मागणी होत आहे.

--------------

गत दोन वर्षांपासून पुलाच्या मधोमध मोठमोठे खड्डे पडले असून, अनेक वेळा अपघातात अनेक जण जखमी झाले आहेत, तरी पुलाची दुरुस्ती करण्यात यावी.

विठ्ठल मुके, ग्रामस्थ उमरा

----------------

उमरा-सावरगाव मार्गवरील पुल जीर्ण झाला असून, मोठमोठे खड्डे पडले आहेत. वाहन काढताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. याकडे संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे.

गोपाल राठोड, सावरगाव