शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

'त्या' ५८ उंटांना राजस्थानमध्ये परत पाठविण्याचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 12:48 IST

अकोला : राजस्थान येथून कत्तलीसाठी हैदराबाद येथे नेण्यात येत असलेल्या ५८ उंटांना पातुर तालुक्यातील चिंचखेड फाट्याजवळ तेलंगणा येथील वण्यजीव संरक्षण विषेश अधिकारी यांनी पकडून जिवदान दिले होते.

अकोला : राजस्थान येथून कत्तलीसाठी हैदराबाद येथे नेण्यात येत असलेल्या ५८ उंटांना पातुर तालुक्यातील चिंचखेड फाट्याजवळ तेलंगणा येथील वण्यजीव संरक्षण विषेश अधिकारी यांनी पकडून जिवदान दिले होते. सदर उंटांना पातूरपोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर या उंटांना राजस्थानमध्ये परत पाठविण्याचा आदेश न्यायालयाने दिल्यानंतर सदर ५८ उंटांना राजस्थानमध्ये परत पाठविण्यात येत आहे.राजस्थान मधुन तेलगंणा तथा आन्ध्रप्रदेशातील हैद्राबाद येथे कत्तलीकरीता ५८ उंटाना १२ डिसेंबर रोजी नेण्यात येत होते. चार राज्यातील पोलीसांच्या हातावर तुरी देउन हे दलाल उंटाचा तस्करीचा गोरखधंदा गेल्या अनेक वर्षे पासुन करीत आहेत. अनेक वेळा उंटाचे कळप हे तेलगंणा आंध्र प्रदेश राज्यात जात असताना त्यांची साधी चौकशी सुध्दा केली जात नव्हती. आंतरराष्ट्रीय स्तरावर हा गोरखधंदा सुरु असल्याने याची तस्करी करणारे प्रत्येक पोलीस स्टेशनला मॅनेज करीत असल्याचे वास्तव आहे. मात्र काही सामाजिक कार्यकर्त्यांनी व गौरक्षण चवळवळीत कात करीत असलेल्या कार्यकर्त्यांनी या कळपावर पाळत ठेउन त्यांची कत्तल होत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांना दिली होती. यावरुन सदरचा कळप राज्यस्थान वरुन हैद्राबादला कत्तलीसाठी नेण्यात येत असल्याच्या माहितीवरुन हैदराबाद येथील पशु संरक्षण समीतीचे वण्य संरक्षण विशेष अधीकारी सुरेंद्र भंडारी, दीनेश अपलीया , महीप जैन यांनी पातुर पोलिसांना सोबत घेउन पकडला होता. त्यानंतर विजय बोरकर यांनी या प्रकरणाची पातुर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतरही पातुर पोलिसांनी सदर प्रकरणात गुन्हा दाखल करण्यास प्रचंड वेळाकाढूपणा करीत या तस्करांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला होता. मात्र वरीष्ठ स्तरावरुन दबाव आल्यानंतर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर हे उंट राजस्थानमधून चोरी करून आणल्याचे तर काही उंट खरेदी करून आणल्याचे समोर आले होते. या प्रकरणी पोलिसांनी राजस्थान येथील भवरलाल व वक्ताराम यांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर सदर उंट राजस्थानमध्ये परत पाठविण्यासाठी न्यायालयात याचीका दाखल करण्यात आली होती. यावर न्यायालयाने आदेश दिले असून सदर ५८ उंटांना राजस्थानमध्ये परत पाठविण्यात येत आहे.उंट हा अतिसंरक्षीत प्राणी असतांनाही कत्तलीसाठी वाहतुक होत असल्याचे उघड झाले आहे. मात्र या उंटांना जीवनदान देण्यासाठी संजय वाघमारे तसेच वनराई गोशाळा अध्यक्ष श्रीकांत बोरकर यांनी विशेष मदत केली.

 

टॅग्स :AkolaअकोलाPoliceपोलिसPaturपातूर