शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

वारकऱ्यांसह एसटीलाही पंढरीची ओढ; सलग दुसऱ्या वर्षी ४७ लाखांचा फटका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 11:00 IST

Pandhari's attraction to ST along with Warakaris : एसटी महामंडळाला यात्रा स्पेशल फेऱ्यांच्या माध्यमातून मोठे उत्पन्न मिळते.

ठळक मुद्देयंदाही फेऱ्या सोडण्यात येणार नाही पंढरपूर यात्रा रद्द झाल्याचा परिणाम

- सागर कुटे

अकोला : कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी पंढरपूरची वारी होत नाही. या निर्णयाचा फटका वारकऱ्यांसह एसटी महामंडळालाही बसला आहे. पंढरपूर यात्रा स्पेशल फेऱ्यांच्या माध्यमातून अकोला विभागाला २०१९ साली ४७ लाख ३९ हजार रुपये उत्पन्न मिळाले होते. या उत्पन्नावर सलग दुसऱ्या वर्षी पाणी सोडावे लागणार आहे.

कोरोनामुळे गत दीड वर्षापासून एसटी महामंडळ आर्थिक अडचणीत आले आहे. वारंवार लागणाऱ्या निर्बंधांमुळे बसेसचे उत्पन्न घटले असून, प्रवासीही मिळत नसल्याचे दिसून येते. आता अनलॉकमध्ये काही प्रमाणात फेऱ्या सुरू झाल्या आहे. त्यामुळे थोडे-फार उत्पन्न हाती लागत आहे. हजारो वारकरी पायी दिंडीत सहभागी होतात, तर अधिक जण परिवहन महामंडळ, तसेच खासगी वाहनाद्वारे पंढरीची वाट धरतात. जे वारकरी पायी पंढरपूरला जाऊ शकत नाहीत, ते एसटीने वारी करतात. एसटी महामंडळाला यात्रा स्पेशल फेऱ्यांच्या माध्यमातून मोठे उत्पन्न मिळते. कोरोना काळात सर्व यात्रा, उत्सव बंद आहे. परिणामी, या उत्पन्नावरही पाणी सोडावे लागत आहे. सलग दुसऱ्या वर्षी ४७ लाखांचा फटका एसटी महामंडळाला बसला आहे.

 

बसेस दरवर्षी पंढरपूरसाठी सोडल्या जायच्या २६५

त्यातून एसटीला उत्पन्न मिळायचे? ४७,३९,०००

प्रवासी एसटीतून दरवर्षी प्रवास करायचे? ३८,४३२

 

जिल्ह्यातून दरवर्षी जाणाऱ्या पालख्या

अकोला जिल्ह्यातून दरवर्षी मोठ्या प्रमाणात पालख्या पंढरपूर वारीला जातात. यामध्ये नाना उजवणे यांची पालखी, गजानन महाराज संस्थान बोरगाव, विठ्ठल रुखुमाई संस्थान सोमठाणा या पालख्यांचा समावेश आहे, तसेच संत गजानन महाराज पादुका संस्थान मुंडगाव, वासुदेव महाराज श्रद्धासागर अकोट येथील पालखी दरवर्षी पंढरपूरला जाते. या पालख्यांसोबत हजारो वारकरी पायी वारी करतात.

यंदा एसटीने एकही पालखी नाही!

राज्यभरातून काही मानाच्या पालख्या एसटी बसच्या माध्यमातून पंढरपूरला पोहोचणार आहेत, परंतु अकोला जिल्ह्यातून एकाही पालखीची निवड झाली नाही. त्यामुळे एसटी बसने एकही पालखी जाणार नसल्याचे महामंडळाकडून सांगण्यात आले.

 

वारकऱ्यांचेही गावी मन रमेना!

दरवर्षी पंढरपूरची वारी करत असतो. आतापर्यंत पंढरपूरच्या १९ वाऱ्या केल्या आहे, परंतु गत दोन वर्षांपासून कोरोनामुळे पंढरपूर यात्राही रद्द करण्यात आल्याने वारी बंद आहे. यंदा घरूनच विठ्ठलाचे दर्शन घ्यावे लागणार आहे.

- मधुकर राहुडकर

 

वारी हेच वारकऱ्याचे जीवन आहे. वारी नाही, तर आमचे जीवन शून्य आहे. सरकारच्या नियमांचे आम्ही स्वागत करतो. मात्र, पंढरपूरला जाता नाही आले, तरी शासनाने गावखेड्यातील विठ्ठलाचे एखादे मंदिर खुले करावे.

- काशिनाथ कर्णेवार

कोरोनाचाही फटका!

कोरोनाचाही मोठा फटका एसटीला सहन करावा लागत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही परिवहन सेवा सुमारे दोन ते अडीच महिने बंद होती. परिणामी, महामंडळाची आर्थिक स्थिती अधिकच खालावली आहे. आता आषाढी वारी रद्द झाल्याने लालपरी आर्थिक संकटात सापडणार आहे.

टॅग्स :Akolaअकोलाstate transportएसटीPandharpur Wariपंढरपूर वारी