शहरं
Join us  
Trending Stories
1
Pooja Khedkar Mother: नवी मुंबईतून ट्रक चालकाचं अपहरण, पुण्यातील घरात ठेवले डांबून; पूजा खेडकरच्या आईचा प्रताप
2
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
3
रशिया युक्रेन युद्ध संपूर्ण युरोपात पसरणार, NATO देशांचं सैन्य सज्ज; झेलेन्स्कींचा जगाला मोठा इशारा
4
हृदयद्रावक! BMW ने घेतला भारत सरकारच्या मोठ्या अधिकाऱ्याचा जीव; नेमकं काय घडलं?
5
UPI Rule Change: आजपासून मोठा बदल, मोठा दिलासा; आता UPI मधून एका दिवसात करू शकता 'इतक्या' लाखांचं ट्रान्झॅक्शन
6
Navratri 2025: आई तुळजाभवानीची घोर मंचकी निद्रा प्रारंभ; आता दर्शन थेट घटस्थापनेला!
7
पुढील ३ तासांसाठी मुंबईला 'रेड अलर्ट'; विजांच्या कडकडाट अन् जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा
8
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
9
Stock Markets Today: आठवड्याची सुस्त सुरुवात, ६० अंकांनी वधारला सेन्सेक्स; रियल्टी, मेटल शेअर्समध्ये खरेदी
10
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात केलेली ती चूक भोवणार? टीम इंडियावर कारवाई होणार?
11
PPF Investment: पती पत्नीसाठी डबल नफ्याची ट्रिक! टॅक्सही शून्य, व्याजही जास्त; कसा घ्याल फायदा?
12
युद्ध स्फोटक वळणावर, रशियन ड्रोन्स रोमानियात; युक्रेनचा रशियातील सर्वात मोठ्या तेल प्रकल्पावर भीषण हल्ला
13
राहुल गांधींवर आरोप करण्याऐवजी त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करा
14
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
15
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
16
ट्रम्प अन् निर्बंधांमुळे रशियन तेल मिळवण्यात भारताला अडचणी; जहाज कंपन्यांनी दिला नकार
17
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
18
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
19
‘एआय सायकोसिस’ ही स्थिती नेमकी काय आहे? Ai विचारांवर किंवा भावनांवर नियंत्रण ठेवत
20
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक

कृषीमंत्री दादा भूसे यांच्या दौऱ्यावरून राजकारण तापले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 10:49 IST

Political News : पालकमंत्री बच्चू कडू व कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्यावर गलिच्छ राजकारण करीत असल्याचा आरोप भाजपने केला आहे.

अकोला: जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेती, पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे रविवारी अकोल्यात आले होते. त्यांनी अकोला पूर्व मतदारसंघातील काही गावांमधील पीक नुकसानीचा आढावा घेतला. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकारी, लोकप्रतिनिधींसोबत बैठक घेतली. या बैठकीला भाजपच्या आमदारांना बोलाविण्यात आले नसल्याचा आरोप भाजपने करीत, अपमान खपवून घेणार नसल्याचे म्हटले आहे. आता यावरून राजकारण पेटलं असून, पालकमंत्री बच्चू कडू व कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्यावर गलिच्छ राजकारण करीत असल्याचा आरोप भाजपने केला आहे.

जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून तसेच सत्तारुढ शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सरकार स्थापन झाल्यापासून सातत्याने लोकप्रतिनिधींचा अपमान करीत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात होणाऱ्या बैठकांना भाजपच्या लोकप्रतिनिधींना जाणीवपूर्वक डावलण्यात येत असल्याचा आरोप भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य तेजराव थोरात पाटील यांनी केला आहे. इतर पक्षाच्या लोकप्रतिनिधींना मात्र, निमंत्रणे दिली जातात. कृषिमंत्री दादाजी भुसे व पालकमंत्री बच्चू कडू हे बैठकीपासून भाजप लोकप्रतिनिधींना दूर ठेवण्याचा प्रकार करीत असल्याचा आरोपही थोरात यांनी केला आहे. हा भाजपच्या लोकप्रतिनिधींचा अपमान नसून, जनतेचा अपमान आहे. त्यामुळे भाजप याला योग्यवेळी उत्तर देईलच. असा इशाराही त्यांनी दिला आहे.

 

बैठकीपासून दूर ठेवण्यामागे हेतू काय?

भाजपचे लोकप्रतिनिधी नुकसानग्रस्त भागाचा दौरा करून जनतेला दिलासा देत असताना, त्यांना बैठकीत न बोलाविण्यामागे काय हेतू आहे. असा सवाल करून जिल्ह्यातील मतदारांचा अपमान सहन केला जाणार नाही. असा इशारा भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष व प्रदेश कार्यकारिणी सदस्य तेजराव थोरात यांनी दिला आहे.

 

आढावा बैठक घेऊन काय साध्य केले?

कृषिमंत्री दादाजी भुसे अकोला दौऱ्यावर आले. अकोला पूर्व मतदारसंघातील काही गावांमधील शेती नुकसानीचा आढावा घेतला. त्यांच्याकडून भरघोस मदतीची अपेक्षा होती. परंतु आढावा बैठक घेऊन काय साध्य झाले. शेतकऱ्यांसाठी कोणती घोषणा केली. काय आश्वासने दिली? कोणत्या समस्यांचे निराकरण केले. आढावा बैठकीचा काय फायदा झाला. असा सवाल आमदार रणधीर सावरकर यांनी उपस्थित केला.

 

कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांची रविवारी बैठक घेतली. या बैठकीचे भाजप आमदारांना निमंत्रण देण्यात आले नाही. पालकमंत्री बच्चू कडू यांच्या बाबतीतही तेच घडत आहे. भाजपचे आमदार अभ्यासपूर्ण मुद्दे उपस्थित करतात. त्याची उत्तरे त्यांच्याकडे नसतात. त्यामुळे जाणीवपूर्वक भाजपच्या आमदारांना बैठकीला बोलाविले जात नाही.

-रणधीर सावरकर आमदार व जिल्हाध्यक्ष भाजप

शहरातील अनेक वस्त्यांमध्ये पुराचे पाणी शिरले. घरे, अन्नधान्याचे नुकसान झाले. त्याकडे लक्ष देण्यापेक्षा सत्ताधारी पक्षाचे नेते पक्षभेद करीत आहेत. हे योग्य नाही. लोकप्रतिनिधी, महापौरांना बैठकीला बोलावून समस्या जाणून घ्यायला हव्या होत्या. परंतु दुदैवाने यात राजकारण होत आहे.

-विजय अग्रवाल, महानगराध्यक्ष भाजप

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपाShiv Senaशिवसेना