शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

गाव तेथे पोलीस कर्मचारी...अकोला पोलिसांचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 10:42 IST

पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या संकल्पनेतून ‘गाव तेथे पोलीस कर्मचारी’ या उपक्रमास प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आला आहे.

- सचिन राऊत  लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : गावातील तंटे जास्त वाढू नये तसेच त्यामधील सत्यता जाणून घेण्यासाठी पोलीस पाटील यांच्यावर जास्त विसंबून न राहता ‘गाव तेथे पोलीस कर्मचारी’ हा नवीन प्रयोग जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी स्वातंत्र्यदिनापासून सुरू केला.छोट्या-मोठ्या कारणावरून गावात मोठे वाद होत असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण होऊन मोठे वादंग निर्माण होते. त्यामुळे अशा प्रकारच्या वादावर आधीच पडदा टाकण्यासाठी तसेच ते तातडीने मिटविण्यासाठी प्रत्येक गावात पोलीस कर्मचारी नेमण्यात येणार आहे. त्यासाठी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी गावांची यादी पडताळणी सुरू केली असून, पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या तसेच इतर तपास आणि सर्वच शाखांचे कर्मचारी मिळून याचा ताळमेळ लावण्यात येत आहे. यासाठी गृहरक्षक दलाच्या जवानांचीही मदत घेण्यात येणार असल्याची माहिती आहे. स्वातंत्र्यदिनी जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या संकल्पनेतून ‘गाव तेथे पोलीस कर्मचारी’ या उपक्रमास प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आला आहे.या उपक्रमांचाही श्रीगणेशातपासात भर घालण्यासाठी आणखी चार आय बाइक अकोला पोलीस दलात दाखल झाल्या असून, त्या बाइक १५ आॅगस्ट रोजी संबंधित कर्मचारी व अधिकाऱ्यांकडे देण्यात आलेल्या आहेत. आय बाइकला पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखविण्यात आली. यासोबतच महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून दामिनी पथकात आणखी सुविधा पुरवण्यात आलेल्या आहेत. याच दामिनी पथकात आणखी एक मोबाइल क्रमांकाचा सामावेश करण्यात आला असून, त्यावर महिला व मुली तातडीने तक्रार करू शकणार आहेत. पोलीस दलात क्यू-आर कोड हादेखील उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

पोलिसांचा गौरवपोलीस स्टेशन सिटी कोतवाली येथील सहायक पोलीस उपनिरीक्षक विजय वासुदेव खडसे यांना राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात आले. त्यांच्यासह पोलीस अधिकाºयांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी स्वातंत्र्यदिनी हे उपक्रम सुरू करून पोलिसांचाही गौरव केला.

 

टॅग्स :AkolaअकोलाPoliceपोलिस