शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

पर्यावरण रक्षणासाठी चिमुकल्यांनी बनविल्या कागदी पिशव्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 16:09 IST

घातक प्लास्टिकला हद्दपार करण्यासाठी आणि नागरिकांनी प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी चिमुकल्या मुलांनी पुढाकार घेतला आहे.

अकोला: जमिनीत अथवा पाण्यात असले तरी प्लास्टिक नष्ट होत नाही. प्लास्टिक जाळले तर हवेत प्रदूषण होते. प्लास्टिकमध्ये विविध घातक रसायने असतात. मानवाच्या कातडीला ते धोकादायक ठरू शकते. जमीन तसेच पाण्यातही ते हानिकारक ठरते. अशा घातक प्लास्टिकला हद्दपार करण्यासाठी आणि नागरिकांनी प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी चिमुकल्या मुलांनी पुढाकार घेतला आहे. परीक्षा आटोपल्यानंतर मुलांना सुट्ट्या लागल्या आहेत. या सुट्टीचा सदुपयोग करण्यासाठी राऊतवाडीतील चिमुकल्या मुलांनी पर्यावरण रक्षणाच्या दृष्टिकोनातून कागदी पिशव्या व पाकिटे बनविण्याचा उपक्रम सुरू केला आहे.प्लास्टिक पिशव्या पर्यावरणासाठीच नाही तर मनुष्य, प्राण्यांसाठीसुद्धा घातक आहेत. प्लास्टिक जाळले तर हवेत प्रदूषण होते. प्लास्टिकमध्ये विविध घातक रसायने असतात. मानवाच्या कातडीला ते धोकादायक ठरू शकते. जमीन तसेच पाण्यातही ते हानिकारक ठरते. पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ अन्वये शासनाने ४० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकवर (वापर आणि विक्री) बंदी घातली आहे; परंतु बंदीचा कुणावरच परिणाम होत नाही. भाजीवाला, फळवाला, किराणा दुकान, खाद्य वस्तू विक्री दुकान, औषधे आदी सर्वच ठिकाणी पातळ व कमी जाडीच्या प्लास्टिकच्या पिशव्यांचा सर्रास वापर करण्यात येत आहे. अशा घातक प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळण्यासाठी चिमुकले मंडळी पुढे सरसावली आहेत. राऊतवाडीतील श्यामली वानखेडे, ओजस राऊत, पार्थ वानखडे, आर्या वानखेडे, अनू राऊत, रेणुका राऊत, वीर वानखडे या चिमुकल्यांच्या परीक्षा आटोपल्यानंतर, त्यांच्या शाळेला सुट्टी लागली आहे. या सुट्टीचा सदुपयोग व्हावा आणि समाजात जनजागृतीसुद्धा व्हावी, यासाठी या चिमुकल्यांनी कागदी पिशव्या तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. प्लास्टिक पर्यावरण आणि मनुष्यासाठी घातक असल्यामुळे प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळून कागदी व कापडी पिशव्यांचा वापर करण्याचा संदेशच या चिमुकल्यांनी दिला आहे. दररोज ४0 ते ५0 कागदी पिशव्या तयार करून ही चिमुकली मंडळी परिसरातील नागरिकांना उपलब्ध करून देत आहेत. या चिमुकल्यांनी सुरू केलेला कागदी पिशव्या निर्मितीचा उद्योग परिसरात कौतुकाचा विषय ठरत आहे. कोवळ्या मनाच्या मुलांना जे कळतं ते आम्हा मोठ्यांना का कळत नाही? 

 

टॅग्स :AkolaअकोलाStudentविद्यार्थीenvironmentवातावरण