शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

'त्या' ५८ उंटांना राजस्थानमध्ये परत पाठविण्याचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 12:48 IST

अकोला : राजस्थान येथून कत्तलीसाठी हैदराबाद येथे नेण्यात येत असलेल्या ५८ उंटांना पातुर तालुक्यातील चिंचखेड फाट्याजवळ तेलंगणा येथील वण्यजीव संरक्षण विषेश अधिकारी यांनी पकडून जिवदान दिले होते.

अकोला : राजस्थान येथून कत्तलीसाठी हैदराबाद येथे नेण्यात येत असलेल्या ५८ उंटांना पातुर तालुक्यातील चिंचखेड फाट्याजवळ तेलंगणा येथील वण्यजीव संरक्षण विषेश अधिकारी यांनी पकडून जिवदान दिले होते. सदर उंटांना पातूरपोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर या उंटांना राजस्थानमध्ये परत पाठविण्याचा आदेश न्यायालयाने दिल्यानंतर सदर ५८ उंटांना राजस्थानमध्ये परत पाठविण्यात येत आहे.राजस्थान मधुन तेलगंणा तथा आन्ध्रप्रदेशातील हैद्राबाद येथे कत्तलीकरीता ५८ उंटाना १२ डिसेंबर रोजी नेण्यात येत होते. चार राज्यातील पोलीसांच्या हातावर तुरी देउन हे दलाल उंटाचा तस्करीचा गोरखधंदा गेल्या अनेक वर्षे पासुन करीत आहेत. अनेक वेळा उंटाचे कळप हे तेलगंणा आंध्र प्रदेश राज्यात जात असताना त्यांची साधी चौकशी सुध्दा केली जात नव्हती. आंतरराष्ट्रीय स्तरावर हा गोरखधंदा सुरु असल्याने याची तस्करी करणारे प्रत्येक पोलीस स्टेशनला मॅनेज करीत असल्याचे वास्तव आहे. मात्र काही सामाजिक कार्यकर्त्यांनी व गौरक्षण चवळवळीत कात करीत असलेल्या कार्यकर्त्यांनी या कळपावर पाळत ठेउन त्यांची कत्तल होत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांना दिली होती. यावरुन सदरचा कळप राज्यस्थान वरुन हैद्राबादला कत्तलीसाठी नेण्यात येत असल्याच्या माहितीवरुन हैदराबाद येथील पशु संरक्षण समीतीचे वण्य संरक्षण विशेष अधीकारी सुरेंद्र भंडारी, दीनेश अपलीया , महीप जैन यांनी पातुर पोलिसांना सोबत घेउन पकडला होता. त्यानंतर विजय बोरकर यांनी या प्रकरणाची पातुर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतरही पातुर पोलिसांनी सदर प्रकरणात गुन्हा दाखल करण्यास प्रचंड वेळाकाढूपणा करीत या तस्करांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला होता. मात्र वरीष्ठ स्तरावरुन दबाव आल्यानंतर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर हे उंट राजस्थानमधून चोरी करून आणल्याचे तर काही उंट खरेदी करून आणल्याचे समोर आले होते. या प्रकरणी पोलिसांनी राजस्थान येथील भवरलाल व वक्ताराम यांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर सदर उंट राजस्थानमध्ये परत पाठविण्यासाठी न्यायालयात याचीका दाखल करण्यात आली होती. यावर न्यायालयाने आदेश दिले असून सदर ५८ उंटांना राजस्थानमध्ये परत पाठविण्यात येत आहे.उंट हा अतिसंरक्षीत प्राणी असतांनाही कत्तलीसाठी वाहतुक होत असल्याचे उघड झाले आहे. मात्र या उंटांना जीवनदान देण्यासाठी संजय वाघमारे तसेच वनराई गोशाळा अध्यक्ष श्रीकांत बोरकर यांनी विशेष मदत केली.

 

टॅग्स :AkolaअकोलाPoliceपोलिसPaturपातूर