शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
3
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
4
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
5
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
6
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
7
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
8
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
9
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
10
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
11
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
12
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
13
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
14
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
15
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
16
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
17
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
18
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
19
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
20
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...

30 हजारांवर नागरिक ठरले कोरोनावर भारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:18 IST

अकाेला : अकाेल्यात सात एप्रिल २०२० राेजी पहिला काराेना रुग्ण आढळून आल्यानंतर काराेना विषाणूची सुरू झालेली दहशत दिवसेंदिवस ...

अकाेला : अकाेल्यात सात एप्रिल २०२० राेजी पहिला काराेना रुग्ण आढळून आल्यानंतर काराेना विषाणूची सुरू झालेली दहशत दिवसेंदिवस वाढतच आहे. मध्यतंरी काेराेना सपंला असे दिलासादायक चित्र असतानाच काेराेना संसर्गाची दुसरी लाट आली अन् कोराेनाचे थैमान पूर्वीच्या तुलनेत आणखी वाढले आहे. सध्या तर रुग्णालयात जागा नाही, औषधोपचार नाही, इंजेक्शन नाही अशी नकारात्मक स्थिती असतानाही तब्बल ३० हजारांवर रुग्णांनी कोराेनावर मात करून काेराेनाला हरविण्यात यश मिळविले आहे.

काेराेनावर मात करण्यासाठी प्रशासनाने ट्रेसिंग, टेस्टिंग व ट्रीटमेंट यासाेबतच मास्क वापरा, अंतर पाळा, हात धुवा या त्रिसूत्रीवर अधिक भर दिल्याने रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ३० हजारांवर पाेहोचले आहे. तब्बल ३० हजार ६५० नागरिकांनी कोरोनावर मात केली असून ते ठणठणीत बरे झाले आहेत. प्रबळ इच्छाशक्ती, योग्यवेळी औषधोपचार, प्रशासनासह आरोग्य विभागाचे प्रयत्न यासोबतच कोरोनाला हरविण्याची जिद्द यामुळेच हे शक्य झाले आहे. त्यामुळे कोरोना नाही तर आपणच भारी, असा विचार करून कोरोना आजारावरही विजय मिळविता येतो, हे या सर्वांनी दाखवून दिले आहे.

मागील वर्षभरापासून कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मार्च २०२१ मध्ये लाॅकडाऊन करण्यात आले. तेव्हापासून आजपर्यंत कोरोनाची दहशत कायम नागरिकांच्या मनात घर करून आहे. मागील वर्षी जिल्ह्यात कोरोनाने धडक दिली. त्यानंतर जिल्हा प्रशासन, तसेच आरोग्य प्रशासनाने शर्थीचे प्रयत्न करून यावर मात करण्यासाठी ठिकठिकाणी कोरोना चाचणी केंद्र सुरू केले.

वर्षभरात २ लाखांवर रुग्णांनी काेराेना लक्षणांची तपासणी करून घेतली. यामध्ये ३४ हजार १४९ नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे, अशी बाधा हाेणाऱ्यांमध्ये फिजिकल डिस्टन्सिंग न पाळणे, मास्क न वापरणे, तसेच बेफिकिरी कारणीभूत ठरली आहे. याेग्य वेळी उपचारासाठी दाखल झाल्याने अनेकांना काेराेनावर मात करणे शक्य झाले आहे वेळीच औषधोपचार, डाॅक्टरांचे शर्थीचे प्रयत्न, तसेच प्रशासनाने सुचविलेल्या उपाययोजना यासाठी कामी आल्या आहेत.

काेट...

कोविडच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, लक्षणे दिसताच नागरिकांनी कोविड चाचणी करून उपचारास सुरुवात करावी. प्रकृती गंभीर झाल्यानंतर रुग्ण रुग्णालयात दाखल झाल्यास उशिरा उपचारास सुरुवात झाल्याने रुग्ण उपचारास प्रतिसाद देत नाही. तोपर्यंत रुग्णाच्या फुप्फुसावरील इन्फेक्शन आणि ऑक्सिजनची पातळी खालावते. त्यामुळे हलगर्जी जिवावर बेतू शकते.

- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक, अकोला

बाॅक्स...

गृहविलगीकरणातील रुग्णांनी घ्यावी काळजी

जिल्ह्यात सद्य:स्थितीत ॲक्टिव्ह रुग्णांचा आकडा चार हजारांपेक्षा जास्त आहे. यापैकी सुमारे १५०० रुग्ण रुग्णालये, तसेच संस्थात्मक विलगीकरणात आहेत. उर्वरित सर्वच रुग्ण हे गृहविलगीकरणात आहेत. या रुग्णांनी आयसाेलेशनमध्येच राहणे अपेक्षित आहे. त्यांच्यामुळे घरातील, तसेच शेजारी कुणालाही संसर्ग हाेणार नाही याची काळजी रुग्णांनी घेतली तर कोराेनाच्या प्रसाराला अटकाव हाेऊ शकेल

पाॅइंटर.....

आता सद्य:स्थिती

एकूण पॉझिटिव्ह अहवाल ३४२०१

मयत-५६७

डिस्चार्ज-२८९६१

ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह-४६७३