शहरं
Join us  
Trending Stories
1
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
4
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
5
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
6
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
7
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
8
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
9
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
10
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
11
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
12
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
13
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
15
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
16
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
17
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
18
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
19
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 

जनजागृतीतून वाढविणार मतदानाची टक्केवारी

By admin | Updated: October 2, 2014 01:48 IST

प्रशासन, शैक्षणिक संस्था व स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींचा लोकमत परिचर्चेत निर्धार व्यक्त.

अकोला : मतदान हा राज्यघटनेने दिलेला सर्वात महत्त्वाचा अधिकार आहे; परंतु या अधिकाराचा वापर करण्याविषयी मोठी उदासीनता आहे. परिणामी मतदानाची टक्केवारी अत्यंत कमी राहते. मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी अधिकाधिक जनजागृती करण्याचा निर्धार बुधवारी ह्यलोकमतह्णच्या परिचर्चेत प्रशासकीय अधिकारी, विविध शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी व स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी यांनी बोलून दाखविला. ह्यलोकमतह्णच्यावतीने ह्यमतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी उपाययोजनाह्ण या विषयावर परिचर्चेचे आयोजन करण्यात आले होते. या परिचर्चेत निवासी उपजिल्हाधिकारी अनिल खंडागळे, मतदान जनजागृती अभियानाचे समन्वयक प्रकाश अंधारे, खंडेलवाल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जगदीश साबू, जि.प. शाळा भौरदचे मुख्याध्यापक रुपसिंग बागडे, शिवाजी महाविद्यालयातील राज्यशास्त्र विषयाचे विभागप्रमुख प्रा. जीवन पवार, बबन कानकिरड व ह्यपहाटह्ण या स्वयंसेवी संस्थेचे संचालक आशिष कसले आदी मान्यवर सहभागी झाले होते. सर्वच सहभागी वक्त्यांनी मतदानाची टक्केवारी वाढणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. यासाठी केवळ शासनच नाही तर प्रत्येकानेच पुढे आले पाहिजे. मतदानाचे महत्त्व मतदारांच्या मनात बिंबविणे आवश्यक असल्याचेदेखील या वक्त्यांनी सांगितले. प्रशासनाच्या प्रतिनिधींनी मतदान जागृतीसाठी शासन स्तरावर व्यापक प्रयत्न करण्यात आले असल्याचे सांगितले. स्विप अंतर्गत हे सर्व उपक्रम राबविण्यात येत आहेत. जागृती रॅली तसेच ठिकठिकाणी पोस्टर, बॅनर लावण्यात येत आहेत. अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून गावपातळीवर जागृती केली जात आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांची मदत घेऊन युवकांना मतदानासाठी आकर्षित केले जात आहे. महिलांसाठी रॅलीचे आयोजन केले आहे. मोहल्ला व वार्ड अँम्बेसिडर नियुक्त करण्यात आले आहेत. ७0 टक्के मतदानाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून ते निश्‍चितच पूर्ण होईल, असे या प्रतिनिधींनी सांगितले. शैक्षणिक संस्थांच्या प्रतिनिधींनी जे सातत्याने मतदान करीत नाही, त्यांच्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे मत मांडले. प्रत्येकाने आपल्या वार्डात, परिसरात जागृती केली पाहिजे. शालेय अभ्यासक्रमात मतदान प्रक्रिया प्रात्यक्षिक स्वरुपात शिकविली पाहिजे. प्रतिज्ञापत्र भरूनदेखील जागृती होत आहे. उच्च वर्ग आणि मध्यम वर्गालादेखील लक्ष्य केले पाहिजे, असे या प्रतिनिधींनी सांगितले. स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी मतदान जागृतीसाठी सोशल मीडियाचा वापर केला गेला पाहिजे, असे मत व्यक्त केले. २५ जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिन अधिक व्यापकपणे साजरा केला पाहिजे. सोबतच नोटा विषयी जनजागृती केली गेली पाहिजे, असे सांगितले.