शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
4
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
5
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
6
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
7
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
8
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
9
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
10
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
11
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
12
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
13
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
14
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
15
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
16
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
17
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
18
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

रेल्वे वॅगनमधून पेट्रोल गळती; प्रवाशांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 10:53 IST

रेल्वेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समयसूचकता आणि सतर्कता बाळगून गळती बंद केल्याने पुढील अनर्थ टळला.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : भुसावळ-नागपूर ट्रॅकवरील पश्चिम रेल्वेच्या पानखेडी ते बोरखेडी जात असलेल्या मालवाहू रेल्वे वॅगनमधून पेट्रोल गळती होत असल्याची बाब मंगळवारी दुपारी अकोला रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक दोनवरील प्रवाशांच्या लक्षात आली. ही बाब त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना दिली. रेल्वेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समयसूचकता आणि सतर्कता बाळगून गळती बंद केल्याने पुढील अनर्थ टळला.पश्चिम रेल्वे विभागाची मालवाहू गाडी पेट्रोलने भरलेले वॅगन मंगळवारी नागपूरकडे जात होती. ही रेल्वेगाडी अकोला रेल्वेस्थानकावरील प्लॅटफार्म क्रमांक दोनवरील एफओबीच्या खाली थांबलेली असताना, काही प्रवाशांना वॅगनमधून पेट्रोलची गळती होत असल्याचे दिसले. त्यांनी ही बाब रेल्वे अधिकाºयांच्या लक्षात आणून दिली. रेल्वे अधिकाºयांकडून ही बाब रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ )पोलिसांपर्यंत पोहोचल्याने संपूर्ण यंत्रणेने घटनास्थळावर धाव घेतली. मालगाडीच्या वॅगनला असलेल्या नळाचे नट फिट कसण्यात आले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला आणि पेट्रोल गळती थांबली.पिवळे ‘सील’ नसल्याने संशयगळती लागलेल्या मालवाहू रेल्वे वॅगनच्या पाइपला पिवळ्या रंगाचे सील नव्हते. हे सील तुटले की तोडले, यावर संशय व्यक्त होत आहे. नागरिक आणि रेल्वे अधिकाºयांची समयसूचकता व सतर्कतेमुळे होणारा अनर्थ टळला.

टॅग्स :Akolaअकोलाrailwayरेल्वेAkola Railway Stationअकोला रेल्वे स्थानक