शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

जनजागृतीनंतरही मान्सूनपूर्व कपाशीची लागवड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 10:18 IST

आता कृषी विभाग संबंधित शेतकऱ्यांसह विक्रेते आणि बियाणे कंपन्यांवर कारवाईच्या तयारीत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कृषी विभागाने वारंवार जनजागृती करूनही काही शेतकऱ्यांनी मध्य प्रदेशातून छुप्या मार्गाने बियाण्यांची खरेदी करून कपाशीची मान्सूनपूर्व लागवड केल्याची माहिती खुद्द कृषी विभागातील एका वरिष्ठ अधिकाºयाने दिली. त्यामुळेच काही भागामध्ये कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. त्यामुळे आता कृषी विभाग संबंधित शेतकऱ्यांसह विक्रेते आणि बियाणे कंपन्यांवर कारवाईच्या तयारीत आहेत.बोंडअळींसह इतर कीटकांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गत वर्षभर जनजागृती मोहीम राबविल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले; परंतु तरीदेखील अकोल्यासह जवळपासच्या भागात अनेक शेतकºयांनी मान्सूनपूर्व कपाशीची लागवड केली.स्थानिक स्तरावर बियाणे मिळत नसल्याने काही शेतकºयांनी मध्य प्रदेशातून छुप्या मार्गाने बियाण्यांची खरेदी करून कपाशीची लागवड केल्याने बोंडअळीचे जीवनचक्र कायम असल्याचे कृषी विभागातील वरिष्ठ अधिकाºयाचे म्हणणे आहे. कृषी विभागाने मार्गदर्शन करूनही काही शेतकºयांनी मान्सूनपूर्व कपाशीची लागवड केली, अशा सर्व शेतकºयांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याच्या तयारीत कृषी विभाग असल्याची माहिती आहे. गत चार ते पाच वर्षांपासून राज्यात कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे.कृषी विभागाने गावोगावी शेतीशाळा घेऊन शेतकºयांची जनजागृती केली. त्यानंतरही जिल्ह्यातील शेकडो शेतकºयांनी मान्सूनपूर्व कपाशीची लागवड केली. कृषी विभागाच्या या मोहिमेला यश आल्याचे दिसत नाही. मान्सूनपूर्व कपाशीची लागवड करणाºया शेतकºयांना बोंडअळी प्रादुर्भावाचा सामना करावा लागत आहे.

गत वर्षभरापासून कृषी विभागातर्फे विविध माध्यमातून शेतकºयांना शेतीविषयक मार्गदर्शन करण्यात आले. शिवाय, मान्सूनपूर्व कपाशीची पेरणी करु नका, असे आवाहनदेखील करण्यात आले होते; मात्र तरीदेखील शेतकºयांनी मान्सूनपूर्व कपाशीची लागवड केली. त्यामुळे बियाणे विक्रेते, कंपन्यांसह शेतकºयांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल.- मोहन वाघ,कृषी अधीक्षक जिल्हा कृषी अधिकारी, अकोला

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी