शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
2
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
3
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
4
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
5
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
6
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
7
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
8
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
9
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
10
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
11
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट', काय आहे याचा अर्थ?
12
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
13
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
14
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
15
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
16
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
17
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
18
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
19
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
20
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;

अल्पवयीन मुला-मुलीचे प्रेम प्रकरण पाहून पोलीसही अवाक्!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 13:14 IST

अकोला: चित्रपटातील प्रेम दृश्य, प्रणय दृश्य, प्रेमकथांचा युवा पिढीवर विपरीत परिणाम होत आहे. खेळण्या-बागडण्याच्या, शिकण्याच्या वयातील कोवळी मुले-मुली प्रेमाच्या आकर्षणाला बळी पडत आहेत.

अकोला: चित्रपटातील प्रेम दृश्य, प्रणय दृश्य, प्रेमकथांचा युवा पिढीवर विपरीत परिणाम होत आहे. खेळण्या-बागडण्याच्या, शिकण्याच्या वयातील कोवळी मुले-मुली प्रेमाच्या आकर्षणाला बळी पडत आहेत. कोवळ्या वयात घरून पळून जाण्याचे, संसार थाटण्याचे स्वप्न रंगवित असल्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. असाच प्रकार शुक्रवारी रामदासपेठ पोलीस ठाण्यात घडून आला. चिमुरड्या मुलीने प्रियकराला लिहिलेले भावनिक पत्र वाचून पोलीससुद्धा चक्रावून गेले. त्यामुळे अद्याप वेळ गेलेली नाही, माय-बापांनो, मुली सांभाळा..., अशी म्हणण्याची वेळ पोलिसांवर आली आहे.शुक्रवारी दुपारी मोठ्या उमरीतील आई-वडिलांनी पोलिसांत धाव घेत, एक अल्पवयीन मुलगा त्यांच्या मुलीला त्रास देतो, शाळेजवळ जाऊन छेड काढतो, अशी तक्रार दिली. पोलिसांनी त्या मुलाला पकडून आणल्यानंतर त्याला समज दिली तर त्याने मुलगीच आपल्याला रात्री-मध्यरात्री फोन करते. भेटायला बोलावते. प्रेमपत्र लिहिते, अशी माहिती दिली. एवढेच नाही, तर त्याने मुलीचे मॅसेज, तिने लिहिलेले पत्रसुद्धा दाखविले. इयत्ता आठवी-नववीत शिकणाऱ्या मुलीने प्रियकराला पिल्लू...लव्ह यू...तू जेवण कर...नाहीतर मीसुद्धा जेवण करणार नाही....आपण पळून जाऊ, खोली करू... संसार थाटू असे एक नाही, तर अनेक भावनिक पत्र लिहिलेले पाहून पोलीससुद्धा चक्रावून गेले होते. आपली मुले-मुली शाळेत, शिकवणीला जातात की नाही, मोबाइलवर कुणाशी बोलतात, त्यांचे मित्र-मैत्रिणी कोण, याकडे आई-वडील कधी लक्षच देत नाहीत. पालकांना मुला-मुलींच्या या प्रकरणांची माहिती मिळाल्यावर, त्यांना धक्का बसतो; परंतु तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते आणि नंतर पश्चात्ताप करण्याशिवाय दुसरे गत्यंतर राहत नाही. सध्या समाजात घडणारी कोवळ्या वयातील प्रेम प्रकरणे ही पोलिसांसाठी नित्याची डोकेदुखीच बनली आहेत. पोलिसांनी संबंधित मुलीच्या आई-वडिलांचे, मुलीचे समुपदेशन करून मुलांवर लक्ष ठेवण्यास बजावले आणि त्या अल्पवयीन प्रियकराच्या आई-वडिलांनासुद्धा बोलावून त्यांना समज दिली आणि त्या प्रियकरावर प्रतिबंधित कारवाई करून त्याला सोडून दिले. या घटनेमुळे कोवळ्या वयात एकमेकांविषयी वाढत असणारे शारीरिक आकर्षण, ओढ, सोबत जगण्या-मरण्याच्या आणाभाका याची पाळेमुळे किती खोलवर रुजत आहेत, हे अधोरेखित होते.

पिल्लू तू जेवला नाहीस!कोवळ्या मनावर कोणते संस्कार होत आहेत, याचीसुद्धा पालकांना जाणीव नाही. १३-१४ वर्षे वयाची मुलगी तिच्या प्रियकराला भावनिक पत्र लिहिते आणि त्यात पिल्लू तुला काय झालं. राग आला, तू बोलत का नाहीस. पिल्लू जेवला नाहीस...! असं म्हणते. तोपर्यंतही पालकांना काहीच कळू नये. यावरून पालक किती दुर्लक्ष करतात, हे दिसून येते. लक्षात येईपर्यंत काळजाचा तुकडा भुर्रकन उडून गेलेला असतो.शाळा-महाविद्यालयांसमोर टपोरी मुलांचा वावरशहरातील अनेक शाळा-महाविद्यालयांसमोर टपोरी मुले उभी राहतात. मुलींची छेड काढतात. त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढतात. आकर्षणामुळे काही मुलीसुद्धा भरकटत जातात. शाळा-महाविद्यालयांनीसुद्धा वेळीच याकडे लक्ष देऊन पोलिसांत तक्रार करावी.आई-वडिलांनी मुला-मुलींबाबत दक्ष राहून ती काय करतात, कुठे जातात, मोबाइलवर कुणाशी बोलतात, त्यांचे मित्र-मैत्रिणी कोण आहेत, मुलांना काय अडचणी आहेत, हे जाणून घ्यावे, त्यांचे मित्र बनून संवाद साधला पाहिजे.-शैलेश सपकाळ,ठाणेदार,रामदासपेठ पोलीस स्टेशन.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारीLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टRamdas Peth Police Stationरामदासपेठ पोलीस स्टेशन