शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

अन्यथा तीव्र आंदोलन, शेतकरी संघटनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2023 16:02 IST

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन: कार्यालयासमोर केले ठिय्या आंदोलन

रवी दामोदर 

अकोला : अतिवृष्टी व संततधार पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. शासनाने नुकसानापोटी मदतही जाहीर करून वाटप करण्यात आले. मात्र अद्यापही अकोट व तेल्हारा तालुक्यातील बहुतांश शेतकरी मदतीपासून वंचित आहेत. चार महिने उलटून गेल्यानंतरही शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्वरित मदत द्यावी, अशी मागणी करीत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेकडो शेतकऱ्यांसह शेतकरी संघटनेचा मोर्चा दि. २२ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात धडकला होता. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ मदतीचे वाटप करावे, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

खरीप हंगामात सुरुवातीला पिके शेतात डोलत होती. यंदा चांगले उत्पादन होण्याची आशा शेतकऱ्यांना लागून होती. मात्र अतिवृष्टी व संततधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरले. ऑगस्ट, सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान होऊन शेती खरडून गेली होती. या नुकसानापोटी राज्य शासनाने तत्काळ सर्व्हे करून मदत दिली. मात्र अद्यापही अकोट तालुक्यातील अकोलखेड, अंबोडा यासह इतर भागातील अनेक शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित आहेत. यासंदर्भात अनेक वेळा मागणी करूनही अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. गत चार महिन्यांपासून शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे याकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्याची मागणी करीत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत कौठकर यांच्या नेतृत्त्वात शेकडो शेतकऱ्यांनी शहरातील अशोक वाटिका ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सतीश उंबरकर, मकसूद मुल्लाजी, नीलेश नेमाडे, मोहन खिरोडकर, ज्ञानेश्वर रेचे, अरूण रेचे, मानिक जामडे, प्रवीण केदार, विलास ताथोड, डाॅ. नीलेश पाटील, अशोक टिपले, दीपक तळोकार, नारायण बायवार, अरूण राऊत, राम आखरे, अनुराधा जामडे, किरण सावळे, किरण कौठकर, वैशाली कावरे, योगिता बायवार, मंदा निचळ आदींसह शेतकरी व महिला उपस्थित होते.

....अन्यथा तीव्र आंदोलन

गत चार महिन्यांपासून नुकसानग्रस्त शेतकरी मदतीसाठी भटकंती करीत आहेत. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा होता. त्यामुळे शासनाने त्वरीत शेतकऱ्यांना मदतीचे वाटप करावे, अन्यथा शेतकरी कुटुंबासह जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत कौठकर यांनी याप्रसंगी दिला. 

टॅग्स :FarmerशेतकरीAkolaअकोला