शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
2
'अनेक वळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
4
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
5
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
6
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
7
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
8
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
9
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
10
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
11
Israel Iran War: इस्रायलचा इराणवर बॉम्बवर्षाव; ४०६ जण ठार!
12
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
13
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
14
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
15
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
16
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
17
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
18
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
20
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?

अन्यथा तीव्र आंदोलन, शेतकरी संघटनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2023 16:02 IST

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन: कार्यालयासमोर केले ठिय्या आंदोलन

रवी दामोदर 

अकोला : अतिवृष्टी व संततधार पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. शासनाने नुकसानापोटी मदतही जाहीर करून वाटप करण्यात आले. मात्र अद्यापही अकोट व तेल्हारा तालुक्यातील बहुतांश शेतकरी मदतीपासून वंचित आहेत. चार महिने उलटून गेल्यानंतरही शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्वरित मदत द्यावी, अशी मागणी करीत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेकडो शेतकऱ्यांसह शेतकरी संघटनेचा मोर्चा दि. २२ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात धडकला होता. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ मदतीचे वाटप करावे, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

खरीप हंगामात सुरुवातीला पिके शेतात डोलत होती. यंदा चांगले उत्पादन होण्याची आशा शेतकऱ्यांना लागून होती. मात्र अतिवृष्टी व संततधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरले. ऑगस्ट, सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान होऊन शेती खरडून गेली होती. या नुकसानापोटी राज्य शासनाने तत्काळ सर्व्हे करून मदत दिली. मात्र अद्यापही अकोट तालुक्यातील अकोलखेड, अंबोडा यासह इतर भागातील अनेक शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित आहेत. यासंदर्भात अनेक वेळा मागणी करूनही अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. गत चार महिन्यांपासून शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे याकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्याची मागणी करीत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत कौठकर यांच्या नेतृत्त्वात शेकडो शेतकऱ्यांनी शहरातील अशोक वाटिका ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सतीश उंबरकर, मकसूद मुल्लाजी, नीलेश नेमाडे, मोहन खिरोडकर, ज्ञानेश्वर रेचे, अरूण रेचे, मानिक जामडे, प्रवीण केदार, विलास ताथोड, डाॅ. नीलेश पाटील, अशोक टिपले, दीपक तळोकार, नारायण बायवार, अरूण राऊत, राम आखरे, अनुराधा जामडे, किरण सावळे, किरण कौठकर, वैशाली कावरे, योगिता बायवार, मंदा निचळ आदींसह शेतकरी व महिला उपस्थित होते.

....अन्यथा तीव्र आंदोलन

गत चार महिन्यांपासून नुकसानग्रस्त शेतकरी मदतीसाठी भटकंती करीत आहेत. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा होता. त्यामुळे शासनाने त्वरीत शेतकऱ्यांना मदतीचे वाटप करावे, अन्यथा शेतकरी कुटुंबासह जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत कौठकर यांनी याप्रसंगी दिला. 

टॅग्स :FarmerशेतकरीAkolaअकोला