शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

30 हजारांवर नागरिक ठरले कोरोनावर भारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:18 IST

अकाेला : अकाेल्यात सात एप्रिल २०२० राेजी पहिला काराेना रुग्ण आढळून आल्यानंतर काराेना विषाणूची सुरू झालेली दहशत दिवसेंदिवस ...

अकाेला : अकाेल्यात सात एप्रिल २०२० राेजी पहिला काराेना रुग्ण आढळून आल्यानंतर काराेना विषाणूची सुरू झालेली दहशत दिवसेंदिवस वाढतच आहे. मध्यतंरी काेराेना सपंला असे दिलासादायक चित्र असतानाच काेराेना संसर्गाची दुसरी लाट आली अन् कोराेनाचे थैमान पूर्वीच्या तुलनेत आणखी वाढले आहे. सध्या तर रुग्णालयात जागा नाही, औषधोपचार नाही, इंजेक्शन नाही अशी नकारात्मक स्थिती असतानाही तब्बल ३० हजारांवर रुग्णांनी कोराेनावर मात करून काेराेनाला हरविण्यात यश मिळविले आहे.

काेराेनावर मात करण्यासाठी प्रशासनाने ट्रेसिंग, टेस्टिंग व ट्रीटमेंट यासाेबतच मास्क वापरा, अंतर पाळा, हात धुवा या त्रिसूत्रीवर अधिक भर दिल्याने रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ३० हजारांवर पाेहोचले आहे. तब्बल ३० हजार ६५० नागरिकांनी कोरोनावर मात केली असून ते ठणठणीत बरे झाले आहेत. प्रबळ इच्छाशक्ती, योग्यवेळी औषधोपचार, प्रशासनासह आरोग्य विभागाचे प्रयत्न यासोबतच कोरोनाला हरविण्याची जिद्द यामुळेच हे शक्य झाले आहे. त्यामुळे कोरोना नाही तर आपणच भारी, असा विचार करून कोरोना आजारावरही विजय मिळविता येतो, हे या सर्वांनी दाखवून दिले आहे.

मागील वर्षभरापासून कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मार्च २०२१ मध्ये लाॅकडाऊन करण्यात आले. तेव्हापासून आजपर्यंत कोरोनाची दहशत कायम नागरिकांच्या मनात घर करून आहे. मागील वर्षी जिल्ह्यात कोरोनाने धडक दिली. त्यानंतर जिल्हा प्रशासन, तसेच आरोग्य प्रशासनाने शर्थीचे प्रयत्न करून यावर मात करण्यासाठी ठिकठिकाणी कोरोना चाचणी केंद्र सुरू केले.

वर्षभरात २ लाखांवर रुग्णांनी काेराेना लक्षणांची तपासणी करून घेतली. यामध्ये ३४ हजार १४९ नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे, अशी बाधा हाेणाऱ्यांमध्ये फिजिकल डिस्टन्सिंग न पाळणे, मास्क न वापरणे, तसेच बेफिकिरी कारणीभूत ठरली आहे. याेग्य वेळी उपचारासाठी दाखल झाल्याने अनेकांना काेराेनावर मात करणे शक्य झाले आहे वेळीच औषधोपचार, डाॅक्टरांचे शर्थीचे प्रयत्न, तसेच प्रशासनाने सुचविलेल्या उपाययोजना यासाठी कामी आल्या आहेत.

काेट...

कोविडच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, लक्षणे दिसताच नागरिकांनी कोविड चाचणी करून उपचारास सुरुवात करावी. प्रकृती गंभीर झाल्यानंतर रुग्ण रुग्णालयात दाखल झाल्यास उशिरा उपचारास सुरुवात झाल्याने रुग्ण उपचारास प्रतिसाद देत नाही. तोपर्यंत रुग्णाच्या फुप्फुसावरील इन्फेक्शन आणि ऑक्सिजनची पातळी खालावते. त्यामुळे हलगर्जी जिवावर बेतू शकते.

- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक, अकोला

बाॅक्स...

गृहविलगीकरणातील रुग्णांनी घ्यावी काळजी

जिल्ह्यात सद्य:स्थितीत ॲक्टिव्ह रुग्णांचा आकडा चार हजारांपेक्षा जास्त आहे. यापैकी सुमारे १५०० रुग्ण रुग्णालये, तसेच संस्थात्मक विलगीकरणात आहेत. उर्वरित सर्वच रुग्ण हे गृहविलगीकरणात आहेत. या रुग्णांनी आयसाेलेशनमध्येच राहणे अपेक्षित आहे. त्यांच्यामुळे घरातील, तसेच शेजारी कुणालाही संसर्ग हाेणार नाही याची काळजी रुग्णांनी घेतली तर कोराेनाच्या प्रसाराला अटकाव हाेऊ शकेल

पाॅइंटर.....

आता सद्य:स्थिती

एकूण पॉझिटिव्ह अहवाल ३४२०१

मयत-५६७

डिस्चार्ज-२८९६१

ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह-४६७३