शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

जनता भाजी बाजारात ठरवून दिलेल्‍या वेळेत विक्रीसाठी मुभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:19 IST

अकोला – कोरोना विषाणूचा प्रादुर्भावावर आळा घालण्याच्या दृष्टीने प्रशासनाने अकोला शहरातील जनता भाजीबाजार बंद करण्या संदर्भात १६ एप्रिल रोजी ...

अकोला – कोरोना विषाणूचा प्रादुर्भावावर आळा घालण्याच्या दृष्टीने प्रशासनाने अकोला शहरातील जनता भाजीबाजार बंद करण्या संदर्भात १६ एप्रिल रोजी आदेश निर्गमित करण्यात आले होते. मात्र मंगळवारी सायंकाळी जिल्हाधिकाऱ्यांसाेबत झालेल्या आढावा बैठकीत जनता भाजी बाजारात ठरवून दिलेल्‍या वेळेत विक्रीसाठी मुभा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांसाेबत झालेल्या आढावा बैठकीच्या अनुषंगाने मनपा आयुक्‍त नीमा अरोरा यांनी बाजार संदभार्त आदेश दिले आहे.

जनता भाजी बाजार हा दिनांक 21 एप्रिल सकाळी 11 वाजता पासून पुढील आदेशापर्यंत ज्यांची जनता बाजार येथे किरकोळ भाजीपाला व फळ व्यवसायाची दुकाने आहेत त्यांनाच भाजीपाला व फळ विक्री करण्यास मुभा राहील. या व्‍यतिरिक्‍त ईतर कोणत्‍याही किरकोळ भाजीपाला व फळ विक्री करण्‍याऱ्याला या ठिकाणी व्‍यवसाय करता येणार नाही सदरची संपुर्ण बाजारपेठ हि सकाळी 7 ते सकाळी 11 वाजे पर्यंतच सुरु ठेवण्‍याची मुभा देण्यात आली आहे

अशा आहेत सूचना

भाजीपाला व फळ हर्रासी करण्याकरिता महात्मा फुले भाजी बाजार - वाशिम रोड व सावित्रीबाई ज्योतीबा फुले भाजी बाजार - लोणी रोड या ठिकाणी व्यवसाय करण्यास मुभा राहील.

महात्मा फुले भाजी बाजार - वाशिम रोड व सावित्रीबाई ज्योतीबा फुले भाजी बाजार - लोणी रोड या ठिकाणी घाऊक व्यवसाय करण्यारिता आवश्यक व्यवस्था असल्यामुळे पर्यायी जागा म्हणुन जनता भाजी बाजाराचा यापुढे हर्रासीकरिता वापर करता येणार नाही.

जनता भाजीबाजार, जुना भाजी बाजार, जैन मंदिर रोड, ओपन थियेटर ते फतेह अली चौक येथे किरकोळ भाजीपाला विक्री करणारे व्यवसायीक यांची भाटे क्लब प्रांगण येथे व्यवसाय करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

किरकोळ भाजीपाला / फळ विक्री करीता व्यवसायीक यांना परवानगी दिलेल्या जागेत कोरोना नियमांचे पालन करुन आपला व्यवसाय करावा. दिलेल्या जागे व्यतिरिक्त इतर ठिकाणी प्रतिबंधीत क्षेत्रामध्ये व्यवसाय करीत असल्याचे आढळून आल्यास प्रशासनाकडून कोराना नियमांचे उल्लंघण करीत असल्याचे गृहित धरुन कठोर कारवाई करण्यात येईल.

जनता भाजी बाजार येथे किराणा व जिवनावश्यक वस्तुंच्‍या विक्रींच्‍या व्यवसायास विहित कालावधी करिता व्यवसाय करण्याची मुभा राहील. 0 उपरोक्त व्यवसाय धारकांना व्यवसाय करतांना सोशल डिस्टसिंग नियमाचे पालन करणे तसेच मास्कचा वापर करणे बंधनकारक राहील.