शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
3
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
4
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
5
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
6
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
7
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
8
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
9
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
10
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
11
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
12
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
13
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
14
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
15
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
16
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
17
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
18
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
19
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
20
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?

अल्पवयीन मुला-मुलीचे प्रेम प्रकरण पाहून पोलीसही अवाक्!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 13:14 IST

अकोला: चित्रपटातील प्रेम दृश्य, प्रणय दृश्य, प्रेमकथांचा युवा पिढीवर विपरीत परिणाम होत आहे. खेळण्या-बागडण्याच्या, शिकण्याच्या वयातील कोवळी मुले-मुली प्रेमाच्या आकर्षणाला बळी पडत आहेत.

अकोला: चित्रपटातील प्रेम दृश्य, प्रणय दृश्य, प्रेमकथांचा युवा पिढीवर विपरीत परिणाम होत आहे. खेळण्या-बागडण्याच्या, शिकण्याच्या वयातील कोवळी मुले-मुली प्रेमाच्या आकर्षणाला बळी पडत आहेत. कोवळ्या वयात घरून पळून जाण्याचे, संसार थाटण्याचे स्वप्न रंगवित असल्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. असाच प्रकार शुक्रवारी रामदासपेठ पोलीस ठाण्यात घडून आला. चिमुरड्या मुलीने प्रियकराला लिहिलेले भावनिक पत्र वाचून पोलीससुद्धा चक्रावून गेले. त्यामुळे अद्याप वेळ गेलेली नाही, माय-बापांनो, मुली सांभाळा..., अशी म्हणण्याची वेळ पोलिसांवर आली आहे.शुक्रवारी दुपारी मोठ्या उमरीतील आई-वडिलांनी पोलिसांत धाव घेत, एक अल्पवयीन मुलगा त्यांच्या मुलीला त्रास देतो, शाळेजवळ जाऊन छेड काढतो, अशी तक्रार दिली. पोलिसांनी त्या मुलाला पकडून आणल्यानंतर त्याला समज दिली तर त्याने मुलगीच आपल्याला रात्री-मध्यरात्री फोन करते. भेटायला बोलावते. प्रेमपत्र लिहिते, अशी माहिती दिली. एवढेच नाही, तर त्याने मुलीचे मॅसेज, तिने लिहिलेले पत्रसुद्धा दाखविले. इयत्ता आठवी-नववीत शिकणाऱ्या मुलीने प्रियकराला पिल्लू...लव्ह यू...तू जेवण कर...नाहीतर मीसुद्धा जेवण करणार नाही....आपण पळून जाऊ, खोली करू... संसार थाटू असे एक नाही, तर अनेक भावनिक पत्र लिहिलेले पाहून पोलीससुद्धा चक्रावून गेले होते. आपली मुले-मुली शाळेत, शिकवणीला जातात की नाही, मोबाइलवर कुणाशी बोलतात, त्यांचे मित्र-मैत्रिणी कोण, याकडे आई-वडील कधी लक्षच देत नाहीत. पालकांना मुला-मुलींच्या या प्रकरणांची माहिती मिळाल्यावर, त्यांना धक्का बसतो; परंतु तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते आणि नंतर पश्चात्ताप करण्याशिवाय दुसरे गत्यंतर राहत नाही. सध्या समाजात घडणारी कोवळ्या वयातील प्रेम प्रकरणे ही पोलिसांसाठी नित्याची डोकेदुखीच बनली आहेत. पोलिसांनी संबंधित मुलीच्या आई-वडिलांचे, मुलीचे समुपदेशन करून मुलांवर लक्ष ठेवण्यास बजावले आणि त्या अल्पवयीन प्रियकराच्या आई-वडिलांनासुद्धा बोलावून त्यांना समज दिली आणि त्या प्रियकरावर प्रतिबंधित कारवाई करून त्याला सोडून दिले. या घटनेमुळे कोवळ्या वयात एकमेकांविषयी वाढत असणारे शारीरिक आकर्षण, ओढ, सोबत जगण्या-मरण्याच्या आणाभाका याची पाळेमुळे किती खोलवर रुजत आहेत, हे अधोरेखित होते.

पिल्लू तू जेवला नाहीस!कोवळ्या मनावर कोणते संस्कार होत आहेत, याचीसुद्धा पालकांना जाणीव नाही. १३-१४ वर्षे वयाची मुलगी तिच्या प्रियकराला भावनिक पत्र लिहिते आणि त्यात पिल्लू तुला काय झालं. राग आला, तू बोलत का नाहीस. पिल्लू जेवला नाहीस...! असं म्हणते. तोपर्यंतही पालकांना काहीच कळू नये. यावरून पालक किती दुर्लक्ष करतात, हे दिसून येते. लक्षात येईपर्यंत काळजाचा तुकडा भुर्रकन उडून गेलेला असतो.शाळा-महाविद्यालयांसमोर टपोरी मुलांचा वावरशहरातील अनेक शाळा-महाविद्यालयांसमोर टपोरी मुले उभी राहतात. मुलींची छेड काढतात. त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढतात. आकर्षणामुळे काही मुलीसुद्धा भरकटत जातात. शाळा-महाविद्यालयांनीसुद्धा वेळीच याकडे लक्ष देऊन पोलिसांत तक्रार करावी.आई-वडिलांनी मुला-मुलींबाबत दक्ष राहून ती काय करतात, कुठे जातात, मोबाइलवर कुणाशी बोलतात, त्यांचे मित्र-मैत्रिणी कोण आहेत, मुलांना काय अडचणी आहेत, हे जाणून घ्यावे, त्यांचे मित्र बनून संवाद साधला पाहिजे.-शैलेश सपकाळ,ठाणेदार,रामदासपेठ पोलीस स्टेशन.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारीLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टRamdas Peth Police Stationरामदासपेठ पोलीस स्टेशन